शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

बाल सुधार गृहातील पाच मुलींचा पलायनाचा प्रयत्न

By admin | Updated: January 18, 2017 02:31 IST

काटोल मार्गावरील बाल सुधार गृहात राहणाऱ्या पाच अल्पवयीन मुलींनी सुधार गृहातून पलायनाचा प्रयत्न केला.

पहाटेची घटना : पोलिसांनी दोन तासात ताब्यात घेतले नागपूर : काटोल मार्गावरील बाल सुधार गृहात राहणाऱ्या पाच अल्पवयीन मुलींनी सुधार गृहातून पलायनाचा प्रयत्न केला. मंगळवारी पहाटे ३ वाजताच्या दरम्यान हा प्रकार घडला. मात्र पलायन केल्याची माहिती मिळताच तत्काळ शोधावर लागलेल्या पोलिसांनी दोन तासातच मुलींना ताब्यात घेतले. या प्रकाराने सुधार गृहात मात्र खळबळ उडाली होती. पलायन करणाऱ्या मुलींमध्ये एका अत्याचार पीडितेचा समावेश असून, अन्य मुली कुटुंबाच्या दबावामुळे सुधार गृहात राहात होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, त्यातील एक-दोन मुली काही दिवसापासून आपल्या घरी जाण्याच्या प्रयत्नात होत्या. त्यांनी इतर सहकाऱ्यांना त्यांची योजना सांगितली व त्यांनीही पलायन करण्यास होकार दिला. घटनेच्या रात्री महिला सुरक्षा रक्षक झोपताच पाच मुलींनी पहाटे ३ वाजताच्या सुमारास सुधार गृहाच्या शौचालयाच्या भिंतीवरून उडी घेऊन बाहेर पडल्या व पळ काढला. यादरम्यान जाग आलेल्या महिला रक्षकांना मुलींनी पळ काढल्याचे लक्षात आले. त्यांनी त्वरित पोलिसांना सूचना दिली. सूचना मिळताच सदर पोलिसांनी तत्काळ हालचाली सुरू केल्या. झोन क्रमांक २ चे रात्रपाळीतील डीसीपी आर. कलासागर यांच्या नेतृत्वात शोधमोहीम राबविण्यात आली. पोलिसांनी पहाटे ५ वाजताच्या सुमारास पाचपावलीच्या कडबी चौक परिसरातून मुलींना ताब्यात घेतले. महिला पोलिसांच्या मदतीने त्यांना सदर पोलीस स्टेशनला आणण्यात आले. या अल्पवयीन मुलींची चौकशी केली असता बालसुधार गृहातील कठोरपणा व घरी जाण्याच्या इच्छेमुळे पलायन केल्याची कबुली त्यांनी दिली. त्यातील अत्याचार मुलीने अनेकवेळा असा प्रयत्न केला असून, घरच्यांनी त्रस्त होऊन तिला बाल सुधार गृहात टाकले होते. मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमसंबंधाचे आमिष दाखवून अत्याचार करणारा युवक जामिनावर तुरुंगाबाहेर पडला आहे. त्याबाबत माहिती मिळाल्याने तिने पलायन करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. सदर पोलीस स्टेशनच्या महिला पीएसआय पी. एम. शेंडे यांनी मुलींची चौकशी केली असून, त्यांना बालसुधार समितीसमोर सादर केले जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बालसुधार गृहात १०० पेक्षा जास्त अल्पवयीन मुली राहतात. यामध्ये घरातून पळालेल्या, बेवारस, गुन्ह्यात अडकलेल्या मुलींचा समावेश आहे. सुधार गृहात एक महिला रक्षक तैनात असून, या भरवशावर सुरक्षा राखणे शक्य नाही. हा परिसर असुरक्षित असल्याने पलायन करणाऱ्या मुलींवर आणखी अत्याचार होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सांगण्यात येत आहे.(प्रतिनिधी)