शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

दलित-बहुजनांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा संघाचा प्रयत्न

By admin | Updated: October 14, 2015 03:27 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समाजातील काही विशिष्ट वर्गांसोबतच जुळला असून शिक्षणाचे भगवेकरण करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका होत आहे.

शिक्षणप्रणालीत बाबासाहेबांच्या विचारांचा आग्रह : सामाजिक समरसतेकडे पाऊलयोगेश पांडे नागपूर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समाजातील काही विशिष्ट वर्गांसोबतच जुळला असून शिक्षणाचे भगवेकरण करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका होत आहे. परंतु ही प्रतिमा दूर होऊन दलित-बहुजनांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी संघाचे पदाधिकारी आग्रही असून त्यादृष्टीने पावले उचलण्यात येत आहेत. संघ परिवारातील अखिल भारतीय राष्ट्रीय शिक्षण महासंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनादरम्यान याचेच प्रतिबिंब दिसून आले. शिक्षणप्रणालीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अनुसरण होऊन त्यांची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता असल्याचा प्रस्ताव यावेळी संमत करण्यात आला.देशात सत्तांतर झाल्यापासून संघाकडून सर्वात जास्त भर हा शिक्षणप्रणालीतील बदल व सामाजिक समरसता यांच्यावर देण्यात येत आहे. मार्चमध्ये नागपुरात झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत सामाजिक समरसतेचा प्रस्ताव संमत करण्यात आला होता. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनीदेखील वारंवार ‘एक गाव, एक पाणवठा’ तसेच सर्वांसाठी गावांमधील मंदिरे खुली व्हावीत यासारख्या बाबींना समर्थन दिले. संघ स्वयंसेवकांना सामाजिक समरसतेसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्यास सांगण्यात आले व त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्नदेखील सुरू होते.परंतु आरक्षणाचा फेरविचार व्हावा, या डॉ.भागवतांनी दिलेल्या वक्तव्यानंतर देशभरात खळबळ माजली व संघ दलित-बहुजनविरोधी असल्याचा जोरदार प्रचार होऊ लागला. या वक्तव्यामुळे दलित-बहुजनांमध्ये निर्माण होत असलेल्या विश्वासाला तडा गेला असून तो परत मिळविणे संघासमोर आव्हान ठरणार आहे.अखिल भारतीय राष्ट्रीय शिक्षण महासंघातर्फे रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात ९ ते ११ आॅक्टोबरदरम्यान आयोजित अधिवेशनादरम्यान देशातील ‘केजी’पासून ते ‘पीजी’पर्यंतच्या शिक्षण प्रणालीत कोणते बदल हवेत यावर मंथन झाले. समाजातील सर्व घटकांपर्यंत भेदभाव दूर सारून समान शिक्षण कसे पोहोचेल या मुद्यावर यात सर्वात अधिक भर दिसून आला. एकात्ममानववाद निर्माण करणारी शिक्षणप्रणाली निर्माण करणे तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे शिक्षणप्रणालीत अनुसरण करणे हे दोन महत्त्वाचे प्रस्ताव यावेळी संमत करण्यात आले. संघाचे काही पदाधिकारी अन् स्वयंसेवक यावेळी उपस्थित होते. बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार करणारडॉ.आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त त्यांचे विचार, त्यांची आवश्यकता, त्यांच्या विचारांतील दृष्टिकोन यांचा शिक्षणाच्या माध्यमातून यांचा जास्तीत जास्त प्रसार कसा होईल यावर सखोल मंथन झाले. सर्वांना समान संधी, वंचितांचा विकास याबाबत बाबासाहेबांच्या विचारांचा आदर्श शिक्षणप्रणालीत अंतर्भूत असावा असाच सूर दिसून आल्याची माहिती महासंघाचे महामंत्री जगदीश प्रसाद सिंघल यांनी दिली.