शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायावळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
2
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
3
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
4
कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा!
5
VIRAL : अरे देवा! पाठदुखी बळावली म्हणून आजीने ८ जिवंत बेडूक गिळले; पुढे जे झालं…
6
AI मुळे आयटी क्षेत्रात मोठी उलथापालथ! TCS, विप्रो, मायक्रोसॉफ्टसह जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची नोकरकपात
7
अफगाणी परराष्ट्रमंत्री आजपासून 8 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? जाणून घ्या...
8
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
9
"बस्तर बदलतंय... बंदूक, दारुगोळ्याचा धूर नाही तर वाहताहेत विकासाचे आणि विश्वासाचे वारे"
10
अशांत, अस्वस्थ, सैरभैर वाटत असेल तर संकष्टीपासून सुरू करा 'हा' छोटासा पण प्रभावी उपाय!
11
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
12
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
13
Saif Ali Khan : "चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
14
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
15
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
16
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
17
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
18
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
19
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
20
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?

भाजप कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न

By admin | Updated: August 28, 2015 03:17 IST

देशभरात वाढत असलेली महागाई, निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करणे, संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत न करणे तसेच केंद्र व राज्य सरकारमधील...

काँग्रेस कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट : सरकारविरोधात पर्दाफाश आंदोलननागपूर : देशभरात वाढत असलेली महागाई, निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करणे, संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत न करणे तसेच केंद्र व राज्य सरकारमधील भ्रष्टाचाराला संरक्षण दिले जात आहे. याचा पर्दाफाश करण्यासाठी शहर काँग्रेसच्या वतीने गुरुवारी गांधीसागर तलाव, टिळक पुतळा येथील भाजप कार्यालयापुढे जोरदार नारेबाजी व निदर्शने करण्यात आली. काँग्रेसच्या काही संतप्त कार्यक र्त्यांनी भाजप कार्यालयावर धडक देत आत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यांना रोखण्याच्या प्रयत्नात पोलीस व कार्यकर्त्यांत चांगलीच झटापट झाल्याने काहीवेळ तणाव व गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. काँग्र्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वातील या आंदोलनात काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री अनिस अहमद, नितीन राऊ त, शहर काँग्रेसचे सरचिटणीस अतुल कोटेचा, उमाकांत अग्निहोत्री शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष बंटी शेळके, नगरसेवक प्रशांत धवड, संजय महाकाळकर, गुड्डू तिवारी, अजय हिवरकर यांच्यासह काँग्रेसचे नगरसेवक ,पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. निवडणुकीपूर्वी काँग्र्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप करून लोकांना ‘अच्छे दिन आनेवाले है’, विदेशातील काळा पैसा भारतात परत आणून प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख जमा होतील. महागाई कमी होईल. शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील असे आश्वासन भाजप नेत्यांनी दिले होते. परंतु असे काहीही घडले नाही. दुसरीकडे केंद्र व राज्य सरकारमधील भ्रष्टाचारी मंत्र्यांची चौकशी न करता त्यांना क्लीन चिट देऊन पाठीशी घातले जात आहे. असे असतानाही सरकार पारदर्शी असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत आहे. याचा पदार्फाश करण्यासाठी काँग्र्रेसने आंदोलन हाती घेतल्याची माहिती विकास ठाकरे यांनी दिली. (प्रतिनिधी)भ्रष्टाचारी मंत्र्यांना संरक्षणनिवडणुकीपूर्वी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या भाजप नेतृत्वातील केंद्र व राज्य सरकारमधील मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहे. असे असूनही चौकशी न करता त्यांना क्लीन चिट देण्याचा प्रकार सुरू आहे. दुसरीकडे सरकार पारदर्शी असल्याचा दावा पंतप्रधान व मुख्यमंत्री करीत आहेत. याचा पर्दाफाश करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने देशभरात आंदोलन हाती घेण्यात आले आहे. जोपर्यंत भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या विरोधात कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा माणिकराव ठाकरे यांनी यावेळी दिला.