शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

-तरच पोलिसांवरील हल्ले थांबतील

By admin | Updated: September 18, 2016 02:32 IST

पोलीस समाजाचे रक्षक मानले जातात. त्यांच्यामुळेच गुन्हेगारांवर, समाजकंटकावर धाक राहतो.

नियम तोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी पोलिसांनाही समुपदेशनाची गरज आजी-माजी पोलीस अधिकाऱ्यांचे मतनागपूर : पोलीस समाजाचे रक्षक मानले जातात. त्यांच्यामुळेच गुन्हेगारांवर, समाजकंटकावर धाक राहतो. अशा या पोलिसांवरच हल्ले होत असेल आणि ते दुबळे बनत असतील तर ते समाजाच्या हिताचे नाही. त्यामुळे गुन्हेगारांची, समाजकंटकांची, भीती संपेल. पोलिसांना सक्षम बनविण्याची जबाबदारी समाजाचीही आहे. पोलिसांवरील हल्ल्याची वेगवेगळी कारणे आहेत. मात्र, पोलिसांनीही आपली जबाबदारी पार पाडायला हवी. नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास निर्माण व्हायला हवा. त्यासाठी पोलिसांनी कायदेशीर कारवाईच करायला हवी, असा सल्ला आजी-माजी पोलिस अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिला. पोलिसांबद्दलची भीतीच संपलीअत्याचाराची, एखाद्या गंभीर गुन्ह्यांची तक्रार घेऊन गेलेल्या व्यक्तीची मदत करण्याची तत्परता पोलीस दाखवत नाही. त्याला ते हेलपाटे घालवायला लावतात. त्यामुळे पोलिसांबद्दल आपुलकी तर राहतच नाही. उलट काहीसा राग निर्माण होतो. दुसरे म्हणजे, पूर्वीचे पोलीस सामाजिक जाणिवेतून कर्तव्य बजावत होते. त्यामुळे त्याच्याबद्दल भीती अन् आदर राहायचा. अलीकडे पोलीस ठाण्यापर्यंतचे अधिकारी, कर्मचारी बऱ्याच प्रकरणात कर्तव्यात कसूर करतात. त्यामुळे त्यांच्याबद्दलची भीतीच संपली आहे. त्यामुळे त्यांच्याशी मुजोरी करणे, अंगावर धावून जाणे आदी प्रकार वाढले आहेत. हे टाळण्यासाठी पोलिसांनी समाजाचा विश्वास जिंकण्याची गरज आहे.- बाबासाहेब कंगाले, निवृत्त सहपोलीस आयुक्त नागरिकांना सन्मानपूर्वक वागणूक द्यागुन्हेगारी संपली पाहिजे, अवैध धंदेही नको अन् वाहतूकही सुरळीत हवी. मात्र, हे करतानाच आम्ही आमची जबाबदारी मात्र दुर्लक्षित करायची. सिग्नल तोडायचा, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करायचे आणि पोलिसांनी कारवाई केली तर त्याच्यावर हल्ला करायचा, हा प्रकारच समजण्यापलीकडे आहे. पोलिसांची लाचखोरी या हल्ल्यांना कारणीभूत असल्याचे खरे असले तरी तडजोडीच्या नावाखाली आम्हीच त्यांना लाच देण्यास तयार असतो. पोलिसांनी नागरिकांना सन्मानपूर्वक वागणूक दिल्यास हल्ले होणार नाही. त्यासाठी पोलिसांचे समुपदेशन होण्याची गरज आहे. - रमेश मेहता, निवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी.वाद घालणे टाळा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यासोबत वाद घालू नका, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करा, असे निर्देश वाहतूक पोलिसांना देण्यात आले आहे. नंतर संबंधितांनी खोट्या तक्रारी किंवा आरोप करू नये म्हणून शक्यतो कारवाईच्या वेळी मोबाईलवर शूटींग करण्याचा सल्लाही पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिला आहे.- स्मार्तना पाटील,वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त