शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
4
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
5
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
6
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
7
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
8
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
9
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
10
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
11
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
12
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
13
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
14
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
15
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
16
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
17
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
18
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
19
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
20
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP

-तरच पोलिसांवरील हल्ले थांबतील

By admin | Updated: September 18, 2016 02:32 IST

पोलीस समाजाचे रक्षक मानले जातात. त्यांच्यामुळेच गुन्हेगारांवर, समाजकंटकावर धाक राहतो.

नियम तोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी पोलिसांनाही समुपदेशनाची गरज आजी-माजी पोलीस अधिकाऱ्यांचे मतनागपूर : पोलीस समाजाचे रक्षक मानले जातात. त्यांच्यामुळेच गुन्हेगारांवर, समाजकंटकावर धाक राहतो. अशा या पोलिसांवरच हल्ले होत असेल आणि ते दुबळे बनत असतील तर ते समाजाच्या हिताचे नाही. त्यामुळे गुन्हेगारांची, समाजकंटकांची, भीती संपेल. पोलिसांना सक्षम बनविण्याची जबाबदारी समाजाचीही आहे. पोलिसांवरील हल्ल्याची वेगवेगळी कारणे आहेत. मात्र, पोलिसांनीही आपली जबाबदारी पार पाडायला हवी. नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास निर्माण व्हायला हवा. त्यासाठी पोलिसांनी कायदेशीर कारवाईच करायला हवी, असा सल्ला आजी-माजी पोलिस अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिला. पोलिसांबद्दलची भीतीच संपलीअत्याचाराची, एखाद्या गंभीर गुन्ह्यांची तक्रार घेऊन गेलेल्या व्यक्तीची मदत करण्याची तत्परता पोलीस दाखवत नाही. त्याला ते हेलपाटे घालवायला लावतात. त्यामुळे पोलिसांबद्दल आपुलकी तर राहतच नाही. उलट काहीसा राग निर्माण होतो. दुसरे म्हणजे, पूर्वीचे पोलीस सामाजिक जाणिवेतून कर्तव्य बजावत होते. त्यामुळे त्याच्याबद्दल भीती अन् आदर राहायचा. अलीकडे पोलीस ठाण्यापर्यंतचे अधिकारी, कर्मचारी बऱ्याच प्रकरणात कर्तव्यात कसूर करतात. त्यामुळे त्यांच्याबद्दलची भीतीच संपली आहे. त्यामुळे त्यांच्याशी मुजोरी करणे, अंगावर धावून जाणे आदी प्रकार वाढले आहेत. हे टाळण्यासाठी पोलिसांनी समाजाचा विश्वास जिंकण्याची गरज आहे.- बाबासाहेब कंगाले, निवृत्त सहपोलीस आयुक्त नागरिकांना सन्मानपूर्वक वागणूक द्यागुन्हेगारी संपली पाहिजे, अवैध धंदेही नको अन् वाहतूकही सुरळीत हवी. मात्र, हे करतानाच आम्ही आमची जबाबदारी मात्र दुर्लक्षित करायची. सिग्नल तोडायचा, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करायचे आणि पोलिसांनी कारवाई केली तर त्याच्यावर हल्ला करायचा, हा प्रकारच समजण्यापलीकडे आहे. पोलिसांची लाचखोरी या हल्ल्यांना कारणीभूत असल्याचे खरे असले तरी तडजोडीच्या नावाखाली आम्हीच त्यांना लाच देण्यास तयार असतो. पोलिसांनी नागरिकांना सन्मानपूर्वक वागणूक दिल्यास हल्ले होणार नाही. त्यासाठी पोलिसांचे समुपदेशन होण्याची गरज आहे. - रमेश मेहता, निवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी.वाद घालणे टाळा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यासोबत वाद घालू नका, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करा, असे निर्देश वाहतूक पोलिसांना देण्यात आले आहे. नंतर संबंधितांनी खोट्या तक्रारी किंवा आरोप करू नये म्हणून शक्यतो कारवाईच्या वेळी मोबाईलवर शूटींग करण्याचा सल्लाही पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिला आहे.- स्मार्तना पाटील,वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त