शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
13
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
14
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
15
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
16
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
17
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
18
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
19
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
20
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

-तरच पोलिसांवरील हल्ले थांबतील

By admin | Updated: September 18, 2016 02:32 IST

पोलीस समाजाचे रक्षक मानले जातात. त्यांच्यामुळेच गुन्हेगारांवर, समाजकंटकावर धाक राहतो.

नियम तोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी पोलिसांनाही समुपदेशनाची गरज आजी-माजी पोलीस अधिकाऱ्यांचे मतनागपूर : पोलीस समाजाचे रक्षक मानले जातात. त्यांच्यामुळेच गुन्हेगारांवर, समाजकंटकावर धाक राहतो. अशा या पोलिसांवरच हल्ले होत असेल आणि ते दुबळे बनत असतील तर ते समाजाच्या हिताचे नाही. त्यामुळे गुन्हेगारांची, समाजकंटकांची, भीती संपेल. पोलिसांना सक्षम बनविण्याची जबाबदारी समाजाचीही आहे. पोलिसांवरील हल्ल्याची वेगवेगळी कारणे आहेत. मात्र, पोलिसांनीही आपली जबाबदारी पार पाडायला हवी. नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास निर्माण व्हायला हवा. त्यासाठी पोलिसांनी कायदेशीर कारवाईच करायला हवी, असा सल्ला आजी-माजी पोलिस अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिला. पोलिसांबद्दलची भीतीच संपलीअत्याचाराची, एखाद्या गंभीर गुन्ह्यांची तक्रार घेऊन गेलेल्या व्यक्तीची मदत करण्याची तत्परता पोलीस दाखवत नाही. त्याला ते हेलपाटे घालवायला लावतात. त्यामुळे पोलिसांबद्दल आपुलकी तर राहतच नाही. उलट काहीसा राग निर्माण होतो. दुसरे म्हणजे, पूर्वीचे पोलीस सामाजिक जाणिवेतून कर्तव्य बजावत होते. त्यामुळे त्याच्याबद्दल भीती अन् आदर राहायचा. अलीकडे पोलीस ठाण्यापर्यंतचे अधिकारी, कर्मचारी बऱ्याच प्रकरणात कर्तव्यात कसूर करतात. त्यामुळे त्यांच्याबद्दलची भीतीच संपली आहे. त्यामुळे त्यांच्याशी मुजोरी करणे, अंगावर धावून जाणे आदी प्रकार वाढले आहेत. हे टाळण्यासाठी पोलिसांनी समाजाचा विश्वास जिंकण्याची गरज आहे.- बाबासाहेब कंगाले, निवृत्त सहपोलीस आयुक्त नागरिकांना सन्मानपूर्वक वागणूक द्यागुन्हेगारी संपली पाहिजे, अवैध धंदेही नको अन् वाहतूकही सुरळीत हवी. मात्र, हे करतानाच आम्ही आमची जबाबदारी मात्र दुर्लक्षित करायची. सिग्नल तोडायचा, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करायचे आणि पोलिसांनी कारवाई केली तर त्याच्यावर हल्ला करायचा, हा प्रकारच समजण्यापलीकडे आहे. पोलिसांची लाचखोरी या हल्ल्यांना कारणीभूत असल्याचे खरे असले तरी तडजोडीच्या नावाखाली आम्हीच त्यांना लाच देण्यास तयार असतो. पोलिसांनी नागरिकांना सन्मानपूर्वक वागणूक दिल्यास हल्ले होणार नाही. त्यासाठी पोलिसांचे समुपदेशन होण्याची गरज आहे. - रमेश मेहता, निवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी.वाद घालणे टाळा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यासोबत वाद घालू नका, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करा, असे निर्देश वाहतूक पोलिसांना देण्यात आले आहे. नंतर संबंधितांनी खोट्या तक्रारी किंवा आरोप करू नये म्हणून शक्यतो कारवाईच्या वेळी मोबाईलवर शूटींग करण्याचा सल्लाही पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिला आहे.- स्मार्तना पाटील,वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त