शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

घोषणेनंतर चार वर्षांनी अटल भूजल योजनेला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:07 IST

नागपूर : २०१६-१७ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर झालेली अटल भूजल योजना महाराष्ट्रात तब्बल चार वर्षांनी राबविली जात आहे. २०२५ ...

नागपूर : २०१६-१७ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर झालेली अटल भूजल योजना महाराष्ट्रात तब्बल चार वर्षांनी राबविली जात आहे. २०२५ पर्यंत या योजनेतून कामाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून प्राथमिक स्तरावरील कामासाठी राज्याला १६.८३ कोटी रुपयांचा निधीही मिळाला आहे. राज्यातील ७३ शोषित पाणलोट क्षेत्रातील १,४४३ गावांमध्ये या योजनेतून काम केले जाणार आहे.

महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांमधील ३८ तालुक्यांमध्ये असलेल्या १,४४३ गावांमध्ये या योजनेच्या माध्यमातून काम केले जाणार आहे. या योजनेसाठी ९२५.७७ कोटी रुपयांची आर्थिक तरतुद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह सात राज्यात केंद्र सरकार आणि जागतिक बँकेच्या माध्यमातून प्रत्येकी ५० टक्के वाट्यामधून यासाठी काम केले जाणार आहे. राज्यातील कामासाठी अलिकडेच पहिल्या टप्प्यात १६.८३ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. यातून योजनेतील गावांचे पाण्याचे अंदाजपत्रक तयार करून कृती आराखडे बनविण्याचे काम प्राथमिक टप्प्यात हाती घेण्यात आले आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल आणि नरखेड तालुक्यात या योजनेतून काम होणार आहे.

...

येथे राबविणार योजना

जिल्हा - तालुके - पाणलोट क्षेत्र - गाव

पुणे - ३ - ५ - ११८

सातारा - ३ - ३ - ११४

सांगली - ४ - ६ - ९३

सोलापूर - ४ - ५ - ११७

नाशिक - २ - ९ - १२९

अहमदनगर - ३ - ६ - १०९

जळगाव - ४ - ६ - १०१

जालना - ३ - ५ - ५०

लातूर - ४ - ९ - १३६

उस्मानाबाद - २ - ७ - ५५

अमरावती - ३ - ६ - २१७

बुलडाणा - १ - ४ - ६८

नागपूर - २ - २ - १२३

एकूण - ३८ - ७३ - १,४४३

...

कोट

योजनेत समाविष्ट असलेल्या राज्यातील गावांमध्ये गावपातळीवर आराखडे तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. भू-वैज्ञानिकांचे प्रशिक्षणही यासाठी सुरू झाले आहे. २०२५ पर्यंत ही योजना पूर्ण करण्याचे नियोजन आहे. शोषित नोंद असलेले पाणलोट सुरक्षितमध्ये परावर्तित करण्याचे प्रयत्न यातून होणार आहेत.

- मल्लिनाथ कलशेट्टी, संचालक, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा

...