शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

तापमान ४५ अंशावर, रुग्ण केवळ दोनच; उष्माघाताच्या रुग्णाला तापाचे लेबल

By सुमेध वाघमार | Updated: May 30, 2024 18:29 IST

मेडिकल, मनपाचे शितकक्ष रिकामेच, नागपूरचा दाहक उन्हाचा आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. पाच दिवसांपासून तापमान ४३ ते ४५ अंशाच्या दरम्यान स्थिरावले आहे.

नागपूर : उष्माघाताच्या रुग्णांच्या नोंदी ठेवणे आणि त्याची माहिती महापालिका, जिल्हा शल्यचिकित्सकापासून ते आरोग्य उपसंचालक आणि वैद्यकीय संचालकांना पाठविणे, रुग्ण दगावल्यास शवविच्छेदन करणे, आदी प्रकार टाळण्यासाठी मनपासह काही शासकीय व खासगी रुग्णालयात उष्माघाताच्या रुग्णाला तापाचे रुग्ण म्हणून नोंद करून उपचार करीत असल्याची माहिती पुढे आली आहे.  

नागपूरचा दाहक उन्हाचा आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. पाच दिवसांपासून तापमान ४३ ते ४५ अंशाच्या दरम्यान स्थिरावले आहे.  तीव्र उष्णतेच्या संपर्कात आल्यास शरीरातील तापमान नियंत्रित करणारी यंत्रणा कोलमडून पडते आणि उष्माघात होतो. चक्कर, डोकेदुखी, मळमळ-उलटी, पोटात वेदना, गोंधळलेली अवस्था ही उष्माघाताची लक्षणे आहेत. दुर्लक्ष केल्यास जीवाला धोका होतो. त्यामुळे मेयो, मेडिकलसह मनपाच्या दवाखान्यात शितकक्ष तयार करण्यात आले. परंतु आतापर्यंत मेयोमध्ये केवळ दोन रुग्णांची नोंद झाली. -१०० पैकी १० ते १५ रुग्ण तापाचे    

सुत्रानुसार, विशिष्ट चाचणी केल्यावर उष्माघाताचे निदान होते असेही नाही. उष्माघात व तापाच्या  रुग्णावरील उपचार सारखाच असतो. सध्या मनपासह शासकीय रुग्णालयांमध्ये १०० रुग्णांमधून १० ते १५ रुग्ण तापाचे असतात. मात्र उष्माघाताच्या रुग्णांची नोंद ठेवण्यापासून त्याची माहिती आरोग्य विभागाला पाठविणे व इतरही सोपस्कार पार पाडावी लागतात. हे टाळण्यासाठी डॉक्टर उष्माघाताच्या रुग्णाची तापाचे रुग्ण म्हणून नोंद करतात.संशयित मृतांची संख्या १२मे महिना संपायला आला तरी संशयित मृत्यूचे ‘ऑडिट’ झाले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मंगळवारी व बुधवारी शहरात सहा मृत्यूची नोंद झाली. तर मागील २५ दिवसांत १२ अनोळखी व्यक्ती बेशुद्धा अवस्थेत सापडले असता त्यांना मेयो व मेडिकलमध्ये दाखल केल्यावर डॉक्टरांनी मृत घोषीत केले. हा उष्माघाताचा मृत्यू आहे का, हे तपासण्यासाठी ‘डेथ आॅडिट’ समिती आहे. परंतु अद्यापही या समितीची बैठक झाली नाही.