शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
2
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
3
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
4
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
5
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
6
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
7
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
8
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
9
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
10
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
11
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
12
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
13
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
14
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
15
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
16
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
17
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
18
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
19
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
20
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...

तापमान ४५ अंशावर, रुग्ण केवळ दोनच; उष्माघाताच्या रुग्णाला तापाचे लेबल

By सुमेध वाघमार | Updated: May 30, 2024 18:29 IST

मेडिकल, मनपाचे शितकक्ष रिकामेच, नागपूरचा दाहक उन्हाचा आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. पाच दिवसांपासून तापमान ४३ ते ४५ अंशाच्या दरम्यान स्थिरावले आहे.

नागपूर : उष्माघाताच्या रुग्णांच्या नोंदी ठेवणे आणि त्याची माहिती महापालिका, जिल्हा शल्यचिकित्सकापासून ते आरोग्य उपसंचालक आणि वैद्यकीय संचालकांना पाठविणे, रुग्ण दगावल्यास शवविच्छेदन करणे, आदी प्रकार टाळण्यासाठी मनपासह काही शासकीय व खासगी रुग्णालयात उष्माघाताच्या रुग्णाला तापाचे रुग्ण म्हणून नोंद करून उपचार करीत असल्याची माहिती पुढे आली आहे.  

नागपूरचा दाहक उन्हाचा आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. पाच दिवसांपासून तापमान ४३ ते ४५ अंशाच्या दरम्यान स्थिरावले आहे.  तीव्र उष्णतेच्या संपर्कात आल्यास शरीरातील तापमान नियंत्रित करणारी यंत्रणा कोलमडून पडते आणि उष्माघात होतो. चक्कर, डोकेदुखी, मळमळ-उलटी, पोटात वेदना, गोंधळलेली अवस्था ही उष्माघाताची लक्षणे आहेत. दुर्लक्ष केल्यास जीवाला धोका होतो. त्यामुळे मेयो, मेडिकलसह मनपाच्या दवाखान्यात शितकक्ष तयार करण्यात आले. परंतु आतापर्यंत मेयोमध्ये केवळ दोन रुग्णांची नोंद झाली. -१०० पैकी १० ते १५ रुग्ण तापाचे    

सुत्रानुसार, विशिष्ट चाचणी केल्यावर उष्माघाताचे निदान होते असेही नाही. उष्माघात व तापाच्या  रुग्णावरील उपचार सारखाच असतो. सध्या मनपासह शासकीय रुग्णालयांमध्ये १०० रुग्णांमधून १० ते १५ रुग्ण तापाचे असतात. मात्र उष्माघाताच्या रुग्णांची नोंद ठेवण्यापासून त्याची माहिती आरोग्य विभागाला पाठविणे व इतरही सोपस्कार पार पाडावी लागतात. हे टाळण्यासाठी डॉक्टर उष्माघाताच्या रुग्णाची तापाचे रुग्ण म्हणून नोंद करतात.संशयित मृतांची संख्या १२मे महिना संपायला आला तरी संशयित मृत्यूचे ‘ऑडिट’ झाले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मंगळवारी व बुधवारी शहरात सहा मृत्यूची नोंद झाली. तर मागील २५ दिवसांत १२ अनोळखी व्यक्ती बेशुद्धा अवस्थेत सापडले असता त्यांना मेयो व मेडिकलमध्ये दाखल केल्यावर डॉक्टरांनी मृत घोषीत केले. हा उष्माघाताचा मृत्यू आहे का, हे तपासण्यासाठी ‘डेथ आॅडिट’ समिती आहे. परंतु अद्यापही या समितीची बैठक झाली नाही.