शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
2
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
3
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास
4
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
5
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
6
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
7
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
8
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
9
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
10
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
11
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
12
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
13
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
14
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
15
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
16
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
17
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
18
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
19
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
20
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
Daily Top 2Weekly Top 5

तापमान ४५ अंशावर, रुग्ण केवळ दोनच; उष्माघाताच्या रुग्णाला तापाचे लेबल

By सुमेध वाघमार | Updated: May 30, 2024 18:29 IST

मेडिकल, मनपाचे शितकक्ष रिकामेच, नागपूरचा दाहक उन्हाचा आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. पाच दिवसांपासून तापमान ४३ ते ४५ अंशाच्या दरम्यान स्थिरावले आहे.

नागपूर : उष्माघाताच्या रुग्णांच्या नोंदी ठेवणे आणि त्याची माहिती महापालिका, जिल्हा शल्यचिकित्सकापासून ते आरोग्य उपसंचालक आणि वैद्यकीय संचालकांना पाठविणे, रुग्ण दगावल्यास शवविच्छेदन करणे, आदी प्रकार टाळण्यासाठी मनपासह काही शासकीय व खासगी रुग्णालयात उष्माघाताच्या रुग्णाला तापाचे रुग्ण म्हणून नोंद करून उपचार करीत असल्याची माहिती पुढे आली आहे.  

नागपूरचा दाहक उन्हाचा आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. पाच दिवसांपासून तापमान ४३ ते ४५ अंशाच्या दरम्यान स्थिरावले आहे.  तीव्र उष्णतेच्या संपर्कात आल्यास शरीरातील तापमान नियंत्रित करणारी यंत्रणा कोलमडून पडते आणि उष्माघात होतो. चक्कर, डोकेदुखी, मळमळ-उलटी, पोटात वेदना, गोंधळलेली अवस्था ही उष्माघाताची लक्षणे आहेत. दुर्लक्ष केल्यास जीवाला धोका होतो. त्यामुळे मेयो, मेडिकलसह मनपाच्या दवाखान्यात शितकक्ष तयार करण्यात आले. परंतु आतापर्यंत मेयोमध्ये केवळ दोन रुग्णांची नोंद झाली. -१०० पैकी १० ते १५ रुग्ण तापाचे    

सुत्रानुसार, विशिष्ट चाचणी केल्यावर उष्माघाताचे निदान होते असेही नाही. उष्माघात व तापाच्या  रुग्णावरील उपचार सारखाच असतो. सध्या मनपासह शासकीय रुग्णालयांमध्ये १०० रुग्णांमधून १० ते १५ रुग्ण तापाचे असतात. मात्र उष्माघाताच्या रुग्णांची नोंद ठेवण्यापासून त्याची माहिती आरोग्य विभागाला पाठविणे व इतरही सोपस्कार पार पाडावी लागतात. हे टाळण्यासाठी डॉक्टर उष्माघाताच्या रुग्णाची तापाचे रुग्ण म्हणून नोंद करतात.संशयित मृतांची संख्या १२मे महिना संपायला आला तरी संशयित मृत्यूचे ‘ऑडिट’ झाले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मंगळवारी व बुधवारी शहरात सहा मृत्यूची नोंद झाली. तर मागील २५ दिवसांत १२ अनोळखी व्यक्ती बेशुद्धा अवस्थेत सापडले असता त्यांना मेयो व मेडिकलमध्ये दाखल केल्यावर डॉक्टरांनी मृत घोषीत केले. हा उष्माघाताचा मृत्यू आहे का, हे तपासण्यासाठी ‘डेथ आॅडिट’ समिती आहे. परंतु अद्यापही या समितीची बैठक झाली नाही.