शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन मोदींच्या स्मरणातही नाही

By admin | Updated: May 16, 2017 02:26 IST

लोकसभा निवडणूक प्रचाराच्या काळात नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्याच्या दाभडी येथे २० मार्च २०१४ ला ‘चाय पे चर्चा’वर शेतकऱ्यांशी संवाद साधला...

शिवाजीराव मोघे : १८ व १९ ला शेतकऱ्यांचे दिल्लीत उपोषणलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणूक प्रचाराच्या काळात नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्याच्या दाभडी येथे २० मार्च २०१४ ला ‘चाय पे चर्चा’वर शेतकऱ्यांशी संवाद साधला व शेतकऱ्यांची वाईट अवस्था सुधारण्यासाठी विविध योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते. भाजपा सरकारला तीन वर्षे लोटूनही एकही आश्वासन त्यांनी पाळले नाही. शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पंतप्रधान मोदींच्या स्मरणातही नाही. त्यांना त्याची आठवण देण्यासाठी येत्या १८ व १९ ला दिल्लीच्या जंतरमंतरवर शेतकरी उपोषण करणार असल्याचे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी पत्रपरिषदेत सांगितले.त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना मोठमोठी आश्वासने दिलीत आणि लोकांची भरभरून मतेही मिळविली. शेतकऱ्यांच्या मालाला नफ्याच्यावर ५० टक्के हमीभाव, शेतकऱ्यांना व त्यांच्या मुलांना राष्ट्रीयकृत बँकाकडून अल्पव्याजदरात कर्ज, कापूस होत असलेल्या यवतमाळ, अमरावती भागात त्यावरील उद्योग, कृषिमालाच्या दळवणवळणासाठी स्वतंत्र रेल्वेची सुविधा, कृषिमाल साठविण्यासाठी खेड्यापाड्यात गोडाऊन, नद्या जोड प्रकल्प अशी एक ना अनेक आश्वासने त्यांनी दिली. शेतकरी आत्महत्या मागच्या सरकारचे पाप असल्याची टीका करून यापुढे कुणीही आत्महत्या करणार नाही अशी व्यवस्था निर्माण करण्याचा विश्वास त्यांनी दिला होता. मात्र तीन वर्षे लोटूनही मोदींनी एकाही आश्वासनाची पूर्ती केली नसल्याचा आरोप मोघे यांनी यावेळी केला. केंद्रात नरेंद्र व राज्यात देवेंद्र सरकारच्या तीन वर्षाच्या काळात महाराष्ट्रात हजारो आत्महत्या झाल्या असून शेतकऱ्यांची अवस्था आणखी वाईट झाली आहे. पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधलेल्या देशातील ३३ जिल्ह्यातच आत्महत्यांचे प्रमाण वाढले असल्याची टीकाही त्यांनी केली. राज्यात फडणवीस सरकारने ‘काँग्रेसचे धरण’ म्हणून निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम पूर्ण केले नाही. त्यामुळे सहा लाख हेक्टर शेती सिंचनापासून वंचित राहिल्याचा आरोप त्यांनी केला. हे सरकार शेतकरीविरोधी असल्याची टीका त्यांनी केली.पंतप्रधानांना आठवण देण्यासाठी आर्णी तालुका काँग्रेस कमिटी व आर्णी विधानसभा युवक काँग्रेसतर्फे गेली दोन वर्षे दाभडी व आर्णी येथे प्रतिकात्मक चाय की चर्चा हे आंदोलन केले. मात्र त्याची दखल घेतली जात नसल्याने आता थेट दिल्लीतच आंदोलन घेण्यात येत असल्याचे मोघे यांनी सांगितले. जवळपास २०० शेतकरी या लाक्षणिक उपोषण आंदोलनात सहभागी होणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.भाजपाची संवाद यात्रा ‘बकवास’भाजपातर्फे शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी राज्यात लवकरच संवाद यात्रा काढली जाणार आहे. याविषयी विचारले असता शिवाजीराव मोघे यांनी भाजपाची संवाद यात्रा ‘बकवास’ असल्याचा आरोप केला. शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारे रावसाहेब दानवे हेच या यात्रेचे नेतृत्व करणार असल्याने या सरकारची मानसिकता स्पष्ट होत असल्याची टीका त्यांनी केली. आश्वासन पूर्ण करण्यात आणि शेतकऱ्यांची अवस्था सुधारण्यात हे सरकार अपयशी ठरल्याने लोकांचे मन वळविण्यासाठी ही यात्रा काढली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.