शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
5
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
6
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
7
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
8
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
9
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
10
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
11
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
12
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
13
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
14
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
15
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
16
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
17
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
18
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
19
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
20
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा

तहसील कार्यालयाला रिक्त पदांचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:09 IST

विजय नागपुरे कळमेश्वर : कळमेश्वर तहसील कार्यालयांतर्गत एकूण ९३ पदांना मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी २३ पदे रिक्त आहेत. ...

विजय नागपुरे

कळमेश्वर : कळमेश्वर तहसील कार्यालयांतर्गत एकूण ९३ पदांना मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी २३ पदे रिक्त आहेत. दोन कर्मचाऱ्यांची सेवा वरिष्ठ कार्यालयात संलग्न करण्यात आल्याने कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला आहे. यामुळे रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत. तसेच वरिष्ठ कार्यालयात सेवा संलग्न करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना तहसील कार्यालयात पूर्णवेळ कार्यरत करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

कळमेश्वर तालुक्यात ८३ गावे महसुली व २२ गावे रिठी तर कळमेश्वर व मोहपा ही मोठी शहरे आहेत. या गावातील महसुली कामे तसेच विविध निराधार योजना, निवडणूक, रेशनकार्ड, नैसर्गिक आपत्ती आदी लोकाभिमुख योजना राबविल्या जातात. परंतु त्या योजनांची अंमलबजावणी करण्याकरिता पुरेसा कर्मचारीवर्ग नसल्याने तहसील प्रशासनाला कामे करताना तारेवरची कसरत करावी लागते.

तहसील कार्यालयामध्ये पुरवठा विभाग, रोहयो, संजय गांधी योजना विभाग, निवडणूक विभाग या विभागासाठी ४० तर तलाठी २७ व कोतवालाची २६ पदे मंजूर आहेत. यापैकी सर्वसाधारण विभागातील १० पैकी ४ कनिष्ठ लिपिक यांची पदे रिक्त आहेत. तीन अव्वल कारकूनपैकी एक पद रिक्त असून, उर्वरित कार्यरत दोनपैकी अजय भोतमांगे यांची सेवा मागील सात ते आठ महिन्यापासून जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर येथे तर नैसर्गिक आपत्तीचे काम पाहणारे कवेश चामाटे यांची मागील एक महिन्यापासून उपविभागीय कार्यालय सावनेर येथे सेवा संलग्न करण्यात आली आहे. तसेच तलाठी ३, शिपाई ३ व कोतवाल ११ पदे रिक्त आहेत.

शेतकरी, सामान्य नागरिकांना बसतोय फटका

तहसील कार्यालय कळमेश्वर येथील नैसर्गिक आपत्ती शाखेचे कर्मचारी कवेश चामाटे तहसील कार्यालय येथे आठवड्यातील प्रत्येक सोमवार व बुधवारी उपस्थित राहत असून, बाकी दिवस सावनेर उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे सेवा संलग्न आहेत. आठवड्यातील फक्त दोनच दिवस तहसील कार्यालय कळमेश्वर येथे कार्यरत राहत असल्यामुळे जनतेची कामे खोळंबत असून, नागरिकांना इतर दिवशी खाली हात परत जावे लागते. सद्यस्थितीत गारपीट अनुदान वाटप चालू असून ज्या शेतकऱ्यांचे खाते क्रमांक चुकीमुळे किंवा इतर कारणांमुळे रक्कम जमा झालेली नसेल असे शेतकरी तहसील कार्यालयात येतात आणि कर्मचारी नसल्यामुळे परत जातात. तालुक्यातील ग्रामीण भागातून शेतकरीवर्ग तहसील कार्यालयात येतात. कर्मचारी नसल्यामुळे अनुदानाची महिती मिळत नाही. त्यामुळे पूर्णवेळ आणि आठवड्यातील पूर्ण दिवस कर्मचारी असण्याची मागणी होत आहे.