शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

मूल्यांकन व प्रवेश धाेरण वादाच्या भाेवऱ्यात; ग्रामीण विद्यार्थ्यांना पडावे लागेल गावाबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 05:30 IST

Nagpur News राज्य शालेय शिक्षण विभागाने वर्ग १० वीचे मूल्यांकन आणि ११ वीच्या प्रवेशासाठी तयार केलेले धाेरण वादाच्या भाेवऱ्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे धाेरण सुटसुटीत करण्याऐवजी आणखी गुंतागुंतीचे केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देहुशार विद्यार्थ्यांवर परिणामाची शक्यता 

आशिष दुबे

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य शालेय शिक्षण विभागाने वर्ग १० वीचे मूल्यांकन आणि ११ वीच्या प्रवेशासाठी तयार केलेले धाेरण वादाच्या भाेवऱ्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे धाेरण सुटसुटीत करण्याऐवजी आणखी गुंतागुंतीचे केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे हुशार विद्यार्थ्यांना नुकसान हाेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वर्ग १० वीचा निकाल आंतरिक मूल्यांकनाच्या आधारावर घाेषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत निर्धारित निकषानुसार विद्यार्थ्यांच्या वर्षभराच्या आंतरिक मूल्यांकनाचे ३० गुण दिले जातील. हाेमवर्क, ताेंडी परीक्षा, प्रयाेग परीक्षेच्या आधारावर २० गुण दिले जातील. इयत्ता ९ वीच्या विषयवार अंतिम निकालाच्या आधारे ५० टक्के आणि १० वीच्या आंतरिक मूल्यांकनाच्या ५० टक्केच्या आधारे ५० गुण दिले जाणार आहेत. मात्र गेल्या वर्षीही काेराेनामुळे वर्ग ९ ची परीक्षा झाली नव्हती. काही शाळा साेडल्या तर बहुतेक शाळांमध्ये वर्ग १० वीचे ऑनलाईन व ऑनलाईन वर्गही झालेले नाहीत. अशावेळी आंतरिक मूल्यांकन काेणत्या आधारे करणार, हा माेठा प्रश्न आहे. दुसरीकडे वर्ग ११ वीच्या प्रवेशासाठी सीईटी घेण्याची घाेषणा केली, पण तीही ऐच्छिक ठेवण्यात आली आहे. मात्र ११ वीमध्ये प्रवेश घेण्यासाठी सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही सांगितले गेले आहे. त्यांचा प्रवेश झाल्यानंतरच रिक्त जागांवर सीईटी न देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. मात्र ११ वीच्या प्रवेशाची प्रक्रिया कधीपर्यंत चालणार, सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांचे किती राऊंड हाेतील, एखाद्या महाविद्यालयात जागा शिल्लक राहिल्या नाही तर विद्यार्थ्यांना प्रवेश कसा मिळणार, असे अनेक प्रश्न उपस्थित हाेत आहेत. हे प्रश्न यासाठी कारण, ११ वीत प्रवेश घेताना विद्यार्थी घराजवळच्या महाविद्यालयांना प्राधान्य देत असतात. शिक्षण विभागाच्या या धाेरणामुळे विद्यार्थ्यांना दूरवरच्या महाविद्यालयात जावे लागणार आहे.

सीबीएसई व आयसीएसईचे विद्यार्थी कुठे जाणार?

शालेय शिक्षण विभागाने ११ वीचे प्रवेश घेताना सीबीएसई, आयसीएसई व ओपन स्कूल बाेर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी काय निकष असणार, हे स्पष्ट केले नाही. या विद्यार्थ्यांना सीईटी द्यावी लागणार की नाही, या विद्यार्थ्यांसाठी काेणता अभ्यासक्रम असेल, या विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमाच्या आधारावर सीईटी द्यावी लागणार, अशा अनेक प्रश्नांचे उत्तर स्पष्ट नाही.

ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी धाेरण स्पष्ट नाही

ग्रामीण व दूरवरच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी काय धाेरण आहे, हेही स्पष्ट नाही. त्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना ११ वीत प्रवेश कसे मिळाणार, हा प्रश्नच आहे. या विद्यार्थ्यांचे ९ वी व १० वीचे मूल्यांकन कसे हाेणार, हा सुद्धा यक्षप्रश्न आहे.

टॅग्स :ssc examदहावीEducation Sectorशिक्षण क्षेत्र