शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

देशभरातील २१ हजार किमीच्या रस्त्यांचे मूल्यांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 11:33 IST

सुमारे तीन हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे तांत्रिक उन्नतीकरण करण्यात येत आहे. या उन्नतीकरणामुळे रस्ते अपघातांमध्ये ५० टक्क्यांची घट होईल, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तसेच सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

ठळक मुद्दे रस्ते उन्नतीकरणामुळे अपघातात ५० टक्क्यांची घट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय रस्ते सुरक्षा मूल्यमापन ही काळाची आवश्यकता आहे. या कार्यक्रमांतर्गत देशातील २१ हजार किलोमीटरच्या रस्त्यांचे मूल्यांकन करण्यात आले आहे. शिवाय सुमारे तीन हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे तांत्रिक उन्नतीकरण करण्यात येत आहे. या उन्नतीकरणामुळे रस्ते अपघातांमध्ये ५० टक्क्यांची घट होईल, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तसेच सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

भारत आणि आॅस्ट्रेलिया या दोन्ही देशांकडून रस्ते सुरक्षा क्षेत्रात अगोदरपासून संयुक्तपणे काम करण्यात येत आहे. या सहकार्यातूनच लोकांसाठी रस्ते सुरक्षा आणि जागरूकता अभियान राबविण्यात येत आहे. २०३० पर्यंत शून्य रस्ते अपघाताचे आमचे लक्ष्य आहे. रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी मंत्रालयाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. या उपक्रमासाठी जागतिक बँक आणि एडीबीने सात हजार कोटी रुपये निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. सामाजिक जागरूकता आणि शिक्षण, आपात्कालीन सेवांमध्ये सुधारणा, वैद्यकीय विम्यावर अधिक भर, रुग्णालयाच्या सेवा अधिक उपलब्ध करणे यामुळे रस्ता सुरक्षेचे लक्ष्य गाठण्यापर्यंत आम्ही पोहोचलो आहे, असेदेखील नितीन गडकरी म्हणाले.

२०१९ चा मोटर वाहन कायदा भारतातील परिवहन क्षेत्राच्या सर्व बाबींविषयी सर्वसमावेशक कायदा आहे, असेही ते म्हणाले. आॅटोमोबाईल क्षेत्र आणि एमएसएमई भारतीय अर्थव्यवस्थेचे विकास इंजिन आहेत. देशात निर्माण होणाऱ्या पायाभूत सुविधा आणि सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योगांच्या क्षेत्रात परकीय गुंतवणूक करा, असे आवाहनदेखील त्यांनी केले.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षा