शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

विधानसभा निवडणूक; कृष्णाचा विजयरथ रोखणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 11:36 IST

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पूर्व नागपूर मतदारसंघात सध्या भाजपचा बोलबाला आहे. गेल्या दोन निवडणुकीत भाजपचे आ. कृष्णा खोपडे यांनी मोठ्या मताधिक्क्याने ही जागा जिंकत विरोधकांना धक्का दिला आहे.

ठळक मुद्देशिवसेनेच्या हालचाली वाढल्याकाँग्रेसची तयारी जोरात पण भाजपचा जोर कायमराष्ट्रवादीचा तगडा दावा

कमलेश वानखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पूर्व नागपूर मतदारसंघात सध्या भाजपचा बोलबाला आहे. गेल्या दोन निवडणुकीत भाजपचे आ. कृष्णा खोपडे यांनी मोठ्या मताधिक्क्याने ही जागा जिंकत विरोधकांना धक्का दिला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीतील मताधिक्य विरोधकांना धडकी भरविण्यासाठी पुरेसे आहे. मात्र, काँग्रेस येथे पूर्ण ताकदीने कामाला लागली आहे. राष्ट्रवादीनेही या मतदारसंघावर दावा केला असून शिवसेनाही एकाएक सक्रिय झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कृष्णा खोपडेंचा विजयरथ रोखला जाणार की ते विजयाची हॅट्ट्रिक मारणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.पूर्व नागपुरात २००९ पूर्वी सलग पाच वेळा काँग्रेस जिंकत आली आहे. २००९ च्या निवडणुकीत भाजपाने कृष्णा खोपडे यांना रिंगणात उतरविले. त्यांच्यासमोर तत्कालीन मंत्री काँग्रेस नेते सतीश चतुर्वेदी यांचे तगडे आव्हान होते. खोपडे यांचा जनसंपर्क दांडगा होता तर चतुर्वेदी यांची मतदारसंघावर पकड होती. अशात काट्याची फाईट होईल, अशी शक्यता वर्तविली गेली. मात्र, निकाल आला तेव्हा खोपडे यांनी तब्बल ३५ हजार २१६ मतांनी एकतर्फी विजय नोंदविला. चतुर्वेदींचे प्रस्थ मोडित काढले. ‘कृष्णाने एकहाती गोवर्धन पेलला’ याचीच चर्चा झाली. खोपडे यांना ८८ हजार ८१४ मते मिळाली तर चतुर्वेदी ५३ हजार ५५९ मतांवर थांबले. बसपाचा फारसा जोर राहिला नाही. जी.एम. खान यांना फक्त ५२५२ मते मिळाली. पहिल्यांदा विधानसभेच्या रिंगणात उतरलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही फेल ठरली. माजी नगरसेवक मोरेश्वर धोटे यांना जेमतेम ३१९६ मते मिळाली.२०१४ मध्ये तब्बल २१ उमेदवार रिंगणात होते. भाजपकडून पुन्हा खोपडे मैदानात उतरले. यावेळी चतुर्वेदी मतदारसंघ बदलून दक्षिणमध्ये गेले व अभिजित वंजारी काँग्रेसचे उमेदवार झाले. वंजारी युवा चेहरा होते. फाईट तगडी होईल, असे वाटत असताना खोपडे याही निवडणुकीत ४८ हजार ४७४ मतांनी एकतर्फी जिंकले. खोपडे यांना ९८ हजार ९४३ मते मिळाली तर वंजारी यांना ५० हजार ४६९ मते मिंळाली. या निवडणुकीत काँग्रेसची मते घटली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना वेगवेगळी लढली होती. राष्ट्रवादीचे नगरसेवक दुनेश्वर पेठे यांनी ८ हजार ४७ मते घेत स्वत:च्या अस्तित्वाची नोंद केली. शिवसेनेचे अजय दलाल यांना ७ हजार ४७१ मतांवर समाधान मानावे लागले. बसपाची मते मात्र दुपटीहून वाढली. दिलीप रंगारी यांना १२ हजार १३६ मते मिळाली.आ. कृष्णा खोपडे यांना तसे पक्षांतर्गत आव्हान नाही. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाल्या बोरकर इच्छुक आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीत गडकरींना मिळालेल्या एकतर्फी आघाडीमुळे खोपडे यांचे तिकीट पक्के मानले जात आहे.काँग्रेसकडून यावेळीही अ‍ॅड. अभिजित वंजारी इच्छुक आहेत तर प्रदेश सचिव उमाकांत अग्निहोत्री यांनीही दावा केल्यामुळे अंतर्गत रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. महापालिकेचे विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, माजी महापौर नरेश गावंडे, नगरसेवक पुरुषोत्तम हजारे देखील तयारीत आहेत. काँग्रेसचे सर्वच इच्छुक जोरात कामाला लागले आहेत. काँग्रेसचा येथे सातत्याने पराभव होत असल्यामुळे ही जागा यावेळी काँग्रेससाठी सोडावी, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून लढलेले व महापालिकेच्या निवडणुकीत विजयी झालेले एकमेव नगरसेवक व पक्षाचे गटनेते दुनेश्वर पेठे इच्छुक आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र लढण्याशिवाय पर्याय नाही, यावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे एकमत आहे.शिवसेनेची सक्रियता मतदारसंघात एकाएक वाढली आहे. माजी खासदार प्रकाश जाधव, अलका दलाल, चिंटू महाराज, गुड्डू रहांगडाले आदी इच्छुक आहेत. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे पुत्र दुष्यंत यांनी नुकतेच शिवसेनेत प्रवेश केला. ते देखील दक्षिणसह पूर्ववर दावा करू शकतात. बसपा व वंचित बहुजन आघाडीने अद्याप पत्ते उघडलेले नाही. नगरसेविका आभा पांडे अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.समााजिक समीकरणावर भरपूर्व नागपुरात तेली समाजाचे प्राबल्य आहे. त्यापाठोपाठ हिंदी भाषिक व छत्तीसगडी समाजाची संख्या मोठी आहे. कुणबी समाजाचेही दखलपात्र अस्तित्व आहे. त्यामुळे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सामाजिक समीकरणांचा मेळ बसविण्याचे प्रयत्न सर्वच पक्षाकडून होतील. आपल्या विरोधकाची मते कापण्यासाठीही आतापासूनच रणनीती आखणे सुरू झाले आहे.लोकसभेत गडकरींना दिले ७५ हजारावर मताधिक्य४२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पूर्व नागपुरातून भाजप नेते नितीन गडकरी यांना १ लाख ३५ हजार ४५१ मते मिळाली होती तर काँग्रेसचे नाना पटोले ६० हजार ७१ मतांपर्यंत मजल मारू शकले. गडकरींना तब्बल ७५ हजार ३८० मतांची आघाडी मिळाली. बसपा व वंचित बहुजन आघाडीचा जोर चालला नाही. बीआरएसपी तर ५०० मतांवरही पोहचू शकली नाही.

टॅग्स :Electionनिवडणूक