शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

विधानसभा निवडणूक; कृष्णाचा विजयरथ रोखणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 11:36 IST

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पूर्व नागपूर मतदारसंघात सध्या भाजपचा बोलबाला आहे. गेल्या दोन निवडणुकीत भाजपचे आ. कृष्णा खोपडे यांनी मोठ्या मताधिक्क्याने ही जागा जिंकत विरोधकांना धक्का दिला आहे.

ठळक मुद्देशिवसेनेच्या हालचाली वाढल्याकाँग्रेसची तयारी जोरात पण भाजपचा जोर कायमराष्ट्रवादीचा तगडा दावा

कमलेश वानखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पूर्व नागपूर मतदारसंघात सध्या भाजपचा बोलबाला आहे. गेल्या दोन निवडणुकीत भाजपचे आ. कृष्णा खोपडे यांनी मोठ्या मताधिक्क्याने ही जागा जिंकत विरोधकांना धक्का दिला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीतील मताधिक्य विरोधकांना धडकी भरविण्यासाठी पुरेसे आहे. मात्र, काँग्रेस येथे पूर्ण ताकदीने कामाला लागली आहे. राष्ट्रवादीनेही या मतदारसंघावर दावा केला असून शिवसेनाही एकाएक सक्रिय झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कृष्णा खोपडेंचा विजयरथ रोखला जाणार की ते विजयाची हॅट्ट्रिक मारणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.पूर्व नागपुरात २००९ पूर्वी सलग पाच वेळा काँग्रेस जिंकत आली आहे. २००९ च्या निवडणुकीत भाजपाने कृष्णा खोपडे यांना रिंगणात उतरविले. त्यांच्यासमोर तत्कालीन मंत्री काँग्रेस नेते सतीश चतुर्वेदी यांचे तगडे आव्हान होते. खोपडे यांचा जनसंपर्क दांडगा होता तर चतुर्वेदी यांची मतदारसंघावर पकड होती. अशात काट्याची फाईट होईल, अशी शक्यता वर्तविली गेली. मात्र, निकाल आला तेव्हा खोपडे यांनी तब्बल ३५ हजार २१६ मतांनी एकतर्फी विजय नोंदविला. चतुर्वेदींचे प्रस्थ मोडित काढले. ‘कृष्णाने एकहाती गोवर्धन पेलला’ याचीच चर्चा झाली. खोपडे यांना ८८ हजार ८१४ मते मिळाली तर चतुर्वेदी ५३ हजार ५५९ मतांवर थांबले. बसपाचा फारसा जोर राहिला नाही. जी.एम. खान यांना फक्त ५२५२ मते मिळाली. पहिल्यांदा विधानसभेच्या रिंगणात उतरलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही फेल ठरली. माजी नगरसेवक मोरेश्वर धोटे यांना जेमतेम ३१९६ मते मिळाली.२०१४ मध्ये तब्बल २१ उमेदवार रिंगणात होते. भाजपकडून पुन्हा खोपडे मैदानात उतरले. यावेळी चतुर्वेदी मतदारसंघ बदलून दक्षिणमध्ये गेले व अभिजित वंजारी काँग्रेसचे उमेदवार झाले. वंजारी युवा चेहरा होते. फाईट तगडी होईल, असे वाटत असताना खोपडे याही निवडणुकीत ४८ हजार ४७४ मतांनी एकतर्फी जिंकले. खोपडे यांना ९८ हजार ९४३ मते मिळाली तर वंजारी यांना ५० हजार ४६९ मते मिंळाली. या निवडणुकीत काँग्रेसची मते घटली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना वेगवेगळी लढली होती. राष्ट्रवादीचे नगरसेवक दुनेश्वर पेठे यांनी ८ हजार ४७ मते घेत स्वत:च्या अस्तित्वाची नोंद केली. शिवसेनेचे अजय दलाल यांना ७ हजार ४७१ मतांवर समाधान मानावे लागले. बसपाची मते मात्र दुपटीहून वाढली. दिलीप रंगारी यांना १२ हजार १३६ मते मिळाली.आ. कृष्णा खोपडे यांना तसे पक्षांतर्गत आव्हान नाही. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाल्या बोरकर इच्छुक आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीत गडकरींना मिळालेल्या एकतर्फी आघाडीमुळे खोपडे यांचे तिकीट पक्के मानले जात आहे.काँग्रेसकडून यावेळीही अ‍ॅड. अभिजित वंजारी इच्छुक आहेत तर प्रदेश सचिव उमाकांत अग्निहोत्री यांनीही दावा केल्यामुळे अंतर्गत रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. महापालिकेचे विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, माजी महापौर नरेश गावंडे, नगरसेवक पुरुषोत्तम हजारे देखील तयारीत आहेत. काँग्रेसचे सर्वच इच्छुक जोरात कामाला लागले आहेत. काँग्रेसचा येथे सातत्याने पराभव होत असल्यामुळे ही जागा यावेळी काँग्रेससाठी सोडावी, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून लढलेले व महापालिकेच्या निवडणुकीत विजयी झालेले एकमेव नगरसेवक व पक्षाचे गटनेते दुनेश्वर पेठे इच्छुक आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र लढण्याशिवाय पर्याय नाही, यावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे एकमत आहे.शिवसेनेची सक्रियता मतदारसंघात एकाएक वाढली आहे. माजी खासदार प्रकाश जाधव, अलका दलाल, चिंटू महाराज, गुड्डू रहांगडाले आदी इच्छुक आहेत. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे पुत्र दुष्यंत यांनी नुकतेच शिवसेनेत प्रवेश केला. ते देखील दक्षिणसह पूर्ववर दावा करू शकतात. बसपा व वंचित बहुजन आघाडीने अद्याप पत्ते उघडलेले नाही. नगरसेविका आभा पांडे अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.समााजिक समीकरणावर भरपूर्व नागपुरात तेली समाजाचे प्राबल्य आहे. त्यापाठोपाठ हिंदी भाषिक व छत्तीसगडी समाजाची संख्या मोठी आहे. कुणबी समाजाचेही दखलपात्र अस्तित्व आहे. त्यामुळे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सामाजिक समीकरणांचा मेळ बसविण्याचे प्रयत्न सर्वच पक्षाकडून होतील. आपल्या विरोधकाची मते कापण्यासाठीही आतापासूनच रणनीती आखणे सुरू झाले आहे.लोकसभेत गडकरींना दिले ७५ हजारावर मताधिक्य४२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पूर्व नागपुरातून भाजप नेते नितीन गडकरी यांना १ लाख ३५ हजार ४५१ मते मिळाली होती तर काँग्रेसचे नाना पटोले ६० हजार ७१ मतांपर्यंत मजल मारू शकले. गडकरींना तब्बल ७५ हजार ३८० मतांची आघाडी मिळाली. बसपा व वंचित बहुजन आघाडीचा जोर चालला नाही. बीआरएसपी तर ५०० मतांवरही पोहचू शकली नाही.

टॅग्स :Electionनिवडणूक