शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

अधिकार मागितला; लाठ्या मिळाल्या

By admin | Updated: April 3, 2016 03:52 IST

शासकीय सुविधांचा लाभ मिळावा, या मागणीसाठी वर्धा रोडवरील विमानतळासमोर चक्का जाम करण्याचा प्रयत्न करीत असलेल्या आंदोलनकर्त्या निराधार, ....

विमानतळासमोर रास्ता रोको आंदोलन : पोलीस व आंदोलनकर्त्या महिलात वादनागपूर : शासकीय सुविधांचा लाभ मिळावा, या मागणीसाठी वर्धा रोडवरील विमानतळासमोर चक्का जाम करण्याचा प्रयत्न करीत असलेल्या आंदोलनकर्त्या निराधार, निराश्रित महिलाना पांगविण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करीत लाठीहल्ला केला. शनिवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट व परिसरातील शासकीय योजनांपासून वंचित असलेल्या गरीब, मजूर, निराश्रित, निराधार, परित्यक्त्या, नेत्रहीन आदी महिलांनी क्रांतिकारी शेतकरी महिला संघटनेच्या बॅनरअंतर्गत आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान वर्धा रोडवर विमानतळासमोर आंदोलन केले. ५०० पेक्षा अधिक महिला हातात लाटणे घेऊन खासगी वाहनाने आल्या होत्या. रास्ता रोको करण्याचा या महिलांचा प्रयत्न होता. त्यामुळे आंदोलनाचे नेतृत्व करीत असलेल्या मंदा ठवरे, शुभांगी पोटे, छाया दानव व इतरांना पोलिसांनी बळजबरीने ताब्यात घेतले. त्यांना अगोदर सोनेगाव व नंतर इतर ठिकाणी नेण्यात आले. नेते नसल्याने आंदोलन नेतृत्वहीन झाले. महिला नारेबाजी करीत सोनेगाव पोलीस ठाण्यात धडकल्या. त्यामुळे पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाली. काही वेळ दोन्हींकडून धक्काबुक्की झाली. आंदोलनकर्त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करीत लाठ्या चालवल्या. यात एका आंदोलनकर्त्या महिलेचा हात रक्तबंबाळ झाला. एका महिलेच्या कडेवर लहान मुलगा होता. त्याच्या पायावरही लाठीचा मार बसला. आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या या महिलांना मुख्यमंत्र्यांना भेटून आपले निवेदन द्यायचे होते. परंतु त्यांना ना मुख्यमंत्र्यांना भेटू देण्यात आले, ना कुणी त्यांना भेटायला आले. सायंकाळी उशिरापर्यंत या महिला ठाण मांडून होत्या. परंतु त्यांना एकही लोकप्रतिनिधी भेटायला आला नाही. अशा होत्या मागण्या...आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांमध्ये शासकीय योजना लागू करण्याच्या मागणीसोबतच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात, सिंचन योजना लागू करावी, शेतकऱ्यांच्या मालासाठी शेतकऱ्यांनाच बोली लावू द्यावी, कर्जमाफी मिळावी, वृद्ध शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना, विधवा महिलांचे पुनर्वसन, मुलगी झाली म्हणून पतीने सोडलेल्या महिलांसाठी धोरण तयार व्हावे, विदर्भातील बेरोजगारांना नोकरी मिळावी, मालकी हक्काचे पट्टे आदी मागण्यांचा समावेश होता.