शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

डीबीटीतील खरेदीवरून आशिष जयस्वाल यांचा आत्मा कार्यालयात रुद्रावतार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:13 IST

नागपूर : आत्मा प्रकल्पातून शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून मिळणाऱ्या साहित्यामध्ये प्रचंड गैरप्रकार आणि सौद्यातून कमिशनबाजी होत असल्याचा आरोप करीत आमदार ...

नागपूर : आत्मा प्रकल्पातून शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून मिळणाऱ्या साहित्यामध्ये प्रचंड गैरप्रकार आणि सौद्यातून कमिशनबाजी होत असल्याचा आरोप करीत आमदार आशिष जयस्वाल यांनी कार्यालयात जाऊन प्रचंड संताप व्यक्त केला आणि कार्यालय डोक्यावर घेतले.

आत्मा प्रकल्प कार्यालयातून शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून साहित्याचा पुरवठा होतो. या प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांचा खरेदी हक्क डावलून त्यांच्या माथी निकृष्ट दर्जाचा माल मारला जात असून, बाजारभावापेक्षा अधिक किंमत लावली जात असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी आमदार जयस्वाल यांच्याकडे केली होती. आठवडाभरापूर्वी काही शेतकरी यासंदर्भात विचारणा करण्यासाठी आत्मा कार्यालयात प्रकल्प अधिकाऱ्यांकडे गेले होते. मात्र त्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी ही बाब जयस्वाल यांच्या कानावर घातली. यामुळे दोन दिवसापूर्वी त्यांनी कार्यालयात जाऊन प्रकल्प अधिकाऱ्यांना जाब विचारला आणि प्रचंड संताप व्यक्त केला.

यासंदर्भात ‘लोकमत’कडे प्रतिक्रया देताना आमदार जयस्वाल म्हणाले, जिल्ह्यात शेतकऱ्यांना लागणारी यंत्रसामग्री व विविध वस्तूंचा पुरवठा होण्यासाठी जिल्हा खनिज विकास निधीतून हा प्रस्ताव मंजूर केला. त्यानुसार डीबीटी पद्धतीने ही सर्व यंत्रसामग्री खरेदी करणे आवश्यक होते. मात्र प्रकल्प संचालक (आत्मा) यांच्या कार्यालयाने वेगवेगळ्या कंपनीशी परस्पर पत्रव्यवहार करून कमी किमतीच्या निकृष्ट दर्जाच्या साहित्याची खरेदी केली व ते अधिक दराने शेतकऱ्यांच्या माथी मारले. यात प्रचंड कमिशनबाजी आणि भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

या प्रकल्प कार्यालयाने स्वतःच ऑर्डर टाईप करून त्यामध्ये कंपनीचे नाव टाकले होते. शेतकरी गटातील अध्यक्ष व सचिव यांची बळजबरीने स्वाक्षरी घेत होते. शेतकऱ्यांना माल खरेदी करण्याचा अधिकार नसल्याची दिशाभूल कार्यालयाकडून करण्यात आल्याची शेतकऱ्यांची तक्रार आपल्याकडे असल्याचे जयस्वाल यांनी सांगितले.

यासंदर्भात आत्माच्या प्रकल्प अधिकारी नलिनी भोयर यांची बाजू समजून घेण्यासाठी संपर्क साधला. मात्र होऊ शकला नाही.

...

कोट

शेतकऱ्यांनी आपल्या आवडीनुसार दुकानांमधून माल खरेदी करण्याची मुभा डीबीटी प्रक्रियेत असताना, आत्मा प्रकल्प अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल केली. निकृष्ट दर्जाचा माल पाठविला. यात कमिशनबाजी आणि भ्रष्टाचार असल्याने आपण कार्यालयात विचारणा करण्यासाठी गेलो होतो. यासंदर्भात कृषिमंत्र्यांकडेही तक्रार करणार आहे.

- आशिष जयस्वाल, आमदार

...

...