शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
5
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
6
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
7
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
8
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
9
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
10
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
11
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
12
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
13
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
14
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
15
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
16
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
17
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
18
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
19
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
20
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले

डीबीटीतील खरेदीवरून आशिष जयस्वाल यांचा आत्मा कार्यालयात रुद्रावतार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:13 IST

नागपूर : आत्मा प्रकल्पातून शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून मिळणाऱ्या साहित्यामध्ये प्रचंड गैरप्रकार आणि सौद्यातून कमिशनबाजी होत असल्याचा आरोप करीत आमदार ...

नागपूर : आत्मा प्रकल्पातून शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून मिळणाऱ्या साहित्यामध्ये प्रचंड गैरप्रकार आणि सौद्यातून कमिशनबाजी होत असल्याचा आरोप करीत आमदार आशिष जयस्वाल यांनी कार्यालयात जाऊन प्रचंड संताप व्यक्त केला आणि कार्यालय डोक्यावर घेतले.

आत्मा प्रकल्प कार्यालयातून शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून साहित्याचा पुरवठा होतो. या प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांचा खरेदी हक्क डावलून त्यांच्या माथी निकृष्ट दर्जाचा माल मारला जात असून, बाजारभावापेक्षा अधिक किंमत लावली जात असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी आमदार जयस्वाल यांच्याकडे केली होती. आठवडाभरापूर्वी काही शेतकरी यासंदर्भात विचारणा करण्यासाठी आत्मा कार्यालयात प्रकल्प अधिकाऱ्यांकडे गेले होते. मात्र त्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी ही बाब जयस्वाल यांच्या कानावर घातली. यामुळे दोन दिवसापूर्वी त्यांनी कार्यालयात जाऊन प्रकल्प अधिकाऱ्यांना जाब विचारला आणि प्रचंड संताप व्यक्त केला.

यासंदर्भात ‘लोकमत’कडे प्रतिक्रया देताना आमदार जयस्वाल म्हणाले, जिल्ह्यात शेतकऱ्यांना लागणारी यंत्रसामग्री व विविध वस्तूंचा पुरवठा होण्यासाठी जिल्हा खनिज विकास निधीतून हा प्रस्ताव मंजूर केला. त्यानुसार डीबीटी पद्धतीने ही सर्व यंत्रसामग्री खरेदी करणे आवश्यक होते. मात्र प्रकल्प संचालक (आत्मा) यांच्या कार्यालयाने वेगवेगळ्या कंपनीशी परस्पर पत्रव्यवहार करून कमी किमतीच्या निकृष्ट दर्जाच्या साहित्याची खरेदी केली व ते अधिक दराने शेतकऱ्यांच्या माथी मारले. यात प्रचंड कमिशनबाजी आणि भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

या प्रकल्प कार्यालयाने स्वतःच ऑर्डर टाईप करून त्यामध्ये कंपनीचे नाव टाकले होते. शेतकरी गटातील अध्यक्ष व सचिव यांची बळजबरीने स्वाक्षरी घेत होते. शेतकऱ्यांना माल खरेदी करण्याचा अधिकार नसल्याची दिशाभूल कार्यालयाकडून करण्यात आल्याची शेतकऱ्यांची तक्रार आपल्याकडे असल्याचे जयस्वाल यांनी सांगितले.

यासंदर्भात आत्माच्या प्रकल्प अधिकारी नलिनी भोयर यांची बाजू समजून घेण्यासाठी संपर्क साधला. मात्र होऊ शकला नाही.

...

कोट

शेतकऱ्यांनी आपल्या आवडीनुसार दुकानांमधून माल खरेदी करण्याची मुभा डीबीटी प्रक्रियेत असताना, आत्मा प्रकल्प अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल केली. निकृष्ट दर्जाचा माल पाठविला. यात कमिशनबाजी आणि भ्रष्टाचार असल्याने आपण कार्यालयात विचारणा करण्यासाठी गेलो होतो. यासंदर्भात कृषिमंत्र्यांकडेही तक्रार करणार आहे.

- आशिष जयस्वाल, आमदार

...

...