शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
3
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
4
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
5
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
6
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
7
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
8
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
9
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
10
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
11
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
12
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
13
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
14
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
15
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
16
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
17
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
18
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
19
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
20
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

आशिष जैस्वाल शिवसेनेवर नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:06 IST

नागपूर : सलग चार वेळा आमदार होऊनही मंत्रीपदी वर्णी न लागल्यामुळे रामटेकचे आमदार आशिष जैस्वाल हे नाराज आहेत. बाहेरून ...

नागपूर : सलग चार वेळा आमदार होऊनही मंत्रीपदी वर्णी न लागल्यामुळे रामटेकचे आमदार आशिष जैस्वाल हे नाराज आहेत. बाहेरून आलेल्यांना मंत्रीपदाची संधी मिळते. कार्यकर्त्यांना वाटते की, एवढी वर्षे काम केल्यावर मंत्री करायला हवे. शेवटी कुणाला मंत्री करावे, हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय असतो, अशा शब्दांत जैस्वाल यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

बुधवारी पत्रकारांशी बोलताना आ. जैस्वाल म्हणाले, मी चार टर्म आमदार आहे. पक्षाने संधी न दिल्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत. गेल्या मंत्रिमंडळाचा विस्तार होता तेव्हाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील तो मी मान्य करेन, असे स्पष्ट केले होते. मात्र, ही बाब सत्य आहे की, कार्यकर्त्यांना असे वाटते की, एवढी वर्षे काम केल्यावर संधी मिळायला हवी. विदर्भात शिवसेना वाढली पाहिजे; पण नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत पक्षाचा एकही आमदार नाही. मी तर अपक्ष निवडून आलो. या सर्व परिस्थितीत मनाला वेदना होतात. दुख होते. ते दु:ख नेत्यांपुढे मांडणे माझे काम आहे. संधी मिळते तेव्हा मी ते मांडत असतो, अशा शब्दांत त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखविली.

----------

विदर्भात सेनेचा एकही मंत्री नाही

- विदर्भाला संजय राठोड यांच्या रूपात एक मंत्रीपद होते. दुर्दैवाने त्यांचा राजीनामा झाला. आता विदर्भातील अकरा जिल्ह्यांत शिवसेनेचा एकही मंत्री नाही. जेव्हा केव्हा विस्तार होईल, तेव्हा पक्षप्रमुख विदर्भाला न्याय देतील. तळागाळातील कार्यकर्त्यांना न्याय देतील, अशी खात्री आहे, असेही सांगत जैस्वाल यांनी अप्रत्यक्षपणे मंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली आहे.

--------

कोट....

राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. अनेक अपक्षांना शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रीपद दिले गेले. त्यामुळे माझ्यासारख्या वर्षानुवर्षे काम करणाऱ्या अनेकांना पक्ष न्याय देऊ शकला नाही.

-आ. आशिष जैस्वाल