शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

आशिष जैस्वाल शिवसेनेवर नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:06 IST

नागपूर : सलग चार वेळा आमदार होऊनही मंत्रीपदी वर्णी न लागल्यामुळे रामटेकचे आमदार आशिष जैस्वाल हे नाराज आहेत. बाहेरून ...

नागपूर : सलग चार वेळा आमदार होऊनही मंत्रीपदी वर्णी न लागल्यामुळे रामटेकचे आमदार आशिष जैस्वाल हे नाराज आहेत. बाहेरून आलेल्यांना मंत्रीपदाची संधी मिळते. कार्यकर्त्यांना वाटते की, एवढी वर्षे काम केल्यावर मंत्री करायला हवे. शेवटी कुणाला मंत्री करावे, हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय असतो, अशा शब्दांत जैस्वाल यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

बुधवारी पत्रकारांशी बोलताना आ. जैस्वाल म्हणाले, मी चार टर्म आमदार आहे. पक्षाने संधी न दिल्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत. गेल्या मंत्रिमंडळाचा विस्तार होता तेव्हाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील तो मी मान्य करेन, असे स्पष्ट केले होते. मात्र, ही बाब सत्य आहे की, कार्यकर्त्यांना असे वाटते की, एवढी वर्षे काम केल्यावर संधी मिळायला हवी. विदर्भात शिवसेना वाढली पाहिजे; पण नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत पक्षाचा एकही आमदार नाही. मी तर अपक्ष निवडून आलो. या सर्व परिस्थितीत मनाला वेदना होतात. दुख होते. ते दु:ख नेत्यांपुढे मांडणे माझे काम आहे. संधी मिळते तेव्हा मी ते मांडत असतो, अशा शब्दांत त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखविली.

----------

विदर्भात सेनेचा एकही मंत्री नाही

- विदर्भाला संजय राठोड यांच्या रूपात एक मंत्रीपद होते. दुर्दैवाने त्यांचा राजीनामा झाला. आता विदर्भातील अकरा जिल्ह्यांत शिवसेनेचा एकही मंत्री नाही. जेव्हा केव्हा विस्तार होईल, तेव्हा पक्षप्रमुख विदर्भाला न्याय देतील. तळागाळातील कार्यकर्त्यांना न्याय देतील, अशी खात्री आहे, असेही सांगत जैस्वाल यांनी अप्रत्यक्षपणे मंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली आहे.

--------

कोट....

राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. अनेक अपक्षांना शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रीपद दिले गेले. त्यामुळे माझ्यासारख्या वर्षानुवर्षे काम करणाऱ्या अनेकांना पक्ष न्याय देऊ शकला नाही.

-आ. आशिष जैस्वाल