शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

आशिष जैस्वाल शिवसेनेवर नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:06 IST

नागपूर : सलग चार वेळा आमदार होऊनही मंत्रीपदी वर्णी न लागल्यामुळे रामटेकचे आमदार आशिष जैस्वाल हे नाराज आहेत. बाहेरून ...

नागपूर : सलग चार वेळा आमदार होऊनही मंत्रीपदी वर्णी न लागल्यामुळे रामटेकचे आमदार आशिष जैस्वाल हे नाराज आहेत. बाहेरून आलेल्यांना मंत्रीपदाची संधी मिळते. कार्यकर्त्यांना वाटते की, एवढी वर्षे काम केल्यावर मंत्री करायला हवे. शेवटी कुणाला मंत्री करावे, हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय असतो, अशा शब्दांत जैस्वाल यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

बुधवारी पत्रकारांशी बोलताना आ. जैस्वाल म्हणाले, मी चार टर्म आमदार आहे. पक्षाने संधी न दिल्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत. गेल्या मंत्रिमंडळाचा विस्तार होता तेव्हाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील तो मी मान्य करेन, असे स्पष्ट केले होते. मात्र, ही बाब सत्य आहे की, कार्यकर्त्यांना असे वाटते की, एवढी वर्षे काम केल्यावर संधी मिळायला हवी. विदर्भात शिवसेना वाढली पाहिजे; पण नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत पक्षाचा एकही आमदार नाही. मी तर अपक्ष निवडून आलो. या सर्व परिस्थितीत मनाला वेदना होतात. दुख होते. ते दु:ख नेत्यांपुढे मांडणे माझे काम आहे. संधी मिळते तेव्हा मी ते मांडत असतो, अशा शब्दांत त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखविली.

----------

विदर्भात सेनेचा एकही मंत्री नाही

- विदर्भाला संजय राठोड यांच्या रूपात एक मंत्रीपद होते. दुर्दैवाने त्यांचा राजीनामा झाला. आता विदर्भातील अकरा जिल्ह्यांत शिवसेनेचा एकही मंत्री नाही. जेव्हा केव्हा विस्तार होईल, तेव्हा पक्षप्रमुख विदर्भाला न्याय देतील. तळागाळातील कार्यकर्त्यांना न्याय देतील, अशी खात्री आहे, असेही सांगत जैस्वाल यांनी अप्रत्यक्षपणे मंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली आहे.

--------

कोट....

राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. अनेक अपक्षांना शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रीपद दिले गेले. त्यामुळे माझ्यासारख्या वर्षानुवर्षे काम करणाऱ्या अनेकांना पक्ष न्याय देऊ शकला नाही.

-आ. आशिष जैस्वाल