शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

आगीत धानाच्या गंजीची राख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:25 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रेवराल : मळणी करायला मशीन न मिळाल्याने शेतकऱ्याने २० एकरातील धानाच्या पिकाची कापणी करून शेतातच गंजी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रेवराल : मळणी करायला मशीन न मिळाल्याने शेतकऱ्याने २० एकरातील धानाच्या पिकाची कापणी करून शेतातच गंजी लावून ठेवली हाेती. या गंजीला आग लागली आणि त्यात संपूर्ण धान जळून राख झाले. यात आठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्याने दिली. ही घटना माैदा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील सुंदरगाव शिवारात बुधवारी (दि. ६) रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली, असून, गुरुवारी (दि. ७) सकाळी उघडकीस आली.

चंद्रकांत ज्ञानेश्वर नरड, रामेश्वर वसंता नरड, शंकर ज्ञानेश्वर नरड व वसंता सदाशिव नरड सर्व रा. नागपूर व रामबाण केशव फुलझेले, रा. सुंदरगाव, ता. माैदा यांची सुंदरगाव शिवारात शेती असून, या सर्वांची शेती खेमराज भोंदू वाडीभस्मे, रा. भेंडाळा, ता. माैदा यांनी ठेक्याने केली आहे. खेमराज यांनी या सर्व २० एकरात धानाची राेवणी केली हाेती. पिकाची कापणी केल्यानंतर संपूर्ण पीक एकाच ठिकाणी गंजी करून ठेवले हाेते.

वेळीच मशीन न मिळाल्याने मळणी करायला विलंब झाला हाेता. त्यातच मशीन मालकाने त्यांना हाेकार दिल्याने त्यांनी राईस मिलवरून बारदान्याची जुळवाजुळव केली हाेती. मळणीला गुरुवार (दि. ७)पासून सुरुवात केली जाणार हाेती. मात्र, त्याआधीच बुधवारी रात्री त्यांच्या धानाच्या गंजीला आग लागली आणि संपूर्ण गंजी जळून राख झाली. यात आठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती खेमराज वाडीभस्मे यांनी पाेलिसांना दिली.

त्यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली असून, पाेलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. ही गंजी जाळण्यात आल्याचा आराेप त्यांनी केला असून, पाेलिसांना काही संशयितांची नावेही सांगितली. त्यांच्याकउून आपल्या जीवितास धाेका असल्याचेही शेतकऱ्याने पाेलिसांना सांगितले. याप्रकरणी माैदा पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.

....

एकरी ३० हजार रुपये खर्च

शेतकऱ्यांना नागपूरहून ये-जा करीत शेती करणे परवडत नसल्याने त्यांनी ही शेती खाेमराज वाडीभस्मे यांना ठेक्याने दिली आहे. मागील वर्षी खाेमराज यांना याच २० एकरात ५५० पाेती धानाचे उत्पादन झाले हाेते. यावर्षी धानाच्या पिकावर तुडतुड्यांचा प्रदुर्भाव झाल्याने किमान ४०० पाेती धानाचे उत्पादन हाेणार असल्याची त्यांना आशा हाेती. धानाच्या उत्पादनासाठी त्यांनी एकरी ३० हजार रुपयांचा खर्च केला हाेता. त्यशसाठी कर्ज घेतले हाेते. आगीत नुकसान झाल्याने कर्जाची परतफेड कशी करावी, असा प्रश्न खेमराज वाडीभस्मे यांच्यासमाेर निर्माण झाला आहे.