शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
2
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
3
पुन्हा राज्यसभेवर संधी मिळेल का? मोदी सरकारमधील सहा मंत्र्यांची 2026 मध्ये ‘अग्निपरीक्षा’
4
सरकारी कर्मचारी दांपत्यांना दिलासा! पती-पत्नीची एकाच शहरात नियुक्ती करण्याचे केंद्राचे निर्देश
5
Accident : भाड्याने थार घेतली, गर्लफ्रेंडला भेटायला निघाला; समोर कुटुंब दिसताच गाडी पळवू लागला अन्... 
6
Ola Electric ला सरकारकडून मिळणार ३६६.७८ कोटी रुपयांचा मोठा दिलासा; शेअरमध्ये जोरदार तेजी, जाणून घ्या
7
क्रिकेटमधील उल्लेखनीय कामगिरीची दखल; वैभव सूर्यवंशीचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरव
8
सर्व (पक्ष) समावेशक भाजपा नीती! काँग्रेस रिकामी, उद्धवसेनेचे घर खाली, मनसेचा कणा मोडला
9
कोंबडी आधी की अंडं? शतकानुशतके पडलेल्या या जुन्या प्रश्नाचं उत्तर अखेर वैज्ञानिकांना सापडलं
10
तुम्ही सुद्धा 'हर्बल टी' पिता का? FSSAI नं कंपन्यांना दिला इशारा, नक्की प्रकरण काय?
11
Girish Mahajan : भाजपामध्ये प्रवेशाचे 'महाभारत'; मंत्री गिरीश महाजन यांना घेराव; निष्ठावंतांवरच अन्याय का?
12
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
13
Viral : टेक्नोलॉजिया! अवघ्या एका विटेत पठ्ठ्याने तयार केला रूम हीटर; ५० रुपयांच्या खर्चात थंडी केली गायब
14
ऑनलाइन सेवा विस्कळीत होणार? 'या' ९ मागण्यांसाठी डिलिव्हरी बॉईजचे देशव्यापी आंदोलन
15
शिंदेसेनेकडून ४२ जागांचा प्रस्ताव, जागा वाटपाचा तिढा सुटेना; तीन मंत्र्यांसह नेत्यांची जंबो बैठक
16
"मला खूप दुखतंय...", उपचारांसाठी ८ तास वेटिंग; कॅनडात वडिलांसमोर भारतीयाचा तडफडून मृत्यू
17
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
18
महापालिका निवडणूक: मतांचे विभाजन कोणाच्या पथ्यावर? काँग्रेसचे गणित बिघडण्याची शक्यता! 
19
Shyam Dhani Industries IPO: मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
20
कंपनीच्या CEO चा कारनामा, आयटी मॅनेजरसोबत गँगरेप; कारच्या डॅशकॅम सगळं रेकॉर्ड झालं, मग...
Daily Top 2Weekly Top 5

आगीत धानाच्या गंजीची राख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:25 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रेवराल : मळणी करायला मशीन न मिळाल्याने शेतकऱ्याने २० एकरातील धानाच्या पिकाची कापणी करून शेतातच गंजी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रेवराल : मळणी करायला मशीन न मिळाल्याने शेतकऱ्याने २० एकरातील धानाच्या पिकाची कापणी करून शेतातच गंजी लावून ठेवली हाेती. या गंजीला आग लागली आणि त्यात संपूर्ण धान जळून राख झाले. यात आठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्याने दिली. ही घटना माैदा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील सुंदरगाव शिवारात बुधवारी (दि. ६) रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली, असून, गुरुवारी (दि. ७) सकाळी उघडकीस आली.

चंद्रकांत ज्ञानेश्वर नरड, रामेश्वर वसंता नरड, शंकर ज्ञानेश्वर नरड व वसंता सदाशिव नरड सर्व रा. नागपूर व रामबाण केशव फुलझेले, रा. सुंदरगाव, ता. माैदा यांची सुंदरगाव शिवारात शेती असून, या सर्वांची शेती खेमराज भोंदू वाडीभस्मे, रा. भेंडाळा, ता. माैदा यांनी ठेक्याने केली आहे. खेमराज यांनी या सर्व २० एकरात धानाची राेवणी केली हाेती. पिकाची कापणी केल्यानंतर संपूर्ण पीक एकाच ठिकाणी गंजी करून ठेवले हाेते.

वेळीच मशीन न मिळाल्याने मळणी करायला विलंब झाला हाेता. त्यातच मशीन मालकाने त्यांना हाेकार दिल्याने त्यांनी राईस मिलवरून बारदान्याची जुळवाजुळव केली हाेती. मळणीला गुरुवार (दि. ७)पासून सुरुवात केली जाणार हाेती. मात्र, त्याआधीच बुधवारी रात्री त्यांच्या धानाच्या गंजीला आग लागली आणि संपूर्ण गंजी जळून राख झाली. यात आठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती खेमराज वाडीभस्मे यांनी पाेलिसांना दिली.

त्यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली असून, पाेलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. ही गंजी जाळण्यात आल्याचा आराेप त्यांनी केला असून, पाेलिसांना काही संशयितांची नावेही सांगितली. त्यांच्याकउून आपल्या जीवितास धाेका असल्याचेही शेतकऱ्याने पाेलिसांना सांगितले. याप्रकरणी माैदा पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.

....

एकरी ३० हजार रुपये खर्च

शेतकऱ्यांना नागपूरहून ये-जा करीत शेती करणे परवडत नसल्याने त्यांनी ही शेती खाेमराज वाडीभस्मे यांना ठेक्याने दिली आहे. मागील वर्षी खाेमराज यांना याच २० एकरात ५५० पाेती धानाचे उत्पादन झाले हाेते. यावर्षी धानाच्या पिकावर तुडतुड्यांचा प्रदुर्भाव झाल्याने किमान ४०० पाेती धानाचे उत्पादन हाेणार असल्याची त्यांना आशा हाेती. धानाच्या उत्पादनासाठी त्यांनी एकरी ३० हजार रुपयांचा खर्च केला हाेता. त्यशसाठी कर्ज घेतले हाेते. आगीत नुकसान झाल्याने कर्जाची परतफेड कशी करावी, असा प्रश्न खेमराज वाडीभस्मे यांच्यासमाेर निर्माण झाला आहे.