शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
2
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
3
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
4
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
5
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
6
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
7
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
8
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
9
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
10
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
11
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
12
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
13
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
14
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
15
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
16
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
17
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
18
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
19
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
20
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक

आगीत धानाच्या गंजीची राख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:25 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रेवराल : मळणी करायला मशीन न मिळाल्याने शेतकऱ्याने २० एकरातील धानाच्या पिकाची कापणी करून शेतातच गंजी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रेवराल : मळणी करायला मशीन न मिळाल्याने शेतकऱ्याने २० एकरातील धानाच्या पिकाची कापणी करून शेतातच गंजी लावून ठेवली हाेती. या गंजीला आग लागली आणि त्यात संपूर्ण धान जळून राख झाले. यात आठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्याने दिली. ही घटना माैदा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील सुंदरगाव शिवारात बुधवारी (दि. ६) रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली, असून, गुरुवारी (दि. ७) सकाळी उघडकीस आली.

चंद्रकांत ज्ञानेश्वर नरड, रामेश्वर वसंता नरड, शंकर ज्ञानेश्वर नरड व वसंता सदाशिव नरड सर्व रा. नागपूर व रामबाण केशव फुलझेले, रा. सुंदरगाव, ता. माैदा यांची सुंदरगाव शिवारात शेती असून, या सर्वांची शेती खेमराज भोंदू वाडीभस्मे, रा. भेंडाळा, ता. माैदा यांनी ठेक्याने केली आहे. खेमराज यांनी या सर्व २० एकरात धानाची राेवणी केली हाेती. पिकाची कापणी केल्यानंतर संपूर्ण पीक एकाच ठिकाणी गंजी करून ठेवले हाेते.

वेळीच मशीन न मिळाल्याने मळणी करायला विलंब झाला हाेता. त्यातच मशीन मालकाने त्यांना हाेकार दिल्याने त्यांनी राईस मिलवरून बारदान्याची जुळवाजुळव केली हाेती. मळणीला गुरुवार (दि. ७)पासून सुरुवात केली जाणार हाेती. मात्र, त्याआधीच बुधवारी रात्री त्यांच्या धानाच्या गंजीला आग लागली आणि संपूर्ण गंजी जळून राख झाली. यात आठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती खेमराज वाडीभस्मे यांनी पाेलिसांना दिली.

त्यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली असून, पाेलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. ही गंजी जाळण्यात आल्याचा आराेप त्यांनी केला असून, पाेलिसांना काही संशयितांची नावेही सांगितली. त्यांच्याकउून आपल्या जीवितास धाेका असल्याचेही शेतकऱ्याने पाेलिसांना सांगितले. याप्रकरणी माैदा पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.

....

एकरी ३० हजार रुपये खर्च

शेतकऱ्यांना नागपूरहून ये-जा करीत शेती करणे परवडत नसल्याने त्यांनी ही शेती खाेमराज वाडीभस्मे यांना ठेक्याने दिली आहे. मागील वर्षी खाेमराज यांना याच २० एकरात ५५० पाेती धानाचे उत्पादन झाले हाेते. यावर्षी धानाच्या पिकावर तुडतुड्यांचा प्रदुर्भाव झाल्याने किमान ४०० पाेती धानाचे उत्पादन हाेणार असल्याची त्यांना आशा हाेती. धानाच्या उत्पादनासाठी त्यांनी एकरी ३० हजार रुपयांचा खर्च केला हाेता. त्यशसाठी कर्ज घेतले हाेते. आगीत नुकसान झाल्याने कर्जाची परतफेड कशी करावी, असा प्रश्न खेमराज वाडीभस्मे यांच्यासमाेर निर्माण झाला आहे.