शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

विमान प्रवासी वाढले, मार्चपासून उड्डाणेही वाढणार; विमान कंपन्या होणार सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2022 08:40 IST

Nagpur News डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या चार दिवसांपासून विमाने पूर्ण क्षमतेने उड्डाण करीत आहेत. त्यामुळे मार्चपासून उड्डाणे वाढण्याची शक्यता वाढली आहे.

 

वसीम कुरैशी

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या चार दिवसांपासून विमाने पूर्ण क्षमतेने उड्डाण करीत आहेत. त्यामुळे मार्चपासून उड्डाणे वाढण्याची शक्यता वाढली आहे. १ जानेवारीपासून प्रवाशांच्या संख्येत हळूहळू वाढ असल्याचे दिसून येत आहे.

इंडिगो कंपनीचे लखनौ, दिल्ली, मुंबई, बंगळुरू, पुणे, इंदूर, हैदराबाद, अहमदाबाद आणि कोलकाताकरिता उड्डाणे होत आहेत. दररोज १२ ते १४ विमानांचे उड्डाण होत असून मार्चपर्यंत संख्या २० वर जाण्याची शक्यता आहे. सध्या चेन्नई आणि गोवाचे उड्डाण बंद आहे. दोन्ही उड्डाण मार्चपासून सुरू होण्याची शक्यता आहे. अन्य शहरे वगळता केवळ बंगळुरू विमानासाठी आरटीपीसीआर आणि दोन्ही लसीचे प्रमाणात अनिवार्य आहे. त्यामुळे या विमानात प्रवासी संख्या कमी आहे.

गो फर्स्टचे मुंबई विमान १५ पर्यंत रद्द

गो फर्स्टचे सध्या केवळ पुणेकरिता उड्डाण असून १५ फेब्रुवारीपर्यंत मुंबई विमान बंद ठेवले आहे. हे उड्डाण मार्चमध्ये सुरू होणार आहे. यापूर्वी एअर इंडियाने रात्रीचे मुंबई विमान बंद केले होते, पण जानेवारीत हे उड्डाण सुरू झाले आहे.

पाच वर्षांत चार एअरलाईन्स बंद

गेल्या पाच वर्षांत ट्रू जेट, जेट एअरवेज, एअर एशिया आणि कतार एअरलाईन्सने विमानसेवा बंद केली आहे. आता नागपूर विमानतळावरून केवळ इंडिगो, गो फर्स्ट व एअर इंडियाची उड्डाणे सुरू आहेत. रिजनल कनेक्टिव्हिटी योजनेंतर्गत २०२१ मध्ये फ्लॉयबिग एअरलाईन्स सुरू होणार होती. ४ डिसेंबर २०२० ला चाचणी विमान सुरू केले होते. हैदराबाद, इंदूर, नागपूर, अहमदाबाद, भोपाल व रायपूरकरिता विमानाचे संचालन होणार होते, पण कोरोनामुळे त्यावर विराम लागला. गोवा आणि चेन्नई विमान बंद असून नागपुरातून भोपाळ, रायपूर व जयपूरकरिता थेट उड्डाण नाही. गेल्या काही वर्षांपासून या मार्गावर कंपन्यांच्या अनेक प्रयत्नानंतरही उड्डाणे सुरू होऊ शकली नाहीत.

टॅग्स :Airportविमानतळ