शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

जिल्हा परिषदेच्या तब्बल ५१ शाळांत शिक्षकच नाही; शेकडो विद्यार्थ्यांवर शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2023 21:50 IST

Nagpur News जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात शिक्षकांची ७८५ पदे रिक्त आहेत, तर ५१ शाळांत शिक्षकच नसल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

नागपूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात शिक्षकांची ७८५ पदे रिक्त आहेत, तर ५१ शाळांत शिक्षकच नसल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत शिक्षण विभाग गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा दावा कसा करू शकतो, असा सवाल शिक्षण समितीच्या बैठकीत सदस्यांनी उपस्थित केला.

जि.प.च्या शिक्षण समितीची बैठक बुधवारी सभापती राजू कुसुंबे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सदस्या शांता कुमरे यांनी त्यांच्या सर्कलमध्ये २५ शिक्षकांची कमतरता असल्याने नाराजी व्यक्त केली. आपले सर्कल दुर्गम भागात असताना प्रशासनाने शिक्षक उपलब्ध करून देणे आवश्यक होते; परंतु शिक्षक भरतीचे कारण पुढे केले जाते. त्याचा फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसतो आहे. एकीकडे शाळेतील पटसंख्या कमी होत असताना जिथे चांगली पटसंख्या आहे, तिथे शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण कसे मिळणार, असा सवाल त्यांनी केला. सरकार जोपर्यंत शिक्षकभरती करणार नाही, तोपर्यंत कंत्राटी शिक्षकांच्या नियुक्त्या करा, यासाठी १.५० कोटींची तरतूद करण्याची मागणी सदस्यांनी केली. नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जि.प.च्या सुमारे १५१५ शाळा आहेत. जवळपास ७३ हजारांवर विद्यार्थी शिक्षण घेतात. ४५००वर शिक्षकांची पदे मंजूर आहेत. परंतु आज घडीला या ठिकाणी तीन हजार ७९४ शिक्षक कार्यरत आहेत.

सर्वाधिक रिक्त पदे असलेले तालुके

रामटेक १९३, मौदा ११०, पारशिवनी ५७, नरखेड १०८

एकही शिक्षक नसलेल्या शाळा

तालुका शाळा- हिंगणा ३, कळमेश्वर २, मौदा ५, उमरेड ४, भिवापूर ४, नरखेड ९, काटोल ४, रामटेक ४, सावनेर ४, कुही ९, पारशिवनी ३

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र