शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य, विचारातूनच कलाकृती अस्सल होते

By admin | Updated: February 1, 2016 02:47 IST

कुठल्याही कलाकृतीसाठी साहित्याचे भान आवश्यक असते. साहित्य माणसाला समृद्ध करते आणि अनेक अनुभवांची शिदोरी देते.

दिग्दर्शक राजदत्त : संस्कार भारतीच्या अक्षरसाधना राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे उद्घाटननागपूर : कुठल्याही कलाकृतीसाठी साहित्याचे भान आवश्यक असते. साहित्य माणसाला समृद्ध करते आणि अनेक अनुभवांची शिदोरी देते. माझा प्रवास इथपर्यंत होऊ शकला त्याचे श्रेय साहित्यालाच आहे. साहित्याचा पाया आणि विचारांचे अधिष्ठान असल्याशिवाय कलाकृती लोकांपर्यंत पोहोचविताच येत नाही, असे मत ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी व्यक्त केले. संस्कार भारतीच्यावतीने अक्षरसाधना राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन बी. आर. ए. मुंडले सभागृह, दक्षिण अंबाझरी मार्ग येथे करण्यात आले होते. याप्रसंगी संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अभिनेता सुबोध भावे, ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ, संमेलनाच्या स्वागताध्यक्षा कांचन गडकरी, आयोजन समितीचे पदाधिकारी विश्राम जामदार, राजन जयस्वाल, आशुतोष अडोणी, विवेक कवठेकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. राजदत्त म्हणाले, मी साहित्याचा आस्वादक आणि वाचक आहे. संत गुलाबराव महाराजांचे साहित्य वाचल्यावर शब्द डोळ्यांनी वाचायचे का, असा प्रश्न पडतो. मनाला दिसतो आणि बुद्धीला कळतो तो खरा शब्द आणि त्यानेच ज्ञान मिळते. कलेची एक भाषा असते, ती भाषा आत्मसात करता आली तर कलाकृती भावते, असे ते म्हणाले. संमेलनाची भूमिका प्रास्ताविकातून विवेक कवठेकर यांनी सांगितली. कांचन गडकरी यांनी संस्कार भारतीच्या कार्यावर प्रकाश टाकला. हे संमेलन कार्यशाळेसारखे असून नवोदितांना लिहिते करण्याचा आणि प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न म्हणजेच संमेलन आहे. यानिमित्ताने घेण्यात आलेल्या कथास्पर्धेत २५० च्यावर कथा आणि कविता स्पर्धेत ६८७ कविता आल्यात. संमेलनाच्या स्मरणिकेत अनेक मान्यवरांचे लेख आहेत. यातील द. भि. कुलकर्णींचा लेख त्यांचा अखेरचाच ठरला पण त्यांचा आशीर्वाद आम्हाला लाभला. याप्रसंगी अनिल शेंडे संपादित अक्षरगंध स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी झाडीबोलीचे संशोधक प्रवर्तक डॉ. हरिश्चंद्र बोरकर, मुक्तिवाहिनीचे डॉ. का. रा. वालदेकर, अंकुर साहित्य संमेलनाच्या रेखाताई शेकोकार, मुलांचे मासिकचे जयिता आणि जयंत मोडक यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कथा स्पर्धेतील विजेते प्रगती वाघमारे, योगेश नार्वेकर, लीलाधर दवंडे आणि शर्वरी पेठकर तर कविता स्पर्धेतील विजेते अनिरुद्ध पांडे, ज्ञानेश्वर बावीस्कर, रोशनकुमार पिलेवान, किरण डोंगरदिवे यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन स्मिता खनगई यांनी केले. प्रारंभी संस्कार भारतीचे गीत आणि नृत्य संस्कार भारतीच्या कलावंतांनी सादर केले. (प्रतिनिधी)