शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक मालकास मारहाण करणारे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क वाडी : ट्रकच्या इंजिनमधील बिघाड दुरुस्त करण्यासाठी आलेल्या तिघांनी ट्रकच्या सुट्याभागाची परस्पर विल्हेवाट लावली. याबाबत विचारणा ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

वाडी : ट्रकच्या इंजिनमधील बिघाड दुरुस्त करण्यासाठी आलेल्या तिघांनी ट्रकच्या सुट्याभागाची परस्पर विल्हेवाट लावली. याबाबत विचारणा करताच त्या तिघांनीही ट्रकमालकास मारहाण केली. यातील तिन्ही आराेपीस वाडी पाेलिसांनी गुरुवारी (दि. १९) रात्री अटक केली असून, त्यांच्याकडून एकूण ३९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

उमाकांत शंकर चौधरी (५०, रा. वैष्णवमाता सोसायटी, महादेवनगर, वाडी), रवींद्र विजय यादव (५३) व संदीप रवींद्र यादव (१९) दाेघेही रा. सुराबर्डी, अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. अशोक मार्कंडेय शुक्ला (५०, रा. मंगलधाम सोसायटी, शाहू ले-आऊट, वाडी) यांच्याकडे एमएच-०४/सीयू-१०४३ क्रमांकाचा ट्रक आहे. या ट्रकच्या इंजिनमध्ये बिघाड निर्माण झाल्याने ताे दुरुस्त करण्यासाठी त्यांनी त्यांच्या ओळखीतील उमाकांतला बाेलावले हाेते.

उमाकांतने रवींद्र व संदीपच्या मदतीने दुरुस्तीला सुरुवात केली. या तिघांनीही त्या ट्रकमधील बॅटरी, मागचे दाेन टायर व ताडपत्रीची परस्पर विल्हेवाट लावली. हा प्रकार लक्षात येताच अशाेक शुक्ला यांनी त्या तिघांनाही विचारणा केली. त्यामुळे तिघांनीही त्यांना शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यामुळे त्यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी वाडी पाेलिसांनी भादंवि ४०६, ३२३, ५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून तिन्ही आराेपींना अटक केली. शिवाय, त्यांच्याकडून त्यांनी चाेरून नेलेले ३९ हजार रुपये किमतीचे साहित्य जप्त केले, अशी माहिती ठाणेदार प्रदीप सूर्यवंशी यांनी दिली. या घटनेचा तपास हेड काॅन्स्टेबल सुनील मस्के करीत आहेत.