शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील रुग्णांसाठी अमरावतीच्या सुपर स्पेशालिटीत व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गेल्या दोन दिवसांत नागपुरात रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. नागपुरात रुग्णांना बेड उपलब्ध होण्यास ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : गेल्या दोन दिवसांत नागपुरात रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. नागपुरात रुग्णांना बेड उपलब्ध होण्यास अडचणी येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने गरज लक्षात घेऊन अमरावती येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये काही बेड नागपूरच्या रुग्णांसाठी राखीव केले आहे. तसेच पुढील काही दिवसांत ग्रामीण भागांमध्ये ऑक्सिजन बेडची उपलब्धता करण्यात येणार आहे. मात्र या काळात ग्रामीण भागातील रुग्णांनी कोणताही वेळ न दवडता ताप, अंगदुखी, सर्दी-पडसा, वास जाणे ही लक्षणे जाणवल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना चाचणी करावी, असे आग्रही आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले.

शहरी भागासोबतच ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत. गेल्या दोन तीन दिवसात रुग्ण संख्या सातत्याने पाच हजारांच्यावर आहे. शुक्रवारी ही संख्या ६ हजारांवर गेली. अशा परिस्थितीत प्रशासन युद्धस्तरावर नागरिकांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करीत आहे. यासाठी अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसोबत संपर्क साधण्यात आला असून, कालपासून काही रुग्ण त्या ठिकाणीदेखील पाठविले जात आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी या परिस्थितीत मेयो, मेडिकल, शालिनीताई मेघे, हॉस्पिटल लता मंगेशकर हॉस्पिटल, एम्स हॉस्पिटल या ठिकाणची बेडची उपलब्धता व अन्य माहितीसाठी कॉल सेंटरचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. प्रशासनातर्फे येत्या दोन-तीन दिवसांत काटोल, कामठी, मौदा, भिवापूर येथे ऑक्सिजन बेडची सुविधा निर्माण करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ग्रामीण भागात कोरोनाची लक्षणे दिसताच लगेच चाचणी करा

ग्रामीण भागातील नागरिकांनी थोडेही लक्षण जाणवताच वेळ न दवडता आरोग्य केंद्र गाठावे. चाचणी करावी यामध्ये आधी रॅपिड टेस्ट करावी व नंतर ती नकारात्मक आल्यास आरपीटीसीआर टेस्ट करावी. जिल्हा नियंत्रण कक्षातील ०७१२-२५६२६६८ व १०७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. बेडची संख्या वाढविण्याचा जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशाद्वारे गठित समितीच्याही बैठकी सुरू आहेत. मात्र नागरिकांनी हे लक्षात घ्यावे की बेड, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर या सगळ्यांना मर्यादा आहेत. त्यामुळे प्राथमिक अवस्थेतच संसर्गाला प्रतिबंध केला पाहिजे. त्यासाठी लवकर टेस्ट करणे गरजेचे आहे, असेही जिल्हाधिकारी ठाकरे यांनी स्पष्ट केले.