शहरं
Join us  
Trending Stories
1
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
2
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
3
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
4
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
5
त्रिभाषा धोरणाला राज्यभरात कसा प्रतिसाद? डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले, “पहिलीपासून हिंदी सक्ती...”
6
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
7
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
8
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
9
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
10
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
11
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
12
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
13
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
14
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
15
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
16
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट
17
Life Lesson: प्रत्येकाची वेळ येते, पण तयारी असावी लागते शेफाली वर्मासारखी आणि 'या' गोष्टीसारखी!
18
जामताडा बनण्याच्या मार्गावर 'हे' शहर; 615 सायबर ठगांना अटक, 100 कोटींची फसवणूक उघड
19
ICC Women's World Cup Winners : "विजयी विश्व तिरंगा प्यारा..." भारतीय 'रन'रागणींनी रचला इतिहास
20
"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा

नागपुरातील रुग्णांसाठी अमरावतीच्या सुपर स्पेशालिटीत व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गेल्या दोन दिवसांत नागपुरात रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. नागपुरात रुग्णांना बेड उपलब्ध होण्यास ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : गेल्या दोन दिवसांत नागपुरात रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. नागपुरात रुग्णांना बेड उपलब्ध होण्यास अडचणी येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने गरज लक्षात घेऊन अमरावती येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये काही बेड नागपूरच्या रुग्णांसाठी राखीव केले आहे. तसेच पुढील काही दिवसांत ग्रामीण भागांमध्ये ऑक्सिजन बेडची उपलब्धता करण्यात येणार आहे. मात्र या काळात ग्रामीण भागातील रुग्णांनी कोणताही वेळ न दवडता ताप, अंगदुखी, सर्दी-पडसा, वास जाणे ही लक्षणे जाणवल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना चाचणी करावी, असे आग्रही आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले.

शहरी भागासोबतच ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत. गेल्या दोन तीन दिवसात रुग्ण संख्या सातत्याने पाच हजारांच्यावर आहे. शुक्रवारी ही संख्या ६ हजारांवर गेली. अशा परिस्थितीत प्रशासन युद्धस्तरावर नागरिकांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करीत आहे. यासाठी अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसोबत संपर्क साधण्यात आला असून, कालपासून काही रुग्ण त्या ठिकाणीदेखील पाठविले जात आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी या परिस्थितीत मेयो, मेडिकल, शालिनीताई मेघे, हॉस्पिटल लता मंगेशकर हॉस्पिटल, एम्स हॉस्पिटल या ठिकाणची बेडची उपलब्धता व अन्य माहितीसाठी कॉल सेंटरचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. प्रशासनातर्फे येत्या दोन-तीन दिवसांत काटोल, कामठी, मौदा, भिवापूर येथे ऑक्सिजन बेडची सुविधा निर्माण करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ग्रामीण भागात कोरोनाची लक्षणे दिसताच लगेच चाचणी करा

ग्रामीण भागातील नागरिकांनी थोडेही लक्षण जाणवताच वेळ न दवडता आरोग्य केंद्र गाठावे. चाचणी करावी यामध्ये आधी रॅपिड टेस्ट करावी व नंतर ती नकारात्मक आल्यास आरपीटीसीआर टेस्ट करावी. जिल्हा नियंत्रण कक्षातील ०७१२-२५६२६६८ व १०७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. बेडची संख्या वाढविण्याचा जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशाद्वारे गठित समितीच्याही बैठकी सुरू आहेत. मात्र नागरिकांनी हे लक्षात घ्यावे की बेड, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर या सगळ्यांना मर्यादा आहेत. त्यामुळे प्राथमिक अवस्थेतच संसर्गाला प्रतिबंध केला पाहिजे. त्यासाठी लवकर टेस्ट करणे गरजेचे आहे, असेही जिल्हाधिकारी ठाकरे यांनी स्पष्ट केले.