शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

९ महिला अधिकाऱ्यांच्या हाती पूर्व व पश्चिम विदर्भाची कमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:06 IST

आनंद डेकाटे नागपूर : आपल्या गुणवत्तेने प्रशासकीय स्तरावर कर्तृत्त्व गाजविलेल्या नऊ महिला अधिकाऱ्यांच्या हाती विदर्भ विकासाची कमान आली आहे. ...

आनंद डेकाटे

नागपूर : आपल्या गुणवत्तेने प्रशासकीय स्तरावर कर्तृत्त्व गाजविलेल्या नऊ महिला अधिकाऱ्यांच्या हाती विदर्भ विकासाची कमान आली आहे. नागपुरात प्राजक्ता लवंगारे-वर्मा विभागीय आयुक्त, नागपूरच्या जिल्हाधिकारी म्हणून विमला आर., अमरावतीत पवनीत कौर, अकोल्यात निमा अरोरा, गोंदियात नयना गुंडे, वर्धेत प्रेरणा देशभ्रतार तर वाशिमच्या सीईओ म्हणून वसुमना पंत, बुलडाण्यात भाग्यश्री विसपुते व चंद्रपुरात मिताली सेठी या महिला अधिकारी रुजू झाल्या आहेत. प्रशासकीय पातळीवर झालेला हा पहिलाच बदल विदर्भ विकासासाठी ‘माईलस्टोन’ ठरणारा आहे.

विदर्भात एकूण ११ जिल्हे आहेत, तर अमरावती व नागपूर हे दोन विभाग आहेत. नागपूरच्या इतिहासात पहिल्यांदाच विभागीय आयुक्तपद एका महिला अधिकाऱ्याकडे आले आहे. प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांचा आतापर्यंतचा कार्यकाळ अतिशय उत्कृष्ट राहिला आहे. विदर्भातील गोसीखुर्दसारखा महत्त्वाचा प्रकल्प तातडीने पूर्णत्वास नेण्यास त्यांच्या अनुभवाचा निश्चितच फायदा होईल. नागपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आर. विमला या राज्य ग्रामीण आजीविका मिशनच्या सीईओ असताना त्यांनी केलेले काम माइलस्टोन ठरले आहे. महिलांचे स्वयंसाहाय्यता गट स्थापून महिला सक्षमीकरणाचे काम त्यांनी केले. त्या उत्तम कवयित्रीसुद्धा आहेत.

पवनीत कौर यांनी जिल्हाधिकारी म्हणून नुकताच पदभार स्वीकारला असून, जिल्ह्यातील पुनर्वसन, कुपोषण आदी समस्या सोडविण्यासाठी योजनांना गती देतानाच पारदर्शकता व गतिमान प्रशासनावर भर देण्याचा विश्वास वर्तविला आहे. गोंदियाच्या जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी यशदाचा उपमहासंचालक म्हणून कारभार पाहिला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षणाद्वारे अपडेट करण्याचे काम त्यांनी यावेळी केले आहे. वर्ध्याच्या जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार या कोरोनाकाळातील परिस्थिती अतिशय उत्तमरीत्या हाताळत आहेत. एकूणच या महिला अधिकारी आपल्या कर्तृत्वाने जिल्हा व विदर्भाला विकासाच्या दिशेने नेण्यास अग्रेसर आहेत.

कायदा व सुव्यवस्थाही

प्रशासकीय कामकाजासोबतच कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारीसुद्धा अमरावती जिल्ह्याच्या पोलीस आयुक्त असलेल्या आरती सिंह या महिलाच समर्थपणे करीत आहेत. आरती सिंह यापूर्वी नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण पोलीस अधीक्षक होत्या. त्यांचा कार्यकाळ हा अतिशय चांगला राहिला. ग्रामीण भागातील अवैध धंदे व गुन्हेगारी त्यांनी बऱ्यापैकी नियंत्रणात ठेवली होती.