शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

९ महिला अधिकाऱ्यांच्या हाती पूर्व व पश्चिम विदर्भाची कमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:06 IST

आनंद डेकाटे नागपूर : आपल्या गुणवत्तेने प्रशासकीय स्तरावर कर्तृत्त्व गाजविलेल्या नऊ महिला अधिकाऱ्यांच्या हाती विदर्भ विकासाची कमान आली आहे. ...

आनंद डेकाटे

नागपूर : आपल्या गुणवत्तेने प्रशासकीय स्तरावर कर्तृत्त्व गाजविलेल्या नऊ महिला अधिकाऱ्यांच्या हाती विदर्भ विकासाची कमान आली आहे. नागपुरात प्राजक्ता लवंगारे-वर्मा विभागीय आयुक्त, नागपूरच्या जिल्हाधिकारी म्हणून विमला आर., अमरावतीत पवनीत कौर, अकोल्यात निमा अरोरा, गोंदियात नयना गुंडे, वर्धेत प्रेरणा देशभ्रतार तर वाशिमच्या सीईओ म्हणून वसुमना पंत, बुलडाण्यात भाग्यश्री विसपुते व चंद्रपुरात मिताली सेठी या महिला अधिकारी रुजू झाल्या आहेत. प्रशासकीय पातळीवर झालेला हा पहिलाच बदल विदर्भ विकासासाठी ‘माईलस्टोन’ ठरणारा आहे.

विदर्भात एकूण ११ जिल्हे आहेत, तर अमरावती व नागपूर हे दोन विभाग आहेत. नागपूरच्या इतिहासात पहिल्यांदाच विभागीय आयुक्तपद एका महिला अधिकाऱ्याकडे आले आहे. प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांचा आतापर्यंतचा कार्यकाळ अतिशय उत्कृष्ट राहिला आहे. विदर्भातील गोसीखुर्दसारखा महत्त्वाचा प्रकल्प तातडीने पूर्णत्वास नेण्यास त्यांच्या अनुभवाचा निश्चितच फायदा होईल. नागपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आर. विमला या राज्य ग्रामीण आजीविका मिशनच्या सीईओ असताना त्यांनी केलेले काम माइलस्टोन ठरले आहे. महिलांचे स्वयंसाहाय्यता गट स्थापून महिला सक्षमीकरणाचे काम त्यांनी केले. त्या उत्तम कवयित्रीसुद्धा आहेत.

पवनीत कौर यांनी जिल्हाधिकारी म्हणून नुकताच पदभार स्वीकारला असून, जिल्ह्यातील पुनर्वसन, कुपोषण आदी समस्या सोडविण्यासाठी योजनांना गती देतानाच पारदर्शकता व गतिमान प्रशासनावर भर देण्याचा विश्वास वर्तविला आहे. गोंदियाच्या जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी यशदाचा उपमहासंचालक म्हणून कारभार पाहिला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षणाद्वारे अपडेट करण्याचे काम त्यांनी यावेळी केले आहे. वर्ध्याच्या जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार या कोरोनाकाळातील परिस्थिती अतिशय उत्तमरीत्या हाताळत आहेत. एकूणच या महिला अधिकारी आपल्या कर्तृत्वाने जिल्हा व विदर्भाला विकासाच्या दिशेने नेण्यास अग्रेसर आहेत.

कायदा व सुव्यवस्थाही

प्रशासकीय कामकाजासोबतच कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारीसुद्धा अमरावती जिल्ह्याच्या पोलीस आयुक्त असलेल्या आरती सिंह या महिलाच समर्थपणे करीत आहेत. आरती सिंह यापूर्वी नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण पोलीस अधीक्षक होत्या. त्यांचा कार्यकाळ हा अतिशय चांगला राहिला. ग्रामीण भागातील अवैध धंदे व गुन्हेगारी त्यांनी बऱ्यापैकी नियंत्रणात ठेवली होती.