शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

कचरा संकलन कंपन्यांची मनमानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : स्वच्छतेत नागपूरचा अव्वल क्रमांक यावा, यासाठी शहरातील कचरा संकलन यंत्रणा सुधारण्याचा निर्णय घेण्यात आला. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : स्वच्छतेत नागपूरचा अव्वल क्रमांक यावा, यासाठी शहरातील कचरा संकलन यंत्रणा सुधारण्याचा निर्णय घेण्यात आला. यातूनच दीड वर्षांपूर्वी दोन कंपन्यांकडे शहरातील कचरा उचलण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. परंतु या कंपन्यांची मनमानी सुरू आहे. कोरोच्या दुसऱ्या लाटेत शहरालगतच्या भागात व बाजारात कचरा संकलनासाठी कर्मचारी दोन-तीन दिवसानंतर जातात. त्यात तोटा वाढल्याचे कारण पुढे करून दोन्ही कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली आहे.

महापालिकेने झोन १ ते ५ मधील कचरा संकलनाची जबाबदारी एजी एन्व्हायरो कंपनीला दिली आहे. तर झोन ६ ते १० मधील कचरा उचलण्याची जबाबदारी बीव्हीजी कंपनीकडे आहे. एजी एन्व्हायरो कंपनीने कोरोनाच्या पहिल्या लाटेत १२३ कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरवून कामावरून कमी केले. तर बीव्हीजी कंपनीने काही महिन्यापूर्वी ११४ कर्मचारी कमी केले. कर्मचारी कमी केल्याचा परिणाम शहरातील कचरा संकलनावर झाला आहे. असे असूनही कर्मचारी कमी करण्याच्या मुद्यावरून मनपा प्रशासनाने हात वर केले आहे.

मनपातील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्याकडे कचरा उचलला जात नसल्याच्या दररोज तक्रारी येत आहेत. त्यांनी शहरातील कचरा उचलला जात नसल्याचा मुद्दा सर्वसाधारण सभेत उपस्थित केला आहे. या विषयावर स्थगन प्रस्ताव आणण्याचा त्यांचा विचार आहे. कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या दोन्ही कंपन्यांचे काम समाधानकारक नसल्याची माहिती तानाजी वनवे यांनी लोकमतला दिली. शहरातील अनेक वस्त्यात दररोज कचरा उचलला जात नाही. कंपन्यांचे वाहन दोन-तीन दिवसांनी येते. वास्तविक बाजार भागातील कचरा दिवसातून दोनदा उचलण्याचा निर्णय झाला होता, परंतु याचे पालन होत नाही. महापालिका प्रशासन यात बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

.....

पूर्ण काम करूनही वेतन अर्धेच

कचऱ्याचे वजन वाढविण्यासाठी दोन्ही कंपन्यांकडून कचऱ्यात माती मिसळण्याचे प्रकार सुरू आहे. कर्मचाऱ्यांकडून महिनाभर काम करून घेतले जाते. परंतु त्यांना १५ ते २० दिवसांचेच वेतन दिले जाते. यासंदर्भात अनेक तक्रारी येत आहेत. कंपन्यांची मनमानी बंद झाली पाहिजे. जो कर्मचारी याला विरोध करतो, त्याला कामावरून कमी केले जाते. यामुळे कर्मचारी दहशतीत असल्याचे तानाजी वनवे यांनी सांगितले.

....

नगरसेवकांच्या तक्रारींची दखल नाही

कचरा संकलनासंदर्भात नागरिक नगरसेवकांकडे तक्रारी करतात. यासंदर्भात कंपनीला सूचना केली तर नगरसेवकांच्या सूचनांची दखल घेतली जात नाही. एजी एन्व्हायरो पदाधिकारी नगरसेवकांच्या तक्रारींची दखल घेत नाही. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. शहरातील कचरा दररोज उचलला गेला पाहिजे. बीव्हीजीमधील अधिकारी बदलले आहे. आधीचे अधिकारी मनमानी करीत होते. कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण होत असल्याच्या तक्रारी असल्याचे वनवे यांनी सांगितले.