शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
3
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
4
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
5
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
6
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
7
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
8
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश
9
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
10
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
11
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
12
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
13
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
14
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
15
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
16
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
17
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
18
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
19
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
20
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?

कचरा संकलन कंपन्यांची मनमानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : स्वच्छतेत नागपूरचा अव्वल क्रमांक यावा, यासाठी शहरातील कचरा संकलन यंत्रणा सुधारण्याचा निर्णय घेण्यात आला. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : स्वच्छतेत नागपूरचा अव्वल क्रमांक यावा, यासाठी शहरातील कचरा संकलन यंत्रणा सुधारण्याचा निर्णय घेण्यात आला. यातूनच दीड वर्षांपूर्वी दोन कंपन्यांकडे शहरातील कचरा उचलण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. परंतु या कंपन्यांची मनमानी सुरू आहे. कोरोच्या दुसऱ्या लाटेत शहरालगतच्या भागात व बाजारात कचरा संकलनासाठी कर्मचारी दोन-तीन दिवसानंतर जातात. त्यात तोटा वाढल्याचे कारण पुढे करून दोन्ही कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली आहे.

महापालिकेने झोन १ ते ५ मधील कचरा संकलनाची जबाबदारी एजी एन्व्हायरो कंपनीला दिली आहे. तर झोन ६ ते १० मधील कचरा उचलण्याची जबाबदारी बीव्हीजी कंपनीकडे आहे. एजी एन्व्हायरो कंपनीने कोरोनाच्या पहिल्या लाटेत १२३ कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरवून कामावरून कमी केले. तर बीव्हीजी कंपनीने काही महिन्यापूर्वी ११४ कर्मचारी कमी केले. कर्मचारी कमी केल्याचा परिणाम शहरातील कचरा संकलनावर झाला आहे. असे असूनही कर्मचारी कमी करण्याच्या मुद्यावरून मनपा प्रशासनाने हात वर केले आहे.

मनपातील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्याकडे कचरा उचलला जात नसल्याच्या दररोज तक्रारी येत आहेत. त्यांनी शहरातील कचरा उचलला जात नसल्याचा मुद्दा सर्वसाधारण सभेत उपस्थित केला आहे. या विषयावर स्थगन प्रस्ताव आणण्याचा त्यांचा विचार आहे. कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या दोन्ही कंपन्यांचे काम समाधानकारक नसल्याची माहिती तानाजी वनवे यांनी लोकमतला दिली. शहरातील अनेक वस्त्यात दररोज कचरा उचलला जात नाही. कंपन्यांचे वाहन दोन-तीन दिवसांनी येते. वास्तविक बाजार भागातील कचरा दिवसातून दोनदा उचलण्याचा निर्णय झाला होता, परंतु याचे पालन होत नाही. महापालिका प्रशासन यात बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

.....

पूर्ण काम करूनही वेतन अर्धेच

कचऱ्याचे वजन वाढविण्यासाठी दोन्ही कंपन्यांकडून कचऱ्यात माती मिसळण्याचे प्रकार सुरू आहे. कर्मचाऱ्यांकडून महिनाभर काम करून घेतले जाते. परंतु त्यांना १५ ते २० दिवसांचेच वेतन दिले जाते. यासंदर्भात अनेक तक्रारी येत आहेत. कंपन्यांची मनमानी बंद झाली पाहिजे. जो कर्मचारी याला विरोध करतो, त्याला कामावरून कमी केले जाते. यामुळे कर्मचारी दहशतीत असल्याचे तानाजी वनवे यांनी सांगितले.

....

नगरसेवकांच्या तक्रारींची दखल नाही

कचरा संकलनासंदर्भात नागरिक नगरसेवकांकडे तक्रारी करतात. यासंदर्भात कंपनीला सूचना केली तर नगरसेवकांच्या सूचनांची दखल घेतली जात नाही. एजी एन्व्हायरो पदाधिकारी नगरसेवकांच्या तक्रारींची दखल घेत नाही. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. शहरातील कचरा दररोज उचलला गेला पाहिजे. बीव्हीजीमधील अधिकारी बदलले आहे. आधीचे अधिकारी मनमानी करीत होते. कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण होत असल्याच्या तक्रारी असल्याचे वनवे यांनी सांगितले.