शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चौकशी अधिकाऱ्याची नियुक्ती करा

By admin | Updated: April 14, 2017 02:59 IST

बहुचर्चित जिल्हा बँक घोटाळाप्रकरणी चौकशी अधिकाऱ्याची नियुक्ती करा, असे निर्देश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी दिले.

जिल्हा बँक घोटाळा : हायकोर्टाचे निर्देश नागपूर : बहुचर्चित जिल्हा बँक घोटाळाप्रकरणी चौकशी अधिकाऱ्याची नियुक्ती करा, असे निर्देश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी दिले. यासोबतच न्यायालयाने राज्य सरकार सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश किंवा सेवानिवृत्त सहकारी न्यायाधीशांची सुद्धा चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करू शकतात, असे सुचविले. शिवाय आमदार सुनील केदार आणि अन्य आरोपींविरुद्ध दाखल फौजदारी गुन्ह्यासंबंधीच्या सुनावणीवरील सद्यस्थिती अहवाल उच्च न्यायालयासमक्ष सादर करण्याचेही आदेश दिले आहे. विशेष म्हणजे, आमदार सुनील केदार या बँकेचे अध्यक्ष असताना या बँकेत तब्बल १५० कोटींचा घोटाळा उघडकीस आला होता. याप्रकरणी शहरातील गणेशपेठ पोलीस ठाण्यात आ. केदार यांच्यासह अन्य आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल झाले होते. शिवाय सहकार खात्याने केलेल्या चौकशीतही या सर्व आरोपींना दोषी धरण्यात आले होते. त्याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. दरम्यान, उच्च न्यायालयाने अ‍ॅड़ सुरेंद्र खरबडे यांच्या नेतृत्वात चौकशी समिती नियुक्त केली होती. ती चौकशी सुरू असताना आ. सुनील केदार यांनी या संपूर्ण प्रकरणात नाबार्ड आणि जिल्हा उपनिबंधकांनाही प्रतिवादी बनविण्याची खरबडे यांच्याकडे विनंती केली होती. मात्र खरबडे यांनी ती विनंती फेटाळून लावली. त्यावर उच्च न्यायालयाने प्रथम उच्च न्यायालयात आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु दोन्ही न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली. त्याचवेळी अ‍ॅड़ खरबडे यांचा कार्यकाळ संपला. त्यामुळे त्यांनी या संपूर्ण चौकशीतून त्यांना मुक्त करण्यात यावे, अशी विनंती केली. त्यानुसार न्यायालयाने त्यांना चौकशीतून मुक्त केले. परंतु दुसरीकडे या संपूर्ण घोटाळ्यासंबंधी जनहित याचिका दाखल करणारे ओमप्रकाश कामडी यांनी नवीन चौकशी अधिकाऱ्याची नियुक्ती करून, या संपूर्ण प्र्रकरणाची महिनाभरात चौकशी पूर्ण करावी, अशा विनंतीसह उच्च न्यायालयात अर्ज सादर केला. त्या अर्जावर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्या. भूषण गवई व न्या. अतुल चांदूरकर यांच्या खंडपीठासमक्ष गुरुवारी सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने राज्य सरकारला उपरोक्त आदेश दिले. सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड़ श्रीरंग भांडारकर यांनी युक्तिवाद केला तर अ‍ॅड. भारती डांगरे यांनी राज्य सरकारची बाजू मांडली. (प्रतिनिधी)