शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
2
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
3
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
4
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
5
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
6
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
7
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
8
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
9
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
10
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
11
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
12
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
13
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
14
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
15
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
16
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
17
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?
18
तरुणीनं पायावर गोंधवला माता कालीचा टॅटू, व्हिडिओ बघून युजर्स भडकले, तुमचाही संताप होईल
19
"आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती
20
"...असे जीवन जगत राहा"; 'मिसेस मुख्यमंत्र्यां'ची देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवशी खास पोस्ट

सातव्या वेतन आयोगा अगोदर स्वामीनाथन आयोग लागू करा

By admin | Updated: February 4, 2016 02:57 IST

सरकारी कर्मचाऱ्यांकडून मागणी नसतांनाही सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

जनमंच : हजारो शेतकऱ्यांचा ७ फेब्रुवारीला मेळावानागपूर : सरकारी कर्मचाऱ्यांकडून मागणी नसतांनाही सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. दुसरीकडे सातत्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना देशाची अन्नसुरक्षा अबाधित राखण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आधी शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी स्वामीनाथन आयोग लागू करा, नंतरच सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करा, अशी मागणी जनमंच संघटनेने केली आहे.सरकारने स्वामीनाथन आयोग लागू करावा म्हणून शेतकऱ्यांना एकजूट करण्यासाठी जनमंचतर्फे येत्या ७ फेब्रुवारीला गैरराजकीय शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याबाबत जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर यांनी एका पत्रपरिषदेदरम्यान माहिती दिली. वसंतराव देशपांडे सभागृहात दुपारी १ वाजता मेळाव्याला सुरुवात होणार असून कृषितज्ज्ञ व कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर व माजी सनदी अधिकारी इ. झेड. खोब्रागडे मार्गदर्शन करणार आहेत. गेल्या ४० वर्षात शेतकी उत्पादनाचे भाव जास्तीत जास्त सात ते आठ पटीने वाढले. यावेळी सोन्याचे भाव ६७ पटीने वाढले. मात्र याचवेळी सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात दीडशे ते दोनशे पटीने वाढ झाली आहे. प्राध्यापकांचा पगार ६०० वरून लाख रुपयावर म्हणजे २०८ पटीने वाढ झाली आहे. शेती आणि शेतकऱ्यांची स्थिती अतिशय वाईट होत गेली. कृषितज्ज्ञ डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेतील आयोगाने २००६ साली तत्कालीन यूपीए सरकारला अहवाल सादर केला होता. मात्र त्यावेळी सरकारने हा आयोग लागू केला नाही. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीपूर्वी स्वामीनाथन आयोगाची भाषा बोलणारे विद्यमान सरकारही या आयोगाबाबत गंभीर नाही, असा आरोप अ‍ॅड. किलोर यांनी केला. पत्रपरिषदेला प्रमोद पांडे, राजीव जगताप, अमिताभ पावडे, रामभाऊ आकरे, प्रकाश इटणकर, कृ.द. दाभोळकर, बाबाराव राठोड, श्रीकांत दोड, दादाराव झोडे, मनोहर रडके, राहुल जळे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)