शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मीरच्या खोऱ्यात लपलेत 'हायब्रिड दहशतवादी', शोपियानमधून दोघांना अटक, एके-५६ सहित दारुगोळा जप्त!
2
देशातील ४९ जिल्ह्यांत जन्मदरापेक्षा मृत्यूदर अधिक, भारताची लोकसंख्या घटण्याच्या मार्गावर? 
3
'हा राष्ट्रीय विजय, यात सर्वांचे योगदान', ऑपरेशन सिंदूरबाबत एअर चीफ मार्शल यांचे मोठे वक्तव्य
4
उच्चांकी स्तरावरुन ६०० अंकांनी का घसरला सेन्सेक्स, काय आहेत या घसरणीची कारणं?
5
हगवणेंच्या बैलासमोर नृत्य केल्याच्या व्हायरल व्हिडिओवर आता गौतमी पाटीलची प्रतिक्रिया, म्हणाली...
6
Yuzvendra Chahal: युजवेंद्र चहलकडे मोठा पराक्रम करण्याची संधी, फक्त तीन विकेट्स दूर!
7
प्रेमासाठी काय पण! ग्रॅज्युएट तरुणीने केलं आठवी नापास मुलाशी लग्न; म्हणाली, "माझी मर्जी..."
8
पुणेकरांनो सावध व्हा...! AI थेट पावती फाडणार; मागचा पुढचा विचार सोडा... वाहतूक नियम पाळा...
9
लश्कर ए तोयबानं पाडलं बांगलादेशातील शेख हसीना सरकार?; आता भारताला दिली धमकी
10
वडील म्हणाले पैसे नाहीत, तरीही ज्योती मल्होत्राला मिळाला वकील! कोण मांडणार तिची बाजू? जाणून घ्या
11
Chandrapur Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात आणखी दोन जण ठार, एका महिन्यात ११ जणांचा मृत्यू; ग्रामस्थांमध्ये घबराट
12
Airtel नं आणले ३ नवे रिचार्ज प्लान्स, कमी किंमतीत अनलिमिटेड बेनिफट्स; OTT चाही मोफत लाभ
13
Video - बापरे! रीलच्या नादात ट्रेनच्या दरवाजाला लटकत होती तरुणी, अचानक हात सुटला अन्...
14
Google ने भारतात सुरू केले अधिकृत स्टोअर; Pixel फोन्सवर मिळतोय ₹42000 चा डिस्काउंट
15
एक कांदा ८०० ग्रॅम ते १ किलो वजनाचा! नितीन गडकरींच्या पत्नीने केला अनोखा प्रयोग; भरघोस उत्पादन आले...
16
IPL 2025 Playoffs Rules: पावसामुळे सामना रद्द झाल्यास फायनलला कोणता संघ जाणार? जाणून घ्या नियम
17
"आता गांधीजींचा देशही दुसरा गाल पुढे करणार नाही, तर…’’, शशी थरूर यांनी ठणकावले   
18
MI संघातील 'हा' खेळाडू साकारु शकेल 'बाबूभैय्या', हरभजन सिंगची 'हेरा फेरी'वादावर मजेशीर टिप्पणी
19
'बंटी और बबली' सिनेमासाठी अभिषेक बच्चनला नव्हती पहिली पसंती, या अभिनेत्याची केलेली निवड, पण...
20
सोनं झालं स्वस्त! आज मोठी घसरण, खरेदीची 'सुवर्णसंधी' की अजून वाट पाहाल? नवे दर काय?

सातव्या वेतन आयोगा अगोदर स्वामीनाथन आयोग लागू करा

By admin | Updated: February 4, 2016 02:57 IST

सरकारी कर्मचाऱ्यांकडून मागणी नसतांनाही सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

जनमंच : हजारो शेतकऱ्यांचा ७ फेब्रुवारीला मेळावानागपूर : सरकारी कर्मचाऱ्यांकडून मागणी नसतांनाही सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. दुसरीकडे सातत्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना देशाची अन्नसुरक्षा अबाधित राखण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आधी शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी स्वामीनाथन आयोग लागू करा, नंतरच सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करा, अशी मागणी जनमंच संघटनेने केली आहे.सरकारने स्वामीनाथन आयोग लागू करावा म्हणून शेतकऱ्यांना एकजूट करण्यासाठी जनमंचतर्फे येत्या ७ फेब्रुवारीला गैरराजकीय शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याबाबत जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर यांनी एका पत्रपरिषदेदरम्यान माहिती दिली. वसंतराव देशपांडे सभागृहात दुपारी १ वाजता मेळाव्याला सुरुवात होणार असून कृषितज्ज्ञ व कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर व माजी सनदी अधिकारी इ. झेड. खोब्रागडे मार्गदर्शन करणार आहेत. गेल्या ४० वर्षात शेतकी उत्पादनाचे भाव जास्तीत जास्त सात ते आठ पटीने वाढले. यावेळी सोन्याचे भाव ६७ पटीने वाढले. मात्र याचवेळी सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात दीडशे ते दोनशे पटीने वाढ झाली आहे. प्राध्यापकांचा पगार ६०० वरून लाख रुपयावर म्हणजे २०८ पटीने वाढ झाली आहे. शेती आणि शेतकऱ्यांची स्थिती अतिशय वाईट होत गेली. कृषितज्ज्ञ डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेतील आयोगाने २००६ साली तत्कालीन यूपीए सरकारला अहवाल सादर केला होता. मात्र त्यावेळी सरकारने हा आयोग लागू केला नाही. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीपूर्वी स्वामीनाथन आयोगाची भाषा बोलणारे विद्यमान सरकारही या आयोगाबाबत गंभीर नाही, असा आरोप अ‍ॅड. किलोर यांनी केला. पत्रपरिषदेला प्रमोद पांडे, राजीव जगताप, अमिताभ पावडे, रामभाऊ आकरे, प्रकाश इटणकर, कृ.द. दाभोळकर, बाबाराव राठोड, श्रीकांत दोड, दादाराव झोडे, मनोहर रडके, राहुल जळे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)