शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

शेतकऱ्यांच्या ५२ संस्थांचे ‘विकेल ते पिकेल’साठी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:26 IST

नागपूर : बाजारपेठेचा कल ओळखून मूल्यसाखळी निर्माण करतानाच शेतमालाला हमखास भाव मिळण्यासाठी विकेल ते पिकेल याेजना राज्य शासनाने सुरू ...

नागपूर : बाजारपेठेचा कल ओळखून मूल्यसाखळी निर्माण करतानाच शेतमालाला हमखास भाव मिळण्यासाठी विकेल ते पिकेल याेजना राज्य शासनाने सुरू केली आहे. नागपूर जिल्ह्यातून या योजनेसाठी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या ५२ समुदाय आधारित संस्थांनी अर्ज केले, तर खरेदीदार म्हणून २९ खरेदीदारांनी नोंदणी केलेली आहे.

प्रकल्पाचे नोडल अधिकारी तथा जिल्हा कृषी उपसंचालक अरविंद उपरीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्मार्ट प्रकल्पांतर्गत विकेल ते पिकेल याेजनेची राज्यात वर्ष २०२० ते २०२७ पर्यंत अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यामध्ये ११ विविध अंमलबजावणी यंत्रणा सहाय्य करणार आहेत. स्मार्ट प्रकल्पाकरिता जागतिक बँक अर्थसाहाय्य करीत आहे. स्मार्ट प्रकल्प म्हणजे बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प आहे. लहान आणि सीमांत शेतकरी तसेच कृषी नवउद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. समुदाय आधारित संस्थांमध्ये शेतकरी उत्पादक कंपनी, आत्मा नोंदणीकृत शेतकरी गट, महिला बचत गटाचे प्रभाग संघ, प्राथमिक कृषी पतसंस्था स्मार्ट प्रकल्पांमध्ये लाभार्थी असणार आहेत. वैयक्तिक शेतकरी पात्र असणार नाही. उत्पादक-भागीदारी उपप्रकल्प, बाजार संपर्क वाढ उप प्रकल्प, धान्य गोदाम आधारित प्रकल्प, नाविन्यपूर्ण पूरक प्रकल्प व कापूस मूल्य साखळी विकास उपप्रकल्प आदी उपप्रकल्पामध्ये समुदाय आधारित संस्था सहभागी होऊ शकतात.

या योजनेमध्ये निवड झालेल्या प्रकल्पांना जास्तीत जास्त ६० टक्क्यांपर्यंत पायाभूत सुविधा निर्मिती व तांत्रिक सहाय्यासाठी आर्थिक अनुदान देण्यात येणार आहे. या स्मार्ट प्रकल्पाच्या संकेतस्थळावर जाऊन शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करता येते. अर्ज करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२० अंतिम मुदत आहे.