शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

आपली बसमध्ये लागणार सेन्सर सिस्टिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 23:17 IST

तिकीट चोरीला आळा घालण्यासाठी बसमध्ये सेन्सर सिस्टिम लावणार असल्याची माहिती आयुक्त अभिजित बांगर यांनी गुरुवारी दिली.

ठळक मुद्देतिकिटाच्या काळाबाजारासाठी ऑपरेटला जबाबदार धरणारआपली बसला वर्षाला ९० कोटींचा तोटा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या आपली बसला वर्षाला ८० ते ९० कोटींचा तोटा आहे. प्रशासन तोटा कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबविणार आहे. तिकिटांचा काळाबाजार झाल्यास यासाठी दिल्ली इन्टिग्रेटेड मल्टी-मोडल ट्रान्झिट सिस्टिम लिमिटेड (डीआयएमटीएस) ला जबाबदार धरले जाईल. तसेच तिकीट चोरीला आळा घालण्यासाठी बसमध्ये सेन्सर सिस्टिम लावणार असल्याची माहिती आयुक्त अभिजित बांगर यांनी गुरुवारी दिली.कंडक्टर संघटितपणे तिकिटांचा काळाबाजार करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. यातील दोषींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पोलीस विभागाला पत्र दिले होते. परंतु अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. आपली बससाठी कंडक्टरची नियुक्ती करण्याची जबाबदारी डीआयएमटीएस कंपनीची असल्याने तिकिटांचा काळाबाजार होत असल्यास या कंपनीला जबाबदार धरले जाईल.तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. परंतु यासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर केला जाणार आहे. सेन्सर सिस्टिमच्या माध्यमातून बसमधील प्रवाशांची संख्या नोंद होईल. मुख्यालयातील नियंत्रण कक्षातून याचे नियंत्रण केले जाईल तसेच अन्य तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती बांगर यांनी दिली.शहरातील बस वाहतूक मेट्रो रेल्वेशी जोडली जाईल. त्यानुसार समन्वय साधला जाईल. यासाठी फीडर सर्व्हिसवर भर दिला जाणार आहे. प्रवाशांची संख्या कमी असलेल्या मार्गावर मिनी बसेस चालविल्या जात आहेत. प्रवासी संख्येचा विचार करून बसेस सोडण्याचे नियोजन के ले जाणार आहे.बसेस सीएनजी व इलेक्ट्रिकवर धावणारपर्यावरणपूरक सीएनजी व इलेक्ट्रिक बसेस चालविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. शासन निधीतून पाच इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्यात आलेल्या आहेत. सर्व बसेस टप्प्याटप्प्याने सीएनजीवर चालविण्याचे नियोजन आहे; सोबतच इलेक्ट्रिक बसची संख्या वाढविण्याचा प्रयत्न आहे.फूड वेस्टपासून सीएनजीशहरात दररोज १२०० मेट्रिक टन कचरा निघतो. यात ५० मेट्रिक टन फूड वेस्ट असते. यापासून सीएनजी निर्माण केले जाणार आहे. यावर शहर बसेस धावतील. यामुळे इंधनावर होणाऱ्या खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होईल; सोबतच शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लागण्यालाही मदत होईल, असा विश्वास अभिजित बांगर यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाPublic Transportसार्वजनिक वाहतूक