शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

आपली बस महामेट्रोच्या स्वाधीन : महामंडळ ते महामेट्रोकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 23:56 IST

Apali bus hand over to Mahametro महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. त्यात आपली बस १०० कोटीच्या तोट्यात आहे. याचा विचार करता मनपाची आपली बससेवा महामेट्रोला हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावाला गुरुवारी परिवहन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

ठळक मुद्दे मनपाचा जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. त्यात आपली बस १०० कोटीच्या तोट्यात आहे. याचा विचार करता मनपाची आपली बससेवा महामेट्रोला हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावाला गुरुवारी परिवहन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. वास्तविक शहरातील नागरिकांना उत्तम दर्जाची सेवा मिळावी, यासाठी परिवहन महामंडळाकडून मनपाने ही जबाबदारी स्वीकारली होती. आता ती महामेट्रोला देऊन जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न चालविला आहे.

राज्य परिवहन महामंडळाला वर्ष २००१ ते २००५ या कालावधीत नागपूर शहरातील बस संचालनात २०.६८ कोटीचा तोटा झाला होता. ही नुकसानभरपाई महापालिकेने द्यावी, अशी मागणी महामंडळाने मनपाकडे केली होती. परंतु मनपाने ही रक्कम देण्यास नकार दिला होता. ३ मार्च २००७ रोजी महामंडळाने शहर बससेवा संचालित करण्याची अनुमती मनपाला दिली. वास्तविक शहरातील नागरिकांना उत्तम दर्जाची बससेवा उपलब्ध व्हावी, यासाठी १९९४ पासून प्रयत्न सुरू झाले. अखेर ९ फेब्रुवारी २००७ रोजी महापालिका व वंश निमय इन्फ्राप्रोजेक्ट लिमिटेड (व्हीएनआयएल) यांच्यात दहा वर्षांचा करार झाला. करारानुसार २३० बस ऑपरेटरला सुरू करावयाची होती. यात १५० मोठ्या व ८० लहान बसचा समावेश होता.

यातील २०० बस सहा महिन्यात खरेदी करावयाच्या होत्या. बस खरेदी, कर्ज व बस नोंदणी, व्यवस्थापन सर्व व्यवस्था ऑपरेटरला करावयाची होती. करारानुसार व्हीएनआयएलला पाच वर्षांसाठी प्रतिबस दरमहा ३ हजार ७५० रुपये व त्यानंतर प्रतिमाह ४ हजार मनपाला द्यावयाचे होते.

जेएनएनयूआरएमच्या ३०० बस भंगारात

व्हीएनआयएल यांच्याशी झालेल्या करारानुसार २४० बस शहरात धावल्याच नाही. १६० ते १८० सुरू केल्या. जेएनएनयूआरएमच्या ३०० बस मनपाला मिळाल्या. अशाप्रकारे शहरात ५३० बस मिळाल्या. परंतु शहरात धावणाऱ्या बसची संख्या २४० च्या पुढे गेली नाही. पुढे ३०० बस भंगारात गेल्या. गाड्यांचे पार्ट चोरीला गेले. मोठा घोटाळा झाला.

नोटीसचा परिणाम नाही

करारानुसार शहरात बस धावत नसल्याने व प्रवाशांना सुविधा उपलब्ध न झाल्याने मनपा प्रशासनाने वंश निमय इन्फ्राप्रोजेक्ट लिमिटेडला शंभरहून अधिक नोटिसा बजावल्या. परंतु राजकीय पाठबळ असल्याने मनपाला ठोस निर्णय घेता आला नाही. २०१२ मध्ये शहर बससेवेची जबाबदारी अर्बन मॉस ट्रान्झिट कंपनी (यूएमटीसी)ला दिली. परंतु परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही.

कोट्यवधी बुडाले

केंद्र सरकारकडून मिळालेल्या २४० मधील १३० बस काही महिने सुरू होत्या. काही वर्षातच सर्व बस भंगारात निघाल्या. ऑपरेटरने मनपाकडे प्रवासीकराची १० कोटीची रक्कम जमा केली नाही. तिकिटाची रक्कमही मनपाकडे जमा केली नाही. ही रक्कम २५ ते ३० कोटीच्या आसपास असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.तीन ऑपरेटरची नियुक्ती

शहरातील बसव्यवस्था सुधारावी यासाठी वंश निमय यांचा करार संपुष्टात आणल्यानंतर २०१६ मध्ये मनपाने तीन ऑपरेटरची नियुक्ती केली. शहरात ३३६ बस धावायला लागल्या. परंतु मनपाला दर महिन्याला ८ ते १० कोटी तोटा सहन करावा लागत आहे. वर्षाला १०० ते ११० कोटीचा बोजा सहन करावा लागत आहे. महापालिकेने ४३२ रेड बसेस व ५५ ग्रीन बसेस या सेवेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु ग्रीन बस बंद पंडल्या. रेड बसही पूर्ण धावत नाही. आता महामेट्रोकडे देण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे.

टॅग्स :Metroमेट्रोNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाPublic Transportसार्वजनिक वाहतूक