शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

सर्व समस्यांचे उत्तर

By admin | Updated: October 3, 2015 02:48 IST

ब्रिटिशांनी भारतावर १५० वर्षे राज्य केले. इतर भारतीयांप्रमाणे महात्मा गांधीसुध्दा इंग्रजांचे गुलाम होते.

गांधी विचारातलीलाताई चितळे : सिटीझन्स फोरम फॉर इक्वॅलिटीतर्फे गांधी जयंती नागपूर : ब्रिटिशांनी भारतावर १५० वर्षे राज्य केले. इतर भारतीयांप्रमाणे महात्मा गांधीसुध्दा इंग्रजांचे गुलाम होते. मात्र आज ब्रिटिशांच्या सर्वोच्च संसदेसमोर गांधीजींचा पुतळा उभारावा लागला. याचे कारण म्हणजे गांधीजींचे विचार. महात्मा गांधींचे सत्य, अहिंसेचे विचार हे जगाला स्वीकारणे आवश्यक झाले आहे. फोफावलेला दहशतवाद आणि आर्थिक विषमता या अखिल विश्वाला भेडसावणाऱ्या समस्या आहेत. गांधीजींच्या विचारांमध्येच या समस्यांचे उत्तर आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक लीलाताई चितळे यांनी केले. सिटीझन्स फोरम फॉर इक्वॅलिटी या संस्थेच्यावतीने महात्मा गांधी जयंती समारोह आणि सुतकताई चरखा साधना अभियान आयोजित करण्यात आले. याप्रसंगी लीलाताई बोलत होत्या. महात्म्याचे विचार सत्य, अहिंसा आणि नैतिकता शिकविणारे आहेत. त्याचमुळे नैतिकता हरविलेल्या पाश्चात्त्य देशांना गांधींचे विचार स्वीकारावे लागत आहेत. मात्र दुर्दैवाची बाब म्हणजे पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करणाऱ्या आपल्या देशात त्यांचे विचार दुर्लक्षिले जात असल्याची खंत लीलातार्इंनी व्यक्त केली.गांधीविचार खुंटीवर टांगून ठेवल्याने सुराज्याचे स्वप्न अजून साकार झाले नसल्याचे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते गेव्ह आवारी, हरिभाऊ केदार, आत्माराम उखळकर, थ्रिटी पटेल, मधुकर निसाळ, हरीजन सेवक संघाचे निंबाळकर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह सलील देशमुख या कार्यक्रमात सहभागी झाले. सर्वच मान्यवरांनी आपले विचार मांडतांना गांधी उत्सवात तरुणांचा सहभाग नसल्याने खंत व्यक्त केली. यावेळी चरख्यावर सुतकताईच्या अभियांनांतर्गत देशपांडे गुरुजींनी रस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्यांना सुतकताईचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन सिटीझन्स फोरमचे अध्यक्ष मधुकर कुकडे यांनी केले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यात रघुवीर देवगडे, अरविंद देशमुख, माजी आमदार यादवराव देवगडे, ललित त्रिवेदी आदींनी परिश्रम घेतले.(प्रतिनिधी)