शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
3
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
4
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
5
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
6
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
7
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
8
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
9
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
10
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
11
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
12
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
13
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
14
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
15
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
16
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
17
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
18
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
19
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
20
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित

सर्व समस्यांचे उत्तर

By admin | Updated: October 3, 2015 02:48 IST

ब्रिटिशांनी भारतावर १५० वर्षे राज्य केले. इतर भारतीयांप्रमाणे महात्मा गांधीसुध्दा इंग्रजांचे गुलाम होते.

गांधी विचारातलीलाताई चितळे : सिटीझन्स फोरम फॉर इक्वॅलिटीतर्फे गांधी जयंती नागपूर : ब्रिटिशांनी भारतावर १५० वर्षे राज्य केले. इतर भारतीयांप्रमाणे महात्मा गांधीसुध्दा इंग्रजांचे गुलाम होते. मात्र आज ब्रिटिशांच्या सर्वोच्च संसदेसमोर गांधीजींचा पुतळा उभारावा लागला. याचे कारण म्हणजे गांधीजींचे विचार. महात्मा गांधींचे सत्य, अहिंसेचे विचार हे जगाला स्वीकारणे आवश्यक झाले आहे. फोफावलेला दहशतवाद आणि आर्थिक विषमता या अखिल विश्वाला भेडसावणाऱ्या समस्या आहेत. गांधीजींच्या विचारांमध्येच या समस्यांचे उत्तर आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक लीलाताई चितळे यांनी केले. सिटीझन्स फोरम फॉर इक्वॅलिटी या संस्थेच्यावतीने महात्मा गांधी जयंती समारोह आणि सुतकताई चरखा साधना अभियान आयोजित करण्यात आले. याप्रसंगी लीलाताई बोलत होत्या. महात्म्याचे विचार सत्य, अहिंसा आणि नैतिकता शिकविणारे आहेत. त्याचमुळे नैतिकता हरविलेल्या पाश्चात्त्य देशांना गांधींचे विचार स्वीकारावे लागत आहेत. मात्र दुर्दैवाची बाब म्हणजे पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करणाऱ्या आपल्या देशात त्यांचे विचार दुर्लक्षिले जात असल्याची खंत लीलातार्इंनी व्यक्त केली.गांधीविचार खुंटीवर टांगून ठेवल्याने सुराज्याचे स्वप्न अजून साकार झाले नसल्याचे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते गेव्ह आवारी, हरिभाऊ केदार, आत्माराम उखळकर, थ्रिटी पटेल, मधुकर निसाळ, हरीजन सेवक संघाचे निंबाळकर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह सलील देशमुख या कार्यक्रमात सहभागी झाले. सर्वच मान्यवरांनी आपले विचार मांडतांना गांधी उत्सवात तरुणांचा सहभाग नसल्याने खंत व्यक्त केली. यावेळी चरख्यावर सुतकताईच्या अभियांनांतर्गत देशपांडे गुरुजींनी रस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्यांना सुतकताईचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन सिटीझन्स फोरमचे अध्यक्ष मधुकर कुकडे यांनी केले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यात रघुवीर देवगडे, अरविंद देशमुख, माजी आमदार यादवराव देवगडे, ललित त्रिवेदी आदींनी परिश्रम घेतले.(प्रतिनिधी)