शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

संतापजनक ! काळोखात अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:09 IST

अभय लांजेवार लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : आयुष्याचा शेवट मृत्यूने होतो. मृत्यू ओढवला की मग सुरू होते स्मशानभूमीची वाट. ...

अभय लांजेवार

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : आयुष्याचा शेवट मृत्यूने होतो. मृत्यू ओढवला की मग सुरू होते स्मशानभूमीची वाट. या वाटेवरही आप्तस्वकीयांना दु:ख आणि यातना मिळत असतील तर त्यापेक्षा दुसरे दुर्दैव तरी कोणते म्हणावे! होय, चक्क काळोखातच अंत्यसंस्कार उरकविण्याचा दुर्दैवी प्रकार उमरेडच्या वेकोलि आमनदी स्मशानभूमीवर बघावयास मिळत आहे.

अंत्यविधीसाठी उमरेड आमनदी स्मशानभूमीवर थोडा जरी विलंब झाला तर या घाटावर कोणत्याही प्रकारची विद्युत सुविधा उपलब्ध नाही. मागील अनेक वर्षांपासून ही समस्या आहे. अशावेळी चारचाकी वाहने सुरू करीत अथवा मोबाईल टॉर्चचा वापर करीत अंत्यसंस्कार कसेबसे उरकवावे लागतात. हा प्रकार संतापजनक असला तरी या गंभीर समस्येकडे अद्याप तरी कुणीही गांभीर्याने घेतले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

उमरेड शहरामध्ये वेगवेगळ्या तीन ठिकाणी स्मशानभूमीची व्यवस्था आहे. वेकोलि आमनदी, कुही मार्गावर आमनदीलगत आणि भिवापूर मार्गावर अंत्यसंस्काराचे विधी पार पडत असतात. साधारणत: अधिकांश अंत्यसंस्कार वेकोलि आणि भिवापूर मार्गावरील स्मशानभूमीवर होतात. अशावेळी वेकोलि आमनदी स्मशानभूमीवर अंत्यसंस्काराला सूर्य मावळतीला आलाच तर चांगलीच गैरसोय होत असते. महामार्गावरून काही अंतरावरच असलेल्या स्मशानभूमीपर्यंत काळोख असतो. स्मशानभूमी परिसरातसुद्धा विद्युत उपलब्ध नसल्याने चारचाकी वाहन ज्यांनी आणले ते कसेबसे वाहनांचा ‘हेडलाईट’ सुरू करतात. अनेक जण मोबाईल टॉर्च सुरू करतात. कसाबसा काळोखात अंत्यविधी उरकविला जातो. मागील अनेक वर्षांपासून या समस्येकडे कुणी ढुंकूनही बघितले नाही, हे येथे उल्लेखनीय.

.....

उजेड कोण पाडणार?

मागील अनेक वर्षांपासून आमनदी घाट कुणाच्या अखत्यारित आहे, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे. वायगाव घोटुर्ली ग्रामपंचायत आणि उमरेड नगरपालिका एकमेकांच्या हद्दीत स्मशानभूमी असल्याचे सांगतात. सिमेंटचे रस्ते वायगाव घोटुर्ली तर आसनव्यवस्था आणि उर्वरित काही कामे नगरपालिकेने केली आहेत. आता स्मशानभूमीतील अंधार नाहीसा करण्यासाठी पाऊल कोण उचलणार आणि स्मशानभूमीत उजेड कोण पाडणार, असा सवाल विचारला जात आहे.

अमानवीय प्रकार

शनिवारी (दि.१६) उमरेड कावरापेठ येथील वैशाली भट यांचे निधन झाले. सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास अंत्यसंस्कारासाठी आप्तस्वकीय पोहोचले. सर्वत्र काळोख असल्याने चांगलीच गैरसोय झाली. सायंकाळी उशिरा अंत्यसंस्कार काळोखातच उरकविले जावे, हा प्रकार अमानवीय असल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या.