शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अण्णाभाऊंच्या साहित्याने दिला शोषणाविरुद्धचा विचार

By admin | Updated: February 12, 2017 02:25 IST

श्रेष्ठतेच्या कल्पनेतून उच्चवर्णीयांनी आपल्याच समाजबांधवांना हजारो वर्षे गावाबाहेर ठेवले. त्यांच्याकडून

नागपूर : श्रेष्ठतेच्या कल्पनेतून उच्चवर्णीयांनी आपल्याच समाजबांधवांना हजारो वर्षे गावाबाहेर ठेवले. त्यांच्याकडून स्वच्छतेची कामे करून घेताना त्यांना मात्र कायम अज्ञानात आणि अस्वच्छतेतच राहू दिले. अशा सगळ्याच संधी नाकारलेल्या समाजात जन्मलेल्या अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीद्वारे क्रांती घडवली. अनेक कादंबऱ्या, नाटके, कथा लिहिल्या. आपल्या कर्तृत्वावर रशियाचा प्रवास केला. दलित समाजाला जागृत करण्यासोबतच अण्णाभाऊंच्या साहित्याने शोषणाविरुद्धचा विचार देशाला दिला, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत अर्जुन डांगळे यांनी केले. माहेश्वरी सांस्कृतिक सभागृहात आयोजित साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे दुसऱ्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते संमेलनाध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर स्वागताध्यक्ष डॉ. गिरीश गांधी व प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री डॉ. सतीश चतुर्वेदी, डॉ. माधवराव गादेकर, डॉ. ईश्वर नंदपुरे, डॉ. विठ्ठल भंडारे उपस्थित होते. डॉ. अशोक कांबळे यांनी संमेलनाची भूमिका मांडली. प्रास्ताविक चंद्रकांत वानखेडे, संचालन संजय ठोसर तर आभार प्रकाश डोंगरे यांनी मानले. उद्घाटनाआधी सकाळी ९ वाजता अण्णाभाऊ साठे यांच्या ग्रंथांची विचारयात्रा काढण्यात आली. दुसऱ्या सत्रात सकाळी १० वाजता शंकरराव ठोसर व त्यांच्या चमूने गीतगायन सादर केले. दुपारी ४ वाजता ‘मराठी साहित्य व संस्कृतीमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे योगदान’ या विषयावर परिसंवाद पार पडले. संमेलनाच्या पाचव्या सत्रात सायंकाळी ६ ते ९ या वेळेत ज्येष्ठ कवी लोकनाथ यशवंत व नीलकांत ढोले यांच्या उपस्थितीत कविसंमेलन झाले. उद्या रविवारी या संमेलनात परिसंवाद, प्रबोधनात्मक नाटिका व कथाकथनाचे आयोजन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)