शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

अण्णाभाऊंच्या साहित्याने दिला शोषणाविरुद्धचा विचार

By admin | Updated: February 12, 2017 02:25 IST

श्रेष्ठतेच्या कल्पनेतून उच्चवर्णीयांनी आपल्याच समाजबांधवांना हजारो वर्षे गावाबाहेर ठेवले. त्यांच्याकडून

नागपूर : श्रेष्ठतेच्या कल्पनेतून उच्चवर्णीयांनी आपल्याच समाजबांधवांना हजारो वर्षे गावाबाहेर ठेवले. त्यांच्याकडून स्वच्छतेची कामे करून घेताना त्यांना मात्र कायम अज्ञानात आणि अस्वच्छतेतच राहू दिले. अशा सगळ्याच संधी नाकारलेल्या समाजात जन्मलेल्या अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीद्वारे क्रांती घडवली. अनेक कादंबऱ्या, नाटके, कथा लिहिल्या. आपल्या कर्तृत्वावर रशियाचा प्रवास केला. दलित समाजाला जागृत करण्यासोबतच अण्णाभाऊंच्या साहित्याने शोषणाविरुद्धचा विचार देशाला दिला, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत अर्जुन डांगळे यांनी केले. माहेश्वरी सांस्कृतिक सभागृहात आयोजित साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे दुसऱ्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते संमेलनाध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर स्वागताध्यक्ष डॉ. गिरीश गांधी व प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री डॉ. सतीश चतुर्वेदी, डॉ. माधवराव गादेकर, डॉ. ईश्वर नंदपुरे, डॉ. विठ्ठल भंडारे उपस्थित होते. डॉ. अशोक कांबळे यांनी संमेलनाची भूमिका मांडली. प्रास्ताविक चंद्रकांत वानखेडे, संचालन संजय ठोसर तर आभार प्रकाश डोंगरे यांनी मानले. उद्घाटनाआधी सकाळी ९ वाजता अण्णाभाऊ साठे यांच्या ग्रंथांची विचारयात्रा काढण्यात आली. दुसऱ्या सत्रात सकाळी १० वाजता शंकरराव ठोसर व त्यांच्या चमूने गीतगायन सादर केले. दुपारी ४ वाजता ‘मराठी साहित्य व संस्कृतीमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे योगदान’ या विषयावर परिसंवाद पार पडले. संमेलनाच्या पाचव्या सत्रात सायंकाळी ६ ते ९ या वेळेत ज्येष्ठ कवी लोकनाथ यशवंत व नीलकांत ढोले यांच्या उपस्थितीत कविसंमेलन झाले. उद्या रविवारी या संमेलनात परिसंवाद, प्रबोधनात्मक नाटिका व कथाकथनाचे आयोजन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)