शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मिरचीच्या शेतात सोडली जनावरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 10:47 IST

यावर्षी हिरव्या मिरचीला अत्यल्प भाव मिळत असून तोडणीचाही खर्च शेतकऱ्यांना परवडण्यासारखा नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाला असून अशात उभ्या मिरचीमध्ये जनावरे सोडण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नाही. हे वास्तवचित्र सध्या मौदा तालुक्यात जागोजागी पहावयास मिळत आहे.

ठळक मुद्देमौदा तालुक्यातील प्रकार अत्यल्प भाव, तोडणीचाही खर्च परवडत नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: मिरचीसाठी ओळखल्या जाणाऱ्या भिवापूर तालुक्यासह कुही, मौदा, रामटेक तालुक्यातही मिरचीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मात्र यावर्षी हिरव्या मिरचीला अत्यल्प भाव मिळत असून तोडणीचाही खर्च शेतकऱ्यांना परवडण्यासारखा नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाला असून अशात उभ्या मिरचीमध्ये जनावरे सोडण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नाही. हे वास्तवचित्र सध्या मौदा तालुक्यात जागोजागी पहावयास मिळत आहे.भिवापूर, कुही तालुक्यानंतर मिरचीची लागवड करणारा तालुका म्हणून मौदा तालुक्याचा क्रमांक आहे. सध्या हिरव्या मिरचीची तोडाई सुरू आहे. मात्र मिरचीला अत्यल्प भाव असल्याने शेतकऱ्यांना तोडणीचा खर्चही भरून निघणे कठीण झाले आहे. हिरव्या मिरचीला बाजारात १० ते १३ रुपये प्रतिकिलो याप्रमाणे भाव मिळत आहे. मिरची तोडाईच्या खर्चाकडे लक्ष दिल्यास ४० ते ४५ किलो मिरची तोडायला दोन मजुरांची गरज पडते. एका मजुराची रोजी ही १२० ते १५० याप्रमाणे ३०० रुपयांपर्यंत मजुरी होते. ती मिरची बाजारापर्यंत पाठविण्याचा वाहतूक खर्च हा १५० ते २०० रुपये येतो. त्यामुळे तोडलेली मिरची विकण्यास पाठविली तर शेतकऱ्यांकडील ५० रुपये अतिरिक्त खर्च होतात. हा हिशेब पाहता शेतकऱ्यांनी आता उभ्या मिरचीमध्ये जनावरांना सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मिरचीसोबतच भाजीपाल्याचे भाव पडल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.

टॅग्स :agricultureशेती