शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

आंध्र प्रदेशप्रमाणे राज्यातदेखील 'दिशा'सारखा कायदा आणणार : गृहमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 22:55 IST

महिला अत्याचारावर नियंत्रण आणण्यासाठी कठोर कायदे करण्याची आवश्यकता आहे. अशा प्रकरणांतील आरोपींना पुरावे असतील तर त्वरित शिक्षा व्हावी, यासाठी आंध्र प्रदेशने ‘दिशा’ नावाचा कायदा संमत केला आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्रात ५८ महिन्यांत २२ हजार बलात्कार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महिला अत्याचारावर नियंत्रण आणण्यासाठी कठोर कायदे करण्याची आवश्यकता आहे. अशा प्रकरणांतील आरोपींना पुरावे असतील तर त्वरित शिक्षा व्हावी, यासाठी आंध्र प्रदेशने ‘दिशा’ नावाचा कायदा संमत केला आहे. यासंबंधी मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले आहे. विधी व न्याय विभागाचा अभिप्राय घेतल्यानंतर राज्यातदेखील अशा प्रकारचा कायदा लवकरात लवकर आणण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी विधान परिषदेत केली.मनीषा कायंदे यांनी महिला अत्याचारासंदर्भात मांडलेल्या लक्षवेधी सूचनेदरम्यान सभागृहात सरकारवर विविध प्रश्नांचा भडीमार झाला. मनीषा कायंदे, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाई गिरकर यांच्यासह विविध सदस्यांनी हा मुद्दा लावून धरला व आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी आंध्र प्रदेशप्रमाणे कठोर कायदा करणार का, अशी विचारणा केली. आंध्र प्रदेशकडून आम्ही ‘दिशा’ कायद्याची माहिती घेतली आहे. सबळ पुरावा असेल तर आरोपींना तेथे २१ दिवसांत मृत्युदंडाची शिक्षा करण्याची कायद्यात तरतूद आहे. राज्यातील विद्यमान कायद्यानुसार जन्मठेपा किंवा फाशीची शिक्षा दिली जाते. परंतु ‘दिशा’च्या माध्यमातून आंध्र प्रदेशने थेट फाशीची तरतूद केली आहे. महाराष्ट्रातदेखील ‘दिशा’सारखा कायदा करण्याचा शासनाचा विचार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांच्याशी यासंदर्भात चर्चादेखील झाली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.२५ विशेष न्यायालये स्थापनमहिला व बालकांवरील अत्याचारांना आळा घालण्यासाठी राज्य शासनातर्फे उचलण्यात आलेल्या पावलांची माहिती यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिली. खटले वेगाने निकाली काढावेत यासाठी राज्यात २५ विशेष न्यायालये व २७ जलदगती न्यायालये स्थापन झाली आहेत. तसेच केंद्राने महाराष्ट्रासाठी बालकांवरील अत्याचारांच्या खटल्यासाठी ३० विशेष न्यायालये व महिलांवरील अत्याचारांच्या खटल्यासाठी १०८ विशेष फास्टट्रॅक न्यायालये मंजूर केली आहेत, असे त्यांनी सांगितले. ‘सायबर’ गुन्ह्यांची उकल करण्यासाठी राज्यात ४७ पैकी ४३ पोलीस ठाणी कार्यान्वित झाली आहेत. ‘सायबर’ गुन्हे विभागातील १६४ हंगामी जागा दोन महिन्यांत भरण्यात येतील, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.महिला अत्याचाराचे प्रमाण वाढीसदरम्यान, गृहमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार जानेवारी २०१५ ते ऑक्टोबर २०१९ या ५८ महिन्यांच्या कालावधीत राज्यात महिला अत्याचाराच्या तब्बल २२ हजार ७७ प्रकरणांची नोंद झाली, तर महिला अपहरणाचे ३३ हजार ८२२ गुन्हे नोंदविण्यात आले. विनयभंगाच्या गुन्ह्यांचा आकडा ६० हजार ६४६ इतका होता. पुरोगामी राज्यात हुंडाबळीचे १ हजार १२० गुन्हे नोंदविण्यात आले.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनEknath Shindeएकनाथ शिंदे