शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

... अन् सन्मानाने सुरू होतो महाप्रवास!

By admin | Updated: February 20, 2017 01:59 IST

आयुष्याचा अंतिम क्षण गोेड व्हावा, अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. परंतु असे भाग्य सगळ्यांनाच लाभत नाही.

मुस्लीम बांधवांचे औदार्य : वर्षभरात २० बेवारस मृतदेहांचा केला दफनविधीदयानंद पाईकराव नागपूरआयुष्याचा अंतिम क्षण गोेड व्हावा, अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. परंतु असे भाग्य सगळ्यांनाच लाभत नाही. बेवारस स्थितीत जीव सोडणाऱ्या अनेकांना तर आपल्या धर्मानुसार अंतिम संस्कारही लाभत नाहीत. मुस्लीम समाजातील अशा दुर्दैवी जीवांना सन्मानाने निरोप देण्याचे काम मोमिनपुरा येथील कब्रस्तान कमिटीचे सदस्य इमानेइतबारे करीत आहेत. या कमिटीने मागील वर्षभरात २० अनोळखी मुस्लीम बांधवांचा दफनविधी केला आहे. अनोळखी मृतदेहाची माहिती अनेकदा दोन-तीन दिवसानंतर दुर्गंधी सुटली की होते. अशा वेळी पोलीसही नाकाला रुमाल बांधून त्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी नेणे, त्यानंतर अंत्यसंस्कार पार पाडणे ही कामे करतात. परंतु यात मृतदेहाची दुर्गंधी येत असल्यामुळे जिव्हाळा उरत नाही. परंतु कब्रस्तान कमिटी मोमिनपुराने रेल्वेस्थानकावरील अनोळखी मुस्लीम बांधवांचा दफनविधी पार पाडण्याचा विडाच उचलला आहे. लोहमार्ग पोलिसांकडून अनोळखी मुस्लीम बांधवाचा मृतदेह असल्याचे पत्र मिळाल्यानंतर कमेटीचे सदस्य आपले तीन प्रतिनिधी पाठवून संबंधित मृतदेह मुस्लीम व्यक्तीचा आहे की नाही, याची खात्री करतात. खात्री पटल्यानंतर दुपारी मस्जिदमध्ये नमाद अदा करण्यापूर्वी तेथे उपस्थित मुस्लिम बांधवांना आपल्या एका अनोळखी मुस्लीम बांधवाचा दफनविधी करावयाचा असल्याचे आवाहन करतात. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन २५ ते ३० मुस्लीम बांधव माणुसकीच्या नात्याने आणि घरातील सदस्याप्रमाणे मृतदेह शवविच्छेदनानंतर घेऊन जाणे, मृतदेहाला सुगंधी अत्तर लावून आंघोळ घालणे, नमाज अदा केल्यावर सन्मानाने त्या मृतदेहाचा दफनविधी करण्यात येतो. मागील वर्षभरात नागपूर रेल्वेस्थानकावर लोहमार्ग पोलिसांना १२० मृतदेह आढळले. यातील २० मृतदेह हे मुस्लीम समाजातील अनोळखी व्यक्तीचे होते. मोमिनपुरा कब्रस्तान कमिटीतर्फे करण्यात येणारे हे कार्य खरोखरच पुण्याचे असून इतरांनीही यापासून आदर्श घेण्याची गरज आहे. ‘कुठल्याही जाती, धर्मातील मृत व्यक्ती असो, त्याचा अंत्यविधी सन्मानाने होण्याची गरज आहे. मोमिनपुरा कब्रस्तान कमिटीला आम्ही पत्रव्यवहार केल्यानंतर ते त्वरित प्रतिसाद देऊन संबंधित अनोळखी मृतदेहावर त्यांच्या धार्मिक विधीनुसार अंत्यसंस्कार करतात.’-अभय पान्हेकर, लोहमार्ग पोलीस निरीक्षक, नागपूर