शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
3
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
4
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
5
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
6
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
7
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
8
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
9
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
10
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
11
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
12
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
13
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
14
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
15
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
16
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
17
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
18
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
19
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
20
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!

अन् पुन्हा पायावर उभा झालो.....

By admin | Updated: October 23, 2016 02:53 IST

ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर उभा असताना अवघ्या १९ व्या वर्षी रेल्वे अपघातात दोन्ही पाय गेले आणि कायमचे अपंगत्व आले.

नागपूर : ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर उभा असताना अवघ्या १९ व्या वर्षी रेल्वे अपघातात दोन्ही पाय गेले आणि कायमचे अपंगत्व आले. घरची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने खासगी रुग्णालयातून कृत्रिम पाय खरेदी करणे शक्य झाले नाही. शिवाय कुणाची मदतही मिळाली नाही. त्यामुळे वर्षभर घरात अंथरुणावर पडून राहावे लागले. मात्र मागील १४ आॅक्टोबरपासून धंतोली येथील यशवंत स्टेडियम येथे सुरू झालेल्या शिबिरात त्याला ‘जयपूर फूट’ मिळाले आणि तो पुन्हा दोन्ही पायावर उभा झाला. आनंद गणेश बंधाटे असे त्या तरुणाचे नाव आहे. तो भंडारा जिल्ह्यातील देवळी येथील रहिवासी आहे. आनंदने बी.ए. प्रथम वर्षापर्यंत शिक्षण घेतले असून, त्याला मोठे होऊन नोकरी करायची होती. परंतु वर्षभरापूर्वी तो रेल्वेतून प्रवास करीत असताना त्याचा अपघात झाला आणि त्यात त्याचे दोन्ही पाय गेले. शिबिरात त्याला ‘जयपूर फूट’ मिळाल्यानंतर तो म्हणाला, मला वर्षभरानंतर पुन्हा माझे पाय मिळाल्यासारखा आनंद होत आहे. या व्यतिरिक्त रामटेक तालुक्यातील नगरधन येथील ईश्वर रामचंद्र मेंढे (वय ५६) यांना वयाच्या २४ व्या वर्षी मशीनमध्ये पाय गेल्याने अपंगत्व आले. अपघातापूर्वी ते टेलरिंगचे काम करून कुटुंबाचे पालनपोषण करीत होते. परंतु पाय निकामी झाल्याने त्यांना टेलरिंगचे काम सोडावे लागले. यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. ते काही काळासाठी हताश झाले. परंतु त्यांना ‘जयपूर फूट’ मिळताच ते पुन्हा आपल्या पायावर उभे झाले. या पायाच्या मदतीने आपण शेतीचे काम सुद्धा करीत असल्याचे यावेळी ईश्वर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)