शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

...अन् नागपूर मनपा मुख्यालयात पसरली निराशा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 12:47 IST

मंगळवारी दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त येताच सत्तापक्ष कार्यालयात शांतता पसरली.

ठळक मुद्देफडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने प्रशासन व पदाधिकारी चिंतित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील सत्ता परिवर्तनाची चाहूल लागताच मंगळवारी महापालिका मुख्यालयात निराशा पसरली. विकास कामासोबतच प्रशासकीय प्रस्ताव व प्रक ल्पावर परिणाम होण्याची चर्चा सुरू झाली. मंगळवारी दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त येताच सत्तापक्ष कार्यालयात शांतता पसरली. विषय समित्यांच्या बैठकी झाल्या, परंतु पदाधिकारी उत्साहात नव्हते. सत्तांतरामुळे प्रशासन व सत्तापक्षाची चिंता वाढल्याचे दिसून आले.विषय समित्यांच्या बैठका संपताच पदाधिकारी व नगरसेवक कार्यालयातून तातडीने बाहेर पडले. फडणवीस यांच्या पदग्रहणाच्या वेळी सर्वत्र उत्साह दिसून आला होता. परंतु यावर विरजण पडले आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी महापालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होईल, अशी आशा होती. परंतु यावर कोणताही निर्णय झालेला नाही. निवडणूक संपताच पुन्हा सत्ता आल्यावर सातवा वेतन आयोग लागू केला जाईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली होती. फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच आता सातवा वेतन आयोग मिळेल, अशी आशा कर्मचाऱ्यांना होती. परंतु त्यांनी राजीनामा दिल्याने वेतन आयोग लागू होण्याची शक्यता वाटत नाही.ऐवजदार कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम करण्याचा प्रस्ताव प्रलंबित राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. काही वर्षांपूर्वी राज्य सरकारने २०१ पदे भरण्याला मंजुरी दिली होती. परंतु महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने नवीन भरती झालेली नाही. भाजप समर्थक अधिकारी व कर्मचारी निराश असल्याचे दिसून आले. मात्र पदाधिकारी व भाजप नेत्यांच्या दबावामुळे त्रस्त काही अधिकारी आनंदात दिसले. आता नियम बाजूला सारून काम करण्याची प्रवृत्ती कमी होईल, अशी या अधिकाऱ्यांची धारणा आहे.

विशेष अनुदानाबाबत शंकानागपूर शहराला उपराजधनीचा दर्जा प्राप्त असल्याने महापालिकेला विशेष निधी देण्याची तरतूद माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी केली होती. परंतु अनेक वर्ष हा निधी मिळाला नव्हता. परंतु गेल्या दोन वर्षात महापालिकेला ३०० कोटीहून अधिक विशेष निधी मिळाला. यावर्षीही विशेष निधी मिळण्याची आशा होती. परंतु सत्ता परिवर्तनामुळे विशेष निधी मिळणार की नाही. अशी शंका निर्माण झाली आहे.

मुख्यमंत्री निधीचा लाभ मिळणार नाहीदेवेंद्र फडणवीस दक्षिण-पश्चिम नागपूर मतदार संघाचे आमदार असल्याने त्यांनी विशेष अधिकाराचा वापर करून मुख्यमंत्री निधीतून या भागातील विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केला. यातून रस्ते, सिवरेज लाईन, पावसाळी नाल्या व अन्य विकास कामे करण्यात आली. परंतु आता मुख्यमंत्री निधीतून निधी मिळणार नाही.

प्रकल्पावर परिणाम होणारसत्ता परिर्वतनासोबतच शहरातील विकास प्रकल्पांना बे्रेक लागण्याची दाट शक्यता आहे. आॅरेंज सिटी स्ट्रीट, सिमेंट रस्ते, स्मार्ट सिटी प्रकलप, नाग नदी शुद्धीकरण प्रकल्प, अमृत योजना, तलाव शुद्धीकरण यासोबतच केळीबाग रोड, जुना भंडारा रोड व पारडी रोड अशा प्रकल्पांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीत उत्साहराज्यात शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार गठित होणार असल्याचे वृत्त येताच महापालिकेतील काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांत उत्साह दिसून आला. महापालिका मुख्यालयाबाहेर दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी झेंडे उंचावून आनंद वयक्त केला. भावी सरकारच्या समर्थनात नारे लावले.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका