शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

..अन् नर्तिकेच्या भुताचा झाला मुंगूस

By admin | Updated: November 17, 2014 00:55 IST

मेळघाटाच्या जंगलात कोकट नावाचे वन विश्रामगृह आहे. तेथे मी नेहमीच जायचो. तिथल्या वन कर्मचाऱ्यांनी मला तेथे जाण्यापूर्वीच घाबरवून टाकले होते. रात्री २ वाजता ब्रिटिशांच्या काळातील

अरण्यवाचक मारुती चितमपल्ली यांची प्रकट मुलाखत : ‘आपली वसुंधरा’ प्रदर्शन व परिसंवाद नागपूर : मेळघाटाच्या जंगलात कोकट नावाचे वन विश्रामगृह आहे. तेथे मी नेहमीच जायचो. तिथल्या वन कर्मचाऱ्यांनी मला तेथे जाण्यापूर्वीच घाबरवून टाकले होते. रात्री २ वाजता ब्रिटिशांच्या काळातील नृत्यांगनेचे भूत येथे नृत्य करते त्यामुळे तेथे न राहणेच योग्य, असे त्यांनी सांगितले. त्या नर्तिकेच्या भीतीने येथे कुणीच येत नाही, असेही सांगण्यात आले. मला कुतूहल वाटले म्हणून मी तेथेच राहण्याचा निर्णय घेतला. काय भानगड आहे, ती पहावी म्हणून मी थांबलो. रात्री खरेच घुंगरांचा आवाज आला. टार्च लावून ती नृत्यांगना शोधायला मी बाहेर पडलो तर गळ्यात घुंगरू बांधलेला मुंगूस उंदरांच्या मागे धावताना दिसला, अशी जंगलातील गंमत सांगत ज्येष्ठ अरण्यवाचक मारुती चितमपल्ली यांनी अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तरे देऊन आज अरण्यप्रेमींचे समाधान केले. स्वरसाधना आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने आयोजित ‘आपली वसुंधरा’ प्रदर्शनात त्यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम झाला. पूर्णचंद्रराव बुटी सभागृहात त्यांची मुलाखत डॉ. सुहास पुजारी आणि विवेक देशपांडे यांनी घेतली. याप्रसंगी चितमपल्ली यांनी त्यांच्या अनुभवांची शिदोरी उपस्थितांसमोर रिती करून जंगल वाचविण्याचे आवाहन केले. सातारा, सांगली परिसरात एक वनाधिकारी होते. त्यांनी त्या भागात सागवानाचे जंगल निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण हत्तींचा कळप येऊन सागाच्या झाडांची नासधूस करायचा. आदिवासी मुलीकडून त्यांना एक सूचना मिळाली. उंटावर बसून जंगलाचे रात्री रक्षण करायचे. त्यांनी तसेच केले. हत्तींनी उंट कधीच पाहिला नव्हता. त्यामुळे उंटाला पाहिल्यावर हत्तींचा कळप पळून जायचा, अशी आठवण त्यांनी सांगितली. मराठीत समुद्राच्या सृष्टीबाबत लेखनच झाले नाही. पण समुद्रात विविध प्रकारचे प्राणी आहे. खेकडे, शार्क, डॉल्फीन यांचेही वेगवेगळे प्रकार आहे. ते अभ्यासण्यासाठी मी कोकणात राहिलो. त्यावर सध्या लेखन सुरू आहे. विद्यार्थीदशेत एक शिक्षक वृक्षांची माहिती समरसून द्यायचे. खडकाळ जागेतल्या चंदनाच्या झाडाला सुगंध असतो तर सुपीक जागेतल्या चंदनाच्या झाडाला मात्र सुगंध नसतो. माणसाचेही तसेच आहे. यातना सहन केलेला माणूसच काहीतरी करू शकतो, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या आदर्शावरच मी जीवन जगलो, असे ते म्हणाले.(प्रतिनिधी)