शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

देशात अराजकता, संघर्ष अटळ

By admin | Updated: April 14, 2017 03:03 IST

देशात एका विशिष्ट विचारसरणीला पुरस्कृत करण्यात येत आहे. यामुळे देशातील गरीब, पीडित, दलित, आदिवासी, मुस्लीम ह्या समुदायामध्ये भीती आहे.

कन्हैयाकुमार : ‘बिहार से तिहार’ मराठी अनुवादित पुस्तकाचे प्रकाशननागपूर : देशात एका विशिष्ट विचारसरणीला पुरस्कृत करण्यात येत आहे. यामुळे देशातील गरीब, पीडित, दलित, आदिवासी, मुस्लीम ह्या समुदायामध्ये भीती आहे. परंतु या विचारसरणीला लढा देण्यासाठी वैचारिक संघर्ष यापुढे सातत्याने होणार आहे. देशातील अराजकतेविरुद्ध संघर्ष अटळ असल्याचा इशारा जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैयाकुमार यांनी नागपुरात दिला. अखिल भारतीय प्रगतिशील लेखक संघ, लोकवाङ्मय गृह आणि आयटकतर्फे आयोजित कन्हैयाकुमारने लिहिलेल्या ‘बिहार से तिहार’ पुस्तकाचे सुधाकर शेंडगे यांनी मराठीत केलेल्या अनुवादाचे प्रकाशन गुरुवारी कन्हैयाकुमार यांच्या उपस्थितीत धनवटे कॉलेजच्या सभागृहात करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. हरिभाऊ केदार, आयटकचे श्याम काळे, संगीता महाजन उपस्थित होते. यावेळी कन्हैयाकुमार पुस्तकासंदर्भात बोलले की, मी लेखक नाही आणि यापुढे पुस्तकही लिहिणार नाही. माझी ही आत्मकथाही नाही. मात्र माझा जो संघर्ष आहे त्याचे संक्षिप्त विवरण या पुस्तकात आहे. अनेकांना कन्हैयाकुमार माहिती नाही, त्यांना कन्हैयाकुमार कळावे, त्यामुळे माझा इतिहास या पुस्तकातून मांडला आहे. या समाजात जे समता, लोकतंत्र व न्यायासाठी संघर्ष करीत आहे, त्यांना माझे पुस्तक समर्पित आहे. पुस्तकातून क्रांती होईल, ही माझी अपेक्षा नाही, परंतु बरेच काही होईल, हा विश्वास आहे. माझ्याबद्दल समाजात जे भ्रम पसरविले आहे, या पुस्तकातून ते दूर होणार आहे. याप्रसंगी बोलताना डॉ. यशवंत मनोहर म्हणाले की, परिवर्तनवादी देशात समाजाचे विघटन झाले आहे. समाज वेगवेगळ्या फळ्यांमध्ये विभागला आहे. हुकूमशाहीचे आगमन होत आहे. देशात धर्मांधतेचे वातावरण निर्माण होत आहे. या गोष्टी अशक्य करायच्या असतील तर एक पावनखिंड लढवावी लागले. त्यासाठी गटातटाच्या लोकांना एकत्र यावे लागेल. या पुस्तकातून कन्हैयाकुमारसारख्या तरुण लेखकाने व्यवस्था परिवर्तनाचा संदेश दिला आहे. परिवर्तन आणायचे असेल तर स्वत:मध्ये परिवर्तन घडवून आणा, पुनर्रचना करा आणि क्रांतीशी हातमिळवणी करा, असे पुस्तकातून कन्हैयाकुमार सांगतो आहे. याप्रसंगी प्रा. हरिभाऊ केदार म्हणाले की, कन्हैयाकुमार यांनी या पुस्तकातून देशाला परिवर्तनाची दिशा दिली आहे. (प्रतिनिधी)