शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
2
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
3
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
4
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
5
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
6
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
7
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
8
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
9
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
10
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
11
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
12
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
13
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
14
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
15
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
16
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
17
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
18
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
19
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
20
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू

देशात अराजकता, संघर्ष अटळ

By admin | Updated: April 14, 2017 03:03 IST

देशात एका विशिष्ट विचारसरणीला पुरस्कृत करण्यात येत आहे. यामुळे देशातील गरीब, पीडित, दलित, आदिवासी, मुस्लीम ह्या समुदायामध्ये भीती आहे.

कन्हैयाकुमार : ‘बिहार से तिहार’ मराठी अनुवादित पुस्तकाचे प्रकाशननागपूर : देशात एका विशिष्ट विचारसरणीला पुरस्कृत करण्यात येत आहे. यामुळे देशातील गरीब, पीडित, दलित, आदिवासी, मुस्लीम ह्या समुदायामध्ये भीती आहे. परंतु या विचारसरणीला लढा देण्यासाठी वैचारिक संघर्ष यापुढे सातत्याने होणार आहे. देशातील अराजकतेविरुद्ध संघर्ष अटळ असल्याचा इशारा जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैयाकुमार यांनी नागपुरात दिला. अखिल भारतीय प्रगतिशील लेखक संघ, लोकवाङ्मय गृह आणि आयटकतर्फे आयोजित कन्हैयाकुमारने लिहिलेल्या ‘बिहार से तिहार’ पुस्तकाचे सुधाकर शेंडगे यांनी मराठीत केलेल्या अनुवादाचे प्रकाशन गुरुवारी कन्हैयाकुमार यांच्या उपस्थितीत धनवटे कॉलेजच्या सभागृहात करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. हरिभाऊ केदार, आयटकचे श्याम काळे, संगीता महाजन उपस्थित होते. यावेळी कन्हैयाकुमार पुस्तकासंदर्भात बोलले की, मी लेखक नाही आणि यापुढे पुस्तकही लिहिणार नाही. माझी ही आत्मकथाही नाही. मात्र माझा जो संघर्ष आहे त्याचे संक्षिप्त विवरण या पुस्तकात आहे. अनेकांना कन्हैयाकुमार माहिती नाही, त्यांना कन्हैयाकुमार कळावे, त्यामुळे माझा इतिहास या पुस्तकातून मांडला आहे. या समाजात जे समता, लोकतंत्र व न्यायासाठी संघर्ष करीत आहे, त्यांना माझे पुस्तक समर्पित आहे. पुस्तकातून क्रांती होईल, ही माझी अपेक्षा नाही, परंतु बरेच काही होईल, हा विश्वास आहे. माझ्याबद्दल समाजात जे भ्रम पसरविले आहे, या पुस्तकातून ते दूर होणार आहे. याप्रसंगी बोलताना डॉ. यशवंत मनोहर म्हणाले की, परिवर्तनवादी देशात समाजाचे विघटन झाले आहे. समाज वेगवेगळ्या फळ्यांमध्ये विभागला आहे. हुकूमशाहीचे आगमन होत आहे. देशात धर्मांधतेचे वातावरण निर्माण होत आहे. या गोष्टी अशक्य करायच्या असतील तर एक पावनखिंड लढवावी लागले. त्यासाठी गटातटाच्या लोकांना एकत्र यावे लागेल. या पुस्तकातून कन्हैयाकुमारसारख्या तरुण लेखकाने व्यवस्था परिवर्तनाचा संदेश दिला आहे. परिवर्तन आणायचे असेल तर स्वत:मध्ये परिवर्तन घडवून आणा, पुनर्रचना करा आणि क्रांतीशी हातमिळवणी करा, असे पुस्तकातून कन्हैयाकुमार सांगतो आहे. याप्रसंगी प्रा. हरिभाऊ केदार म्हणाले की, कन्हैयाकुमार यांनी या पुस्तकातून देशाला परिवर्तनाची दिशा दिली आहे. (प्रतिनिधी)