शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर सुविधा, कडेकोड सुरक्षा; प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

अमृत योजनेचा ७५.९० कोटीचा जादाचा भूर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:07 IST

विलंबामुळे २१ जलकुंभ बांधकाम खर्चात वाढ लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्र सरकारने अमृत योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरी ...

विलंबामुळे २१ जलकुंभ बांधकाम खर्चात वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : केंद्र सरकारने अमृत योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरी पाणी पोहचवण्याचा संकल्प केला आहे. या योजनेंतर्गत नागपूर शहराला २७२.०२ कोटींचा निधी मिळाला. ४३ जलकुंभ व नळाच्या लाईन टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु विलंबामुळे प्रकल्प खर्चात वाढ होत आहे. सध्या ११ जलकुंभाचे काम सुरू आहे तर २१ जलकुंभाचा खर्च वाढल्याने ७५.९० कोटी रुपये महापालिकेला अतिरिक्त खर्च करावे लागणार आहे.

११ जलकुंभ उभारण्याच्या कामात अडचणी आहेत. यामुळे काम थांबविण्यात आले आहे. वाढीव खर्चाला मंजुरी देण्याचा प्रस्ताव २२ जुलैला होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठेवला जाणार आहे. या प्रस्तावाला मंजुरी दिली जाईल. परंतु नियोजनाअभावी प्रकल्पाला विलंब होत आहे.

अमृत योजनेचे काम जवळपास ६ ते ७ वर्षापासून सुरू आहे. परंतु यात अडचणी येत आहेत. जलकुंभाच्या निविदा निर्धारित दराच्या तुलनेत ३० ते ४० टक्के अधिक रकमेच्या आहेत. योजनेंतर्गत मंजुरी मिळाल्यानंतर ३ ते ४ वर्ष कंत्राटदारांकडून प्रतिसादच मिळाला नाही. याचा विचार करता शासकीय कंपनी वाप्कोसच्या माध्यमातून काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. वाप्कोसला जमीन उपलब्ध न झाल्याने व अन्य तांत्रिक कारणामुळे फक्त १७ जलकुंभाच्या कामाला होकार मिळाला. ११ जलकुंभांच्या बांधकामाला सुरुवातही करण्यात आली. परंतु गोधनी जलकुंभासाठी प्रस्तावित जागेतील मातीचे परीक्षण केले असता येथे जलकुंभ उभारणे शक्य नाही. यामुळे काम थांबविण्यात आले. उर्वरित ५ जलकुंभाचे डीपीआर मूळ किमतीच्या १६ कोटी अतिरिक्त रकमेची निविदा कंत्राटदारांनी भरली आहे. निर्धारित दराच्या तुलनेत ३५ टक्के अधिक रकमेची निविदा आहे. दुसरीकडे उर्वरित २७ जलकुंभाचे निर्माण स्वत: करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. यासाठी बोलाविण्यात आलेल्या निविदा ३० ते ४० टक्के अधिक रकमेच्या आहेत. यामुळे आर्थिक बोजा वाढत आहे.

....

जागेअभावी ११ जलकुंभाचे काम रखडले

जागा उपलब्ध न झाल्याने ११ जलकुंभांचे बांधकाम सुरू करता आलेले नाही. यात लक्ष्मीनगर - १, बिनाकी- १,चिंचभुवन, बस्तरवारी, जरीपटका, धंतोली, बोरियापुरा, गोधनी, वांजरा, रामनगर, लक्ष्मीनगर जलकुंभाचा समावेश आहे.

...

तर आधीच काम पूर्ण झाले असते

२०१६ मध्ये अमृत योजनेंतर्गत नागपूर शहराची निवड करण्यात आली. जवाहरलाल नेहरू अर्बन रिन्यूअल मिशन(जेएनएनयूआरएम) योजनेंतर्गत शिल्लक कामे पूर्ण करण्यासाठी नागपूर शहराची निवड करण्यात आली. दोन वर्षात ६ वेळा निविदा काढण्यात आल्या. एकाच टप्प्यात काम करण्यासाठी कंत्राटदार मिळाला नाही. त्यानंतर काम तुकड्यात करण्यासाठी निविदा काढण्यात आली. यावेळी ३० ते ३५ टक्के अधिक रकमेच्या निविदा आल्या. दर अधिक असल्याने मनपाने मंजुरी दिली नाही. नंतर वाप्कोस कंपनीकडून काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु त्यांनीही वाढीव किमतीवर काम करण्याला तयारी दर्शविली. आता मनपाला अतिरिक्त निधी खर्च करावा लागत आहे. वेळीच प्रकल्प राबविला असता तर मनपावर अतिरिक्त आर्थिक भुर्दंड बसला नसता.