शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

मधूर स्वरशब्दांची अमृतवर्षिणी मैफिल

By admin | Updated: July 3, 2014 00:59 IST

अभिजात शास्त्रीय संगीतातील राग, रागिण्यांमध्ये विविध भावनांचा समुच्चय स्वरांच्या माध्यमातून केला आहे. शास्त्रीय रागांवर आधारित गीतेही त्या रागाचे सौंदर्य घेऊन जन्माला येतात.

रंगबावराचे आयोजन : शास्त्रीय रागसंगीतावर आधारित गीतांचे सादरीकरण नागपूर : अभिजात शास्त्रीय संगीतातील राग, रागिण्यांमध्ये विविध भावनांचा समुच्चय स्वरांच्या माध्यमातून केला आहे. शास्त्रीय रागांवर आधारित गीतेही त्या रागाचे सौंदर्य घेऊन जन्माला येतात. त्यामुळे ही गीतेही जाणकार रसिकांच्या मनातच घर करतात. अशाच सरस अनुभूतीच्या ‘अमृतवर्षिणी’ या अनोख्या मैफिलीचे आयोजन रंगबावरा संस्थेतर्फे करण्यात आले. हा कार्यक्रम सायंटिफिक सभागृह, लक्ष्मीनगर येथे पार पडला. श्रोत्यांच्या कानावर हळुवार मोरपीस फिरविणारी विविध रागातील गीतांनी, बंदिशींनी यावेळी रसिकांचा ताबा घेतला. अनेकदा ऐकलेली, आवडीची आणि भावपूर्ण शब्दांची ही गीते नेमकी कोणत्या रागातील आहे, हे यावेळी सहजतेने उलगडत असल्याने रसिकांना ही मैफिल आनंदपर्वणी होती. सायली आचार्य, सुजाता व्यास या प्रतिभावंत गायिकांनी यावेळी शास्त्रीय संगातातील अर्थभावपूर्ण बंदिशी तर विवेक देशपांडे, अजय देवगावकर यांनी हिंदी-मराठी गीतांचे सुरेल सादरीकरण करून उपस्थितांना आनंद दिला. यावेळी शिरीष भालेराव यांनी व्हायोलिनवर काही रागातील रचना सादर करून आपल्या वादनाचा परिचय दिला. बालपणापासून स्वर शब्दांच्या उद्यानात बागडण्याचे भाग्य लाभलेल्या सुपरिचित गायिका सायली आचार्य या युवा गायिकेने राग मधुवंतीने गायनाला प्रारंभ केला. प्रख्यात गायक पं. कुमार गंधर्व आणि वसंतराव देशपांडे यांच्या खास मित्रभावातील सांगितिक संवादावर कुमारजींनी रचलेल्या ‘मै आऊ तेरे मंदरवा...’ व द्रुत लयीतील ‘जाऊ बलिहारी तोपे ना...’ या बंदिशीसह ‘रस्मे उल्फत को निभाये तो निभाये कैसे...’ हे गीतही सायलीने तयारीने सादर केले. याशिवाय राग नंदमधील कुमारजींनी रचलेली बंदिश व तराणा तर ‘तू जहां जहां चलेगा...’ हे सिनेगीत सादर करून तिने रसिकांची दाद घेतली. संगीतातील जाणत्या गायिका सुजाता व्यास यांनी राग यमनकल्याणमधील पारंपरिक बंदिश ‘अवगुन न किजीए...’ तर विवेक देशपांडे यांनी ‘वो शाम कुछ अजीब थी...’ हे गीत सादर केले. सुजाता यांनी ‘नीर भरन कैसे जाऊ अब...’ ही रसिली ठुमरी, बंदिश, तराणा आणि त्यावरील अजय देवगावकर यांनी सादर केलेले ‘जिया जरत रहत दिन रैन वो रामा...’ सादर करून दाद मिळविली. शिरीष भालेराव यांनी व्हायोलिनवर राग गौडमल्हारमधील बंदिश, सुरेलतेने सादर करून राग मेघमल्हारमधील बंदिशही पेश केली. सुजाता व्यास यांनी डॉ. बाळासाहेब पुरोहित यांनी रचलेली राग चारुकेशीतील बंदीश ‘लाग रही सुरसे प्रित..’ तयारीने सादर केली. अजयने संत नामदेव महाराजांच्या अभंगाच्या भैरवीने या कार्यक्रमाचे समापन केले. या मैफिलीचे निवेदन अधिश्री देशपांडे आणि अनुराधा देशपांडे यांनी केले. गायकांना ओंकार वैद्य-तबला, अजय गोसावी व भाविक मणियार-संवादिनी, उज्ज्वला गोकर्ण - सहतालवाद्य आणि परिमल जोशी यांनी सिंथेसायझरवर साथसंगत केली.(प्रतिनिधी)