शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक चक्रात अडकली ‘अमृत’ योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:07 IST

गणेश हूड लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्र सरकारच्या अटल मिशन फॉर रिज्युव्हेशन अ‍ॅन्ड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (अमृत) योजनेतून मनपाला ...

गणेश हूड

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : केंद्र सरकारच्या अटल मिशन फॉर रिज्युव्हेशन अ‍ॅन्ड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (अमृत) योजनेतून मनपाला ऑक्टोबर २०१६ मध्ये २२६ कोटींचा निधी मंजूर झाला होता. यातून २४ बाय ७ योजना संपूर्ण शहरात राबविणे व लोकसंख्येनुसार जलकुंभांची निर्मिती अशी कामे अजूनही पूर्ण झालेली नाही. मनपा आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात २४ बाय ७ योजनेसाठी ७८ कोटी तर १० जलकुंभांच्या बांधकामासाठी ७२.५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र आर्थिक स्थिती विचारात घेता या खर्चाला मंजुरी नसल्याने अमृत योजना आर्थिक चक्रात अडकण्याची शक्यता आहे.

शहरातील पाणी गळती रोखणे व ३० टक्के पाईपलाईन बदलण्याचे काम करणे अपेक्षित होते. लाइन बदलण्याचे काम पूर्ण झाले. परंतु गळती थांबलेली नाही. नागपूर शहरात २०११-१२ या वर्षापासून २७ बाय ७ योजना राबविली जात आहे. ही योजना पूर्ण झाल्यानंतर शहरातील नागरिकांना २४ तास पाणी मिळणार असल्याचा दावा केला जात आहे. अर्धा शहरात यासाठी पाईपलाईन बदलण्यात आल्या. परंतु या भागात २४ तास पाणी मिळत नाही. नागपूर शहराला दररोज ६५० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. यात मोठ्या प्रमाणात गळती आहे. योजना पूर्ण झाली तर गळती रोखण्यात यश येईल. असा दावा प्रशासनातर्फे केला जात आहे. याचा विचार करता संपूर्ण शहरात योजना राबविण्यासाठी आयुक्तांनी २०२१-२२च्या अर्थसंकल्पात ७८ कोटींची तरतूद केली आहे. मात्र आर्थिक स्थिती बघता हा निधी उपलब्ध होण्याची शक्यता कमीच आहे.

....

पाईपलाईन व जलकुंभासाठी ७२.५० कोटी

मनपा क्षेत्रातील अधिकृत, अनधिकृत, स्लम भागात पाणीपुरवठा करण्यासाठी योजनेचे विस्तारीकरण करण्याची गरज आहे. सुधारित प्रस्तावानुसार १७ जलकुंभ व ३७७ कि.मी. लांबीची पाईपलाईन प्रस्तावित आहे. यातील ११७ कि.मी. लाईन अजूनही शिल्लक आहे. १० जलकुंभांची कामे झालेली नाहीत. यासाठी आयुक्तांच्या अर्थसंकल्पात ७२.५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र या खर्चाला मंजुरी मिळालेली नाही.

.....

अर्थसंकल्प म्हणजे कागदी घोडे

आयुक्तांच्या अर्थसंकल्पात पाणीपुरवठा योजनेसाठी १५०.५० कोटींची तरतूद केली आहे. परंतु तरतूद असलेले शीर्षक अद्याप सुरू केलेले नाही. त्यामुळे अर्थसंकल्पातील आकडे हे कागदी घोडे आहेत. प्रत्यक्षात कामे करावयाची असल्यास यासाठी निधी उपलब्ध करण्याची गरज आहे. तरतूद करायची पण निधी द्यायचा नाही. यातून विकासकामे कशी होणार?

- विजय झलके, माजी अध्यक्ष, स्थायी समिती