शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अमरावती येथील कोट्यवधीच्या जमिनीचा लंडनमध्ये सौदा

By admin | Updated: October 16, 2016 02:48 IST

अमरावती येथील कोट्यवधीची जमीन हडपण्यासाठी नागपुरातील एका नोटरीच्या बनावट सही व शिक्क्यांचा वापर करून लंडन येथे सामंजस्य करार करण्यात आला.

नागपूरच्या नोटरीच्या बनावट सह्या : बनवाबनवीबाबत हायकोर्टाने मागितला अहवालनागपूर : अमरावती येथील कोट्यवधीची जमीन हडपण्यासाठी नागपुरातील एका नोटरीच्या बनावट सही व शिक्क्यांचा वापर करून लंडन येथे सामंजस्य करार करण्यात आला. या संदर्भात दाखल वेगवेगळ्या चार फौजदारी रिट याचिका उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांच्या खंडपीठाने एकत्र करून सुनावणीस घेतल्या आहेत. न्यायालयाने सदर पोलीस ठाण्याच्या ठाणेदाराला नोटीस जारी करून एका आठवड्यात या बनवाबनवी संदर्भात विस्तृत अहवाल मागविला आहे. खुद्द नोटरी अ‍ॅड. ब्रिजेस प्रसाद यांच्यामार्फत अ‍ॅड. वंदन गडकरी यांनी या बनवाबनवीबाबत याचिका दाखल केली. याचिकेनुसार २ जानेवारी २०१३ रोजी लंडन येथे प्रतापसिंग पांडुरंग बनारसे व इतर पाच तसेच सोमलवाडा येथील चंद्रशेखर बळीराम हाडके यांच्यात अमरावती येथील चार एकर जागेच्या संदर्भात सामंजस्य करार करण्यात आला. करारावर त्यांच्या बनावट सह्या, शिक्के मारून पंजीयन क्रमांक नमूद करण्यात आला. त्यांनी याचिकेत असेही नमूद केले की, या बनवाबनवीबाबत आपणास समजताच सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. परंतु कोणतीही कारवाई न करण्यात आल्याने ही याचिका दाखल केली. अन्य एक याचिका वामन भगवान जाधव यांनी अ‍ॅड. शशिभूषण वाहणे यांच्या मार्फत दाखल केली. जाधव हे चंद्रशेखर हाडके यांच्यासोबत काम करीत होते. या दरम्यान चंद्रशेखर हाडके , प्रतापसिंग बनारसी आणि इतरांनी हा खोटा सामंजस्य करार तयार केला. त्यावर अमरावती येथील शेषराव गोयटे यांच्या बनावट सह्या साक्षीदार व संमतीदार म्हणून केल्या. त्याच प्रमाणे अनेक कागदपत्रांवर गोयटे यांच्या बनावट सह्या केल्या. ही कागदपत्रे सरकारी कार्यालयात वापरण्याकरिता अधिकाऱ्यांना लाच दिली. त्याच प्रमाणे अनेक व्यक्तींच्या नावे बनावट देयके तयार करून त्यांचा उपयोग सदर येथील आयकर कार्यालयात केला. यात वामन जाधव यांच्या नावे ४० लाख रुपये दाखवण्यात आले. आयकर विभागाकडून नोटीस मिळताच जाधव यांनी विस्तृत तक्रार सदर पोलीस ठाण्यात दाखल केली. यावर कारवाई न झाल्याने ही रिट याचिका दाखल केल्याचे जाधव यांनी याचिकेत नमूद केले.अन्य एक याचिका चंद्रशेखर हाडके यांनी अ‍ॅड. आकाश मून यांच्यामार्फत दाखल केली. याचिकेत असे नमूद करण्यात आले की, याचिकाकर्ते हाडके हे सामंजस्य कराराच्या आधारे अमरावती येथील जागेचा ताबा घेण्यास गेले होते. येथील गोयटे कुटुंबीयांनी हल्ल्याचा आणि एका मुलीच्या विनयभंगाचा आरोप करून खोटी तक्रार केली. ही तक्रार रद्दबातल ठरवण्यात यावी, अशी विनंती याचिकेत करण्यात आली. यावर संबंधित मुलीला न्यायालयाची नोटीस प्राप्त होताच तिने अ‍ॅड. सतीश उके यांच्यामार्फत उत्तर दाखल केले. तिने सामंजस्य कराराचे बनावटीकरण न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.यासाठी तिने पुरावेही सादर केले. आपले वडील आयुष्यात कधीही लंडन येथे गेले नाही, असे सांगून तिने वडिलाचे शपथपत्र न्यायालयात सादर केले. अ‍ॅड. उके यांनी बनावट सामंजस्य कराराची प्रत सादर करण्यासाठी निर्देश देण्यात यावे, अशी न्यायालयाला विनंती केली. यावर हाडके यांनी शपथपत्र दाखल करून कराराची प्रत रिलायन्स कंपनीच्या ताब्यात असल्याचे सांगितले. ही प्रत रिलायन्सच्या ताब्यात नसल्याचे शपथपत्र अ‍ॅड. उके यांनी सादर केले. न्यायालयाने जाधव यांच्या याचिकेत सदर पोलीस ठाण्याच्या ठाणेदाराला नोटीस जारी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहे. एक आठवड्यानंतर पुन्हा हे प्रकरण सुनावणीस येणार आहे. (प्रतिनिधी)