शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
3
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
4
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
5
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
6
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
7
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
8
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
9
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
10
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
11
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
12
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
13
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
14
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
15
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
16
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
17
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
18
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
19
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
20
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली

खारपाण क्षेत्रात मूत्रपिंड निकामी होण्याचे प्रमाण जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 21:43 IST

अनियंत्रित रक्तदाब व मधुमेहामुळे मूत्रपिंड निकामी होण्याचा सर्वाधिक धोका असतो. परंतु हे दोन आजार नसतानाही दक्षिण-पश्चिम विदर्भातील खारपाण पट्ट्यात मूत्रपिंड निकामी होण्याचे रुग्ण वाढले आहेत. शासनाने याला गंभीरतेने घेऊन तातडीने उपाययोजना करायला हव्यात, असे मत नेफ्रोलॉजी सोसोयटीचे अध्यक्ष डॉ. समीर चौबे व संयोजक डॉ. धनंजय उखळकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देसमीर चौबे व धनंजय उखळकर यांची माहितीरक्तदाब, मधुमेहाचा मूत्रपिंडाला धोका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनियंत्रित रक्तदाब व मधुमेहामुळे मूत्रपिंड निकामी होण्याचा सर्वाधिक धोका असतो. परंतु हे दोन आजार नसतानाही दक्षिण-पश्चिम विदर्भातील खारपाण पट्ट्यात मूत्रपिंड निकामी होण्याचे रुग्ण वाढले आहेत. शासनाने याला गंभीरतेने घेऊन तातडीने उपाययोजना करायला हव्यात, असे मत नेफ्रोलॉजी सोसोयटीचे अध्यक्ष डॉ. समीर चौबे व संयोजक डॉ. धनंजय उखळकर यांनी व्यक्त केले.जागतिक मूत्रपिंड दिनाच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी डॉ. व्ही.एल, गुप्ता व सोसायटीचे सचिव डॉ. मनीष बलवानी उपस्थित होते.डॉ. उखळकर म्हणाले, पनामा देशातील उस कामगारांमध्ये, श्रीलंकेमधील काही भागात, या शिवाय अमरावती, पुसद, दिग्रस, घाटंजी, नांदेड, बुलडाण्यातही मधुमेह व रक्तदाब नसताना मूत्रपिंड निकामी होण्याचे रुग्ण आढळून येतात. विशेषत: बंजारा समाजात याचे प्रमाण मोठे आहे. विहीर किंवा बोअरवेलच्या पाण्याचा पिण्यासाठी होत असलेला वापर हेही एक यामागील कारण असावे. यातील बहुसंख्य रुग्ण शेवटच्या टप्प्यात येतात. अनेकांना डायलिसीससारखे खर्चिक उपचार झेपत नसल्याने मृत्यूचा आकडाही वाढत आहे. खंडाळामध्ये दर तिसऱ्या घरात रुग्णआकोट तालुक्यातील खंडाळा गावात दर तिसऱ्या घरात मूत्रपिंडाचा रुग्ण आढळून येत आहे. उन्हाळ्यात या विकाराच्या रुग्णांत वाढ होते. हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या मूत्रपिंड विकाराच्या १०० रुग्णांमध्ये २५ रुग्ण हे मूत्रपिंड निकामी होण्याच्या टप्प्यात आलेले असतात.कीटकनाशकाचा अतिवापरडॉ. चौबे म्हणाले, कीटकनाशकाचा अतिवापरामुळे प्रदूषित झालेली पिके, जमीन, हवा व पाण्यामुळेही मूत्रपिंडाचे विकार वाढल्याचे दिसून येते. दुसरे म्हणजे, विहिरी व बोअरवेलचे पाणी खूप खोल गेले आहे. ढोबळमानाने या पाण्याची तपासणी होते. यामुळे विषारी क्षाराची नोंदणीच होत नाही. विकाराला हेही एक कारण आहे.२०४०पर्यंत मूत्रपिंडाचे विकार पाचव्या क्रमांकावरमूत्रपिंड विकारामुळे येणाऱ्या मृत्यूचे प्रमाण २०१६ मध्ये अकराव्या स्थानी होते. शासनाने याला गंभीरतेने न घेतल्यास २०४०पर्यंत हे प्रमाण पाचव्या क्रमांकावर जाऊ शकते. जागतिक किडनी कौन्सिलने संयुक्त राष्ट्रसंघात (यूनो) ही बाब मांडली आहे.

टॅग्स :doctorडॉक्टरHealthआरोग्य