शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

जिल्ह्यातील जमिनीत लोह, सल्फर, झिंकचे प्रमाण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:08 IST

नागपूर : रासायनिक खतांच्या अतिवापराचे दुष्परिणाम हळूहळू दिसायला लागले आहेत. जमिनीचा पोत खराब होत असून सुपिकता हरवत चालली आहे. ...

नागपूर : रासायनिक खतांच्या अतिवापराचे दुष्परिणाम हळूहळू दिसायला लागले आहेत. जमिनीचा पोत खराब होत असून सुपिकता हरवत चालली आहे. नागपूर जिल्ह्यात झालेल्या निरीक्षणात ही बाब पुढे आली आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये जमिनीत आयरन (लोह), झिंक आणि सल्फर यांसारखे सूक्ष्म अन्नद्रव्याचे प्रमाण घटत चालले आहे. शिवाय नायट्रोजनची कमतरताही निर्माण झाली आहे.

जिल्हा कृषी विभागाने गेल्या काही दिवसात सर्व तालुक्यातील गावांमध्ये जमिनीचे सर्वेक्षण केले आहे. तसा रामटेक वगळता सर्व तालुक्यांमध्ये सुपिकता इंडेक्स समाधानकारक आहे. रामटेक तालुक्यामध्ये नायट्राेजन, फाॅस्फेट व पाेटॅशियम या मुख्य अन्न द्रव्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले आहे. हा इंडेक्स अनुक्रमे १.०७, १.८६ व २.०९ एवढा आहे. दरम्यान सर्व तालुक्यामध्ये नायट्राेजनची कमतरता निर्माण झाली आहे. दरम्यान रामटेक वगळता सर्व तालुक्यामध्ये फाॅस्फेट व पाेटॅशियमचे प्रमाण कळमेश्वर, काटाेल, कामठी, माैदा, नरखेड, पारशिवनी, सावनेर या तालुक्यांमध्ये अधिक तर उर्वरीत तालुक्यात चांगले आहे.

मात्र चिंतेची बाब म्हणजे सर्व तालुक्यांमध्ये जमिनीत लाेह, झिंक व सल्फर या सूक्ष्म अन्न द्रव्यांची कमतरता निर्माण झाली आहे. काॅपर, मॅगनिज, बाेराॅन हे घटक मात्र समाधानकारक आहेत. पिकांच्या वाढीपासून ते पिक येण्यापर्यंत किंवा फळ झाडाला फळ येईपर्यंत हे सर्व घटक महत्त्वाची भूमिका बजावणारे आहेत. पीएच ७.४ ते ८.४ असल्याने जमिन आम्लयुक्त हाेत असल्याचेही नमुद करण्यात आले आहे. जमिनीचा पाेत खराब हाेत चालल्याने सुपिकता घसरली असून उत्पादन कमी हाेत आहे. त्यामुळे रासायनिक खतांच्या अतिवापरावर नियंत्रण आणण्याची गरज निर्माण झाली आहे.

१८२४ गावांमध्ये सुपिकता निर्देशांक फलक

कृषी विभाग रासायनिक खतांचा अतिवापर कमी करण्यासाठी ११ ते १७ मे पर्यंत जनजागृती सप्ताह राबवित आहे. जमिनीची सुपिकता पातळी व पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी सेंद्रीय, जैविक खतांसह रासायनिक खतांचा याेग्य प्रमाणात वापर करण्याचे आवाहन विभागाने केले आहे.. यासाठी जिल्ह्यातील १८२४ गावांमध्ये सुपिकता निर्देशांक फलक लावला असून तेथील जमिनीच्या आवश्यकतेनुसार प्रत्येक पिकासाठी आणि फळशेतीसाठी किती प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करावा, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.

सुक्ष्म अन्नद्रव्य कमी हाेणे म्हणजे पिकांच्या वाढीपासून ते पीक पूर्ण येईपर्यंत परिणाम करणारे आहे. आयरनमुळे धान, गहू अशा पिकांना मजबुती येते, सल्फर फळ येण्यासाठी महत्त्वाचे आहे तर बाेराॅनसारखे घटक फुले येण्यासाठी आवश्यक आहेत. जैविक खतांमध्ये वातावरणातील नायट्राेजन जमिनीत शाेषण करण्याची व पिकांना पुरविण्याची क्षमता असते. त्यामुळे रासायनिक खतांचा अतिवापर टाळणे आवश्यक आहे.

- अरविंद्र उपरीकर, कृषी अधिकारी, जिल्हा कृषी विभाग