शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
2
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
3
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
4
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
5
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
6
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
7
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
8
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
9
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा
10
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल फ्लॉप, तुर्कस्तानचं ड्रोन पाडलं"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
11
'आमचे इस्लामिक सैन्य, आमचे कामच जिहाद', पाकिस्तानी लष्करप्रमुखाचा व्हिडिओ व्हायरल...
12
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
13
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...
14
ड्रोन बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं 3 दिवसांत दिला 37% परतावा, 500 रुपयांवर पोहोचला शेअर
15
शाहरुख खानसोबत ३० वर्षांनी दिसणार 'हा' एव्हरग्रीन अभिनेता, 'किंग' सिनेमात झाली एन्ट्री
16
घराबाहेर पडताना आई तुम्हाला आवर्जून दही-साखर देते का? फायदे समजल्यावर रोजच मागाल
17
काय होता ५००० कोटींचा 'पॅनकार्ड' इनव्हेस्टमेंट फ्रॉड? ५१ लाख गुंतवणूकदारांना घातला गंडा
18
पाकिस्तानचा शेअर बाजार अचानक १ तास करावा लागला बंद! युद्धविरामनंतर नेमकं काय घडलं?
19
'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ
20
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!

जिल्ह्यातील जमिनीत लोह, सल्फर, झिंकचे प्रमाण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:08 IST

नागपूर : रासायनिक खतांच्या अतिवापराचे दुष्परिणाम हळूहळू दिसायला लागले आहेत. जमिनीचा पोत खराब होत असून सुपिकता हरवत चालली आहे. ...

नागपूर : रासायनिक खतांच्या अतिवापराचे दुष्परिणाम हळूहळू दिसायला लागले आहेत. जमिनीचा पोत खराब होत असून सुपिकता हरवत चालली आहे. नागपूर जिल्ह्यात झालेल्या निरीक्षणात ही बाब पुढे आली आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये जमिनीत आयरन (लोह), झिंक आणि सल्फर यांसारखे सूक्ष्म अन्नद्रव्याचे प्रमाण घटत चालले आहे. शिवाय नायट्रोजनची कमतरताही निर्माण झाली आहे.

जिल्हा कृषी विभागाने गेल्या काही दिवसात सर्व तालुक्यातील गावांमध्ये जमिनीचे सर्वेक्षण केले आहे. तसा रामटेक वगळता सर्व तालुक्यांमध्ये सुपिकता इंडेक्स समाधानकारक आहे. रामटेक तालुक्यामध्ये नायट्राेजन, फाॅस्फेट व पाेटॅशियम या मुख्य अन्न द्रव्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले आहे. हा इंडेक्स अनुक्रमे १.०७, १.८६ व २.०९ एवढा आहे. दरम्यान सर्व तालुक्यामध्ये नायट्राेजनची कमतरता निर्माण झाली आहे. दरम्यान रामटेक वगळता सर्व तालुक्यामध्ये फाॅस्फेट व पाेटॅशियमचे प्रमाण कळमेश्वर, काटाेल, कामठी, माैदा, नरखेड, पारशिवनी, सावनेर या तालुक्यांमध्ये अधिक तर उर्वरीत तालुक्यात चांगले आहे.

मात्र चिंतेची बाब म्हणजे सर्व तालुक्यांमध्ये जमिनीत लाेह, झिंक व सल्फर या सूक्ष्म अन्न द्रव्यांची कमतरता निर्माण झाली आहे. काॅपर, मॅगनिज, बाेराॅन हे घटक मात्र समाधानकारक आहेत. पिकांच्या वाढीपासून ते पिक येण्यापर्यंत किंवा फळ झाडाला फळ येईपर्यंत हे सर्व घटक महत्त्वाची भूमिका बजावणारे आहेत. पीएच ७.४ ते ८.४ असल्याने जमिन आम्लयुक्त हाेत असल्याचेही नमुद करण्यात आले आहे. जमिनीचा पाेत खराब हाेत चालल्याने सुपिकता घसरली असून उत्पादन कमी हाेत आहे. त्यामुळे रासायनिक खतांच्या अतिवापरावर नियंत्रण आणण्याची गरज निर्माण झाली आहे.

१८२४ गावांमध्ये सुपिकता निर्देशांक फलक

कृषी विभाग रासायनिक खतांचा अतिवापर कमी करण्यासाठी ११ ते १७ मे पर्यंत जनजागृती सप्ताह राबवित आहे. जमिनीची सुपिकता पातळी व पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी सेंद्रीय, जैविक खतांसह रासायनिक खतांचा याेग्य प्रमाणात वापर करण्याचे आवाहन विभागाने केले आहे.. यासाठी जिल्ह्यातील १८२४ गावांमध्ये सुपिकता निर्देशांक फलक लावला असून तेथील जमिनीच्या आवश्यकतेनुसार प्रत्येक पिकासाठी आणि फळशेतीसाठी किती प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करावा, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.

सुक्ष्म अन्नद्रव्य कमी हाेणे म्हणजे पिकांच्या वाढीपासून ते पीक पूर्ण येईपर्यंत परिणाम करणारे आहे. आयरनमुळे धान, गहू अशा पिकांना मजबुती येते, सल्फर फळ येण्यासाठी महत्त्वाचे आहे तर बाेराॅनसारखे घटक फुले येण्यासाठी आवश्यक आहेत. जैविक खतांमध्ये वातावरणातील नायट्राेजन जमिनीत शाेषण करण्याची व पिकांना पुरविण्याची क्षमता असते. त्यामुळे रासायनिक खतांचा अतिवापर टाळणे आवश्यक आहे.

- अरविंद्र उपरीकर, कृषी अधिकारी, जिल्हा कृषी विभाग