शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
11
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
12
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
13
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
14
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
15
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
16
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
17
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
18
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
19
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
20
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक

आंबेडकर रुग्णालय पडणार बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 02:14 IST

उत्तर नागपूर ते कामठीपर्यंतच्या रुग्णांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान केंद्राचा कारभार दहा डॉक्टरांच्या भरोवशावर कसातरी पेलला जात असताना यातील पाच डॉक्टरांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले.

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उत्तर नागपूर ते कामठीपर्यंतच्या रुग्णांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान केंद्राचा कारभार दहा डॉक्टरांच्या भरोवशावर कसातरी पेलला जात असताना यातील पाच डॉक्टरांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले. यातील दोघे बदलीच्या ठिकाणी रुजू झाले असून उर्वरित तीन डॉक्टरही बदलीच्या ठिकाणी जाणार असल्याने हे रुग्णालय बंद पडण्याची शक्यता आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान केंद्राला १२ वर्षे झालीत, मात्र हे रुग्णालय आजही बाह्यरुग्ण विभागापुरतेच मर्यादित आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयांतर्गत (डीएमईआर) हे रुग्णालय मेयोच्या देखरेखीखाली चालविले जात असलेतरी येथे सार्वजनिक आरोग्य विभागाचे नऊ डॉक्टरांवर या रुग्णालयाची संपूर्ण जबाबदारी होती. हे डॉक्टर औषधवैद्यकशास्त्र, शल्यचिकित्सा शास्त्र, अस्थिव्यंगोपचारशास्त्र, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र, बालरोगशास्त्र, नेत्ररोगशास्त्र, पॅथालॉजी व सोनोग्राफी विभागातून रुग्णसेवा देत होते. डॉक्टर, तंत्रज्ञ आणि पुरेसे मुनष्यबळ नसल्याने यातील एक जरी डॉक्टर किंवा तंत्रज्ञ रजेवर गेल्यास रुग्णसेवा प्रभावित व्हायची. चार वर्षांपूर्वी नऊमधून दोन डॉक्टरांची पदोन्नती होऊन दुसºया रुग्णालयात बदली करण्यात आली, तर एक डॉक्टर ‘डीएमईआर’मध्ये रुजू झाले. त्यांच्या बदल्यात तीन डॉक्टरांना कंत्राटी पद्धतीवर घेण्यात आले. दोन महिन्यांपूर्वी डॉ. एस.एल. कराडे व डॉ. डी.एस. शिंगणावार यांची बदली प्रादेशिक मनोरुग्णालयात करण्यात आली. मात्र त्यांच्या जागी एकही डॉक्टर आले नाही. यातच चार दिवसांपूर्वी डॉ. एल.एम. माटे, डॉ. एच.ए. श्रीवास्तव व डॉ. ए.बी. गेडाम यांची मौदा येथील नवनिर्मित ग्रामीण रुग्णालयात बदली झाल्याचे आदेश धडकले.तूर्तास त्यांना पदमुक्त करण्यात आले नसले तरी आज ना उद्या त्यांना बदलीच्या ठिकाणी जावे लागणार आहे. यामुळे पाच डॉक्टरांवर या रुग्णालयाची जबाबदारी येणार आहे. यातील चार डॉक्टर कंत्राटी पद्धतीवरील असल्याने ते कधीही सोडून जाऊ शकतात. आरोग्य विभागाने आपले डॉक्टर काढून घेतल्याने व डीएमईआर कायमस्वरूपी डॉक्टरांची भरती करून घेत नसल्याने रुग्णसेवा प्रभावित होण्याची व लवकरच या रुग्णालयाला टाळे लागण्याची शक्यता आहे.पदव्युत्तर पदवी व अतिविशेषोपचार संस्थेवर फेरले पाणीया रुग्णालयाला पदव्युत्तर पदवी व अतिविशेषोपचार अभ्यासक्र म संस्थेत रूपांतरित करण्याचा निर्णय ३ मार्च २०१४ रोजी मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. अनुसूचित जाती उपाययोजनेतून २०९ कोटी रु पयांचा निधीही मंजूर झाला. पाच वर्षांमध्ये हा निधी टप्प्याटप्प्याने मिळणार होता. ५६८ खाटांचे हे रुग्णालय होणार होते. डॉक्टर, अधिकारी व कर्मचाºयांची अशी १०७३ पदे भरण्याचे प्रस्तावित होते. परंतु गेल्या तीन वर्षात यावर काहीच झाले नाही. परिणामी, रुग्णालयाच्या विकासावर पाणी फेरल्या गेले आहे. सध्या रुग्णालयात मोजकेच डॉक्टर, त्यातही ठाराविक वेळेसाठीच उपचार होत असल्याने एकेकाळी ७००वर असलेले बाह्यरुग्ण विभाग आता केवळ ४००वर आले आहे.