शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

गोळवलकर सोडल्याशिवाय आंबेडकर पचवता येणार नाहीत

By admin | Updated: March 20, 2016 03:14 IST

महापुरुषांची पळवापळवी हा ‘स्ट्रॅटजी’चा एक भाग झाला आहे. बाबासाहेबांचा जयजयकार करायचा, ...

श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन : आंबेडकर अध्यासन व्याख्यानमालानागपूर : महापुरुषांची पळवापळवी हा ‘स्ट्रॅटजी’चा एक भाग झाला आहे. बाबासाहेबांचा जयजयकार करायचा, फोटोला हार घालायचे परंतु त्यांचे विचार स्वीकारायचे नाहीत. हे पूर्वीपासूनच चालत आलेले आहे. राजकारणातच नव्हे तर समाजकारण आणि धर्मकारणातही ते सुरू आहे. बाबासाहेबांवर सर्वांचाच अधिकार आहे. परंतु त्यांना स्वीकारणे एक स्ट्रॅटजी म्हणून वापरले जाते. गोळवलकर गुरुजी यांच्यासोबत बाबासाहेबांचा फोटो लावला जातो. याला विरोध असण्याचे कारण नाही. गोळवलकर यांचे राष्ट्र सुधारणेचे कार्य मान्य आहे, मात्र गोळवलकर यांना मान्य असलेली जातीव्यवस्था आणि तीच जातीव्यवस्था नाकारणारे बाबासाहेब यांच्या फोटोची बेरीज करू पाहणाऱ्यांनी मात्र गोळवलकर सोडल्याशिवाय आंबेडकर पचवता येणार नाहीत ही गोष्ट ध्यानात ठेवावी, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी येथे केले. डॉ. आंबेडकर प्रतिष्ठान, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय भारत सरकारअंतर्गत डॉ. आंबेडकर अध्यासनातर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात शनिवारी डॉ. श्रीपाल सबनीस यांचे व्याख्यान आायोजित करण्यात आले होते. ‘२१ व्या शतकात डॉ. आंबेडकरांच्या विचारांची आवश्यकता’ या विषयावर ते बोलत होते. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले हे अध्यक्षस्थानी होते. तर कुलसचिव डॉ. पूरणचंद्र मेश्राम प्रमुख अतिथी होते. डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, सध्या जगभरात आणि देशात धार्मिक उन्माद माजला आहे. जगात इस्लामच्या नावाखाली दहशत माजविली जात आहे. इस्लामचा अर्थच शांतता असा आहे. पैगंबराचा इस्लाम हा शांततेचा संदेश देणारा आहे. धर्माच्या या उन्मादामुळे जगाच्या व देशाच्या शांततेला तडे जात आहेत. जागतिकीकरणाचा सर्वाधिक फटका या देशातील गरीब, दलित आदिवासींना बसत आहे. अशा परिस्थितीत जगाच्या व देशाच्या सुरक्षिततेसाठी, शांततेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची आवश्यकता आहे. त्यांच्या धम्माची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले.बाबासाहेब हे केवळ एकट्या दलितांचे नव्हते तर ते महिलांचे, कामगारांचे, शेतकऱ्यांचे कैवारी होते. ओबीसींच्या प्रश्नांवर मंत्रिपदाला ठोकर मारणारे होते. बाबासाहेबांनी ब्राह्मणांचा नव्हे तर ब्राह्मण्याचा विरोध केला आहे. ब्राह्मण्य हे प्रत्येक जाती धर्मात असते. जात ही जाणीव जिथे असेल तिथे ब्राह्मण्य असते. बाबासाहेबांच्या चळवळीत अनेक ब्राह्मण समाजाच्या व्यक्ती होत्या.मनुस्मृतीचे दहन करण्याचा ठराव मांडणारी पहिली व्यक्ती ही ब्राह्मण समाजातीलच होती. अनेक समाजवादी आणि कम्युनिस्ट ब्राह्मणांनी कर्मठ सनातनी ब्राह्मणांना विरोध केला आहे. त्यामुळे ब्राह्मणही बदलू शकतात. ते बाबासाहेब स्वीकारत असतील तर त्यांच्यावर संशय घेण्याची गरज नाही. जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन बाबासाहेबांचा विचार व्हावा. आजच्या संदर्भात आंबेडकरांच्या विचारांची दिशा कोणती याचा विचार व्हावा, असेही ते म्हणाले. आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉ. प्रदीप आगलावे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. रमेश शंभरकर यांनी संचालन केले. यावेळी ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत ताराचंद्र खांडेकर, ई. मो. नारनवरे, जगन वंजारी, धनराज डहाट, भी.म. कौसल आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)महात्मा गांधी व आंबेडकरांच्या अनुयायांमध्ये संवाद व्हावा महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महापुरुषांमध्ये वाद होते. म्हणून त्यांच्या अनुयायांनी सुद्धा भांडत राहावे, असे होऊ नये. त्यांच्यात संवाद व्हावा. बाबासाहेबांचे विचार व्यापक दृष्टीने समजून घ्यावेत. संतांची व समाजसुधारकांची परंपरा एका सूत्रात बांधणे आवश्यक आहे, असेही डॉ. सबनीस म्हणाले.‘डॉ. आंबेडकर व भारतीय संविधान’ यावर आज व्याख्यान दीक्षांत सभागृहात रविवारी सायंकाळी ५ वाजता ‘डॉ. आंबेडकर आणि भारतीय संविधान’ या विषयावर संविधानाचे गाढे अभ्यासक डॉ. अनंत रोकडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.