शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

नागपूरच्या अंबाझरी उद्यानात जिथे तिथे चाळे : १० रुपयात दिवसभर हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 21:27 IST

Ambazari Garden, Nagpur every where obscene वन आणि वन्यजीव संरक्षण व संवर्धन हे वनविभागाचे प्राधान्य असायला हवे पण पैसा कमाविण्याच्या नादात उद्दिष्टच विसरल्याचे दिसते आहे. हीच अवस्था सध्या अंबाझरी जैवविविधता उद्यानात बघायला मिळत आहे. हे उद्यान सध्या प्रेमीयुगुलांसाठी नंदनवन ठरले आहे.

ठळक मुद्देवनविभागाच्या दुर्लक्षाने अधिवासाचे तीनतेरा

लोकमत  न्यूज  नेटवर्क 

नागपूर : वन आणि वन्यजीव संरक्षण व संवर्धन हे वनविभागाचे प्राधान्य असायला हवे पण पैसा कमाविण्याच्या नादात उद्दिष्टच विसरल्याचे दिसते आहे. हीच अवस्था सध्या अंबाझरी जैवविविधता उद्यानात बघायला मिळत आहे. हे उद्यान सध्या प्रेमीयुगुलांसाठी नंदनवन ठरले आहे. १० रुपयात प्रवेश घेतल्यावर दिवसभर जोडप्यांचा हैदोस चाललेला असतो. त्यामुळे पक्ष्यांच्या अधिवासाचे तीनतेरा वाजले आहेत. यावर ना वनविभागाचे नियंत्रण राहिले ना संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे. ७५० हेक्टरमध्ये पसरलेले अंबाझरी जैवविविधता उद्यान हे राखीव वनक्षेत्राचा भाग आहे.

१५० च्यावर प्रजातींच्या पक्ष्यांसाठी हे नंदनवन आहे, शिवाय काही प्राण्यांचे वास्तव्यही यामध्ये आहे. पक्षी निरीक्षक व अभ्यासकांसाठी महत्त्वाचे ठिकाण ठरले आहे. त्यामुळे नागरिकांचा अनावश्यक हैदोस होऊ नये म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र पर्यटन व पैसा कमाविण्याच्या नादात सर्रासपणे नियमांची पायमल्ली केली जात आहे. सुरुवातीला माॅर्निंग वाॅकर्स आणि सायकल ट्रॅकर्ससाठी उद्यान माेकळे करण्यात आले. इथपर्यंत ठीक असताना १० रुपये शुल्क आकारून सामान्य नागरिकांसाठीही ते माेकळे करण्यात आले. मात्र नागरिकांपेक्षा प्रेमीयुगुलांसाठीच माेकळे रान मिळाल्याचे दिसून येत आहे.

जी गर्दी सेमिनरी हिल्स, जापानी उद्यान किंवा बालाेद्यानाकडे व्हायची ती आता अंबाझरी जैवविविधता उद्यानात हाेऊ लागली आहे. नियंत्रणासाठी संयुक्त वनव्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली पण त्यांनाही पैशाशिवाय काही दिसत नाही. सुरुवातीला हिंगणा एमआयडीसीकडून प्रवेश सुरू हाेता पण आता वाडी आणि पांढराबाेडी भागातूनही प्रवेश सुरू झाला. केवळ १० रुपये देऊन प्रवेश केला की उद्यानात दिवसभर माेकळे रान असते. झाडाझुडपात त्यांचे अश्लील चाळे चाललेले असतात. वनात दारूच्या बाॅटल्ससह अनेक आक्षेपार्ह वस्तू पडलेल्या आढळतात. सामान्य नागरिकांचे फिरणेही मुश्कील झाले आहे. या हैदाेसामुळे पक्ष्यांचा अधिवास धाेक्यात आला आहे.

राजकीय हस्तक्षेप कारणीभूत

संयुक्त वनव्यवस्थापन समितीमध्ये वनाबाबत कुणीही जाणकार नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचा भर पर्यटन व पैशावर दिसताे. त्यामुळे वन व वन्यजीव संवर्धनाकडे दुर्लक्ष हाेत आहे. पक्षी अधिवास संवर्धनाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. राजकीय हस्तक्षेप वाढल्याने उद्यानामध्ये चाललेला सावळागाेंधळ वनविभागाच्याही नियंत्रणाबाहेर गेल्याचा आराेप पक्षी निरीक्षकांकडून केला जात आहे.

टॅग्स :Ambazari Lakeअंबाझरी तलावnagpurनागपूर