शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षित आहे अमरनाथ यात्रा

By admin | Updated: July 14, 2015 03:19 IST

यावर्षी होत असलेल्या अमरनाथ यात्रेवर कुठल्याही प्रकारचा धोका नसून संपूर्ण यात्रा ही सुरक्षित आहे, असा दावा केंद्रीय

नागपूर : यावर्षी होत असलेल्या अमरनाथ यात्रेवर कुठल्याही प्रकारचा धोका नसून संपूर्ण यात्रा ही सुरक्षित आहे, असा दावा केंद्रीय रिझर्व्ह पोलीस फोर्स(सीआरपीएफ)चे महानिरीक्षक पंकज कुमार यांनी केला आहे. पंकज कुमार हे सोमवारी सकाळी सीआरपीएफच्या नागपूर केंद्राची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी चर्चा करीत होते. पंकज कुमार हे सीआरपीएफच्या जम्मू-काश्मीर विभागाचे महानिरीक्षक आहेत. सीआरपीएफच्या सुरक्षेतच अमरनाथ यात्रा सुरू आहे. यासंबंधात बोलताना पंकज कुमार यांनी सांगितले की, अमरनाथ यात्रेवर दीड लाख भक्त आले आहेत. पावसामुळे यात्रेला मध्ये मध्ये थांबविले जाते. भक्तांच्या सुरक्षेत कुठलीही चूक होऊ दिली जात नाही. यात्रेदरम्यान सीमेपलीकडूनही युद्धविरामाचे उल्लंघन झालेले नाही. पंकज कुमार यांनी जम्मू-काश्मीरच्या दहशतवादावर चर्चा करताना सांगितले की, पूर्वीच्या तुलनेत परिस्थिती खूप बदललेली आहे. घुसखोरी मोठ्या प्रमाणावर थांबवण्यात आली आहे. शांततेचे वातावरण निर्माण होत आहे. लोक आता हिंसेवर विश्वास ठेवत नाही. येथील दहशतवाद एक दिवस निश्चित संपेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नक्षलप्रभावित छत्तीसगड, गडचिरोली आणि देशातील इतर भागांमध्ये सीआरपीएफ तैनात करण्याची मागणी वाढत असल्याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, दिवसेंदिवस सीआरपीएफची भूमिका वाढत आहे. कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी सीआरपीएफ महत्त्वाची भूमिका बजावत आहे. याप्रसंगी उपमहानिरीक्षक संजय यादव यांनी सांगितले की, सीआरपीएफच्या सर्व जवानांना घर उपलब्ध करून देण्याचे आमचे लक्ष्य आहे. आतापर्यंत १३ टक्के लोकांनाच घर उपलब्ध करून देण्यात आले आहे. ते २५ टक्क्यापर्यंत न्यायचे आहे. सीआरपीएफच्या देशभरातील ४२ केंद्रांमधून तीन सर्वश्रेष्ठ केंद्रांमध्ये सीआरपीएफ नागपूर केंद्राची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे नागपूर केंद्राची पाहणी करण्यासाठी महानिरीक्षक पंकज कुमार, उपमहानिरीक्षक जे.एस. संधू व संजय यादव नागपूरला आले होते. त्यांनी उपमहानिरीक्षक ए.के. सिंह आणि समादेशक मनोज ध्यानी यांच्यासोबत केंद्राची पाहणी केली. (प्रतिनिधी)