शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

सुरक्षित आहे अमरनाथ यात्रा

By admin | Updated: July 14, 2015 03:19 IST

यावर्षी होत असलेल्या अमरनाथ यात्रेवर कुठल्याही प्रकारचा धोका नसून संपूर्ण यात्रा ही सुरक्षित आहे, असा दावा केंद्रीय

नागपूर : यावर्षी होत असलेल्या अमरनाथ यात्रेवर कुठल्याही प्रकारचा धोका नसून संपूर्ण यात्रा ही सुरक्षित आहे, असा दावा केंद्रीय रिझर्व्ह पोलीस फोर्स(सीआरपीएफ)चे महानिरीक्षक पंकज कुमार यांनी केला आहे. पंकज कुमार हे सोमवारी सकाळी सीआरपीएफच्या नागपूर केंद्राची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी चर्चा करीत होते. पंकज कुमार हे सीआरपीएफच्या जम्मू-काश्मीर विभागाचे महानिरीक्षक आहेत. सीआरपीएफच्या सुरक्षेतच अमरनाथ यात्रा सुरू आहे. यासंबंधात बोलताना पंकज कुमार यांनी सांगितले की, अमरनाथ यात्रेवर दीड लाख भक्त आले आहेत. पावसामुळे यात्रेला मध्ये मध्ये थांबविले जाते. भक्तांच्या सुरक्षेत कुठलीही चूक होऊ दिली जात नाही. यात्रेदरम्यान सीमेपलीकडूनही युद्धविरामाचे उल्लंघन झालेले नाही. पंकज कुमार यांनी जम्मू-काश्मीरच्या दहशतवादावर चर्चा करताना सांगितले की, पूर्वीच्या तुलनेत परिस्थिती खूप बदललेली आहे. घुसखोरी मोठ्या प्रमाणावर थांबवण्यात आली आहे. शांततेचे वातावरण निर्माण होत आहे. लोक आता हिंसेवर विश्वास ठेवत नाही. येथील दहशतवाद एक दिवस निश्चित संपेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नक्षलप्रभावित छत्तीसगड, गडचिरोली आणि देशातील इतर भागांमध्ये सीआरपीएफ तैनात करण्याची मागणी वाढत असल्याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, दिवसेंदिवस सीआरपीएफची भूमिका वाढत आहे. कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी सीआरपीएफ महत्त्वाची भूमिका बजावत आहे. याप्रसंगी उपमहानिरीक्षक संजय यादव यांनी सांगितले की, सीआरपीएफच्या सर्व जवानांना घर उपलब्ध करून देण्याचे आमचे लक्ष्य आहे. आतापर्यंत १३ टक्के लोकांनाच घर उपलब्ध करून देण्यात आले आहे. ते २५ टक्क्यापर्यंत न्यायचे आहे. सीआरपीएफच्या देशभरातील ४२ केंद्रांमधून तीन सर्वश्रेष्ठ केंद्रांमध्ये सीआरपीएफ नागपूर केंद्राची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे नागपूर केंद्राची पाहणी करण्यासाठी महानिरीक्षक पंकज कुमार, उपमहानिरीक्षक जे.एस. संधू व संजय यादव नागपूरला आले होते. त्यांनी उपमहानिरीक्षक ए.के. सिंह आणि समादेशक मनोज ध्यानी यांच्यासोबत केंद्राची पाहणी केली. (प्रतिनिधी)