शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

रामझुल्याची प्रतीक्षा कायमच

By admin | Updated: November 26, 2014 01:10 IST

रामझुला प्रकल्प किती दिवसांत बांधून पूर्ण होईल यासंदर्भात अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर ही कंत्राटदार कंपनी स्वत:च ठाम नाही. कंपनी संधी मिळेल तेव्हा बांधकामाची मुदत वाढवून मागत आहे.

पुन्हा वाढवून मागितला बांधण्याचा कालावधी : हायकोर्टात २ डिसेंबरला सुनावणीनागपूर : रामझुला प्रकल्प किती दिवसांत बांधून पूर्ण होईल यासंदर्भात अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर ही कंत्राटदार कंपनी स्वत:च ठाम नाही. कंपनी संधी मिळेल तेव्हा बांधकामाची मुदत वाढवून मागत आहे. रामझुल्याच्या द्वितीय टप्प्याच्या बांधकामासाठी कंपनीने आधी २१ एप्रिल २०१६ पर्यंत मुदत वाढवून देण्याची विनंती केली होती. मंगळवारी कंपनीने यात आणखी २ महिने वाढवून देण्यासाठी दुरुस्ती अर्ज केला. हायकोर्टाने यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करून प्रकरणावरील पुढील सुनावणी २ डिसेंबर रोजी निश्चित केली.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व चंद्रकांत भडंग यांच्यासमक्ष सुनावणी झाली. रामझुल्याच्या बांधकामाला आणखी मुदतवाढ देण्यास प्रकरणातील मध्यस्थ विदर्भ टॅक्सपेयर्स असोसिएशनचे सचिव तेजिंदरसिंग रेणू यांनी विरोध केला आहे. कंपनीने १३ आॅक्टोबर रोजी अर्ज सादर करून संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी २१ एप्रिल २०१६ पर्यंत, तर प्रथम टप्प्यासाठी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. यानंतर २८ आॅक्टोबर रोजी दुसरा अर्ज सादर करून पहिल्या टप्प्यासाठी आणखी २ महिने मुदत वाढवून मागितली, तर आज दुसऱ्या टप्प्याच्या मुदवाढीसाठी दुरुस्ती अर्ज केला.शासन व अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये १७ जानेवारी २००६ रोजी रामझुला बांधकामाचा करार झाला आहे. करारानुसार संपूर्ण प्रकल्प ४२ महिन्यांत म्हणजे आॅगस्ट-२००९ पर्यंत पूर्ण करणे आवश्यक होते. परंतु, १०० वर महिने लोटल्यानंतर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचेही काम पूर्ण झालेले नाही. सुरुवातीला प्रकल्पाचा खर्च ४६ कोटी रुपये होता. हा खर्च आता १०० कोटींवर गेला आहे. मध्यस्थातर्फे अ‍ॅड. हरनीश गढिया, तर अ‍ॅफकॉन्सतर्फे अ‍ॅड. आशुतोष धर्माधिकारी यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)असे आहे प्रकरणरामझुल्याचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी निश्चित कालावधी ठरवून देण्याकरिता नागपूर चेंबर आॅफ कॉमर्सने जनहित याचिका दाखल केली होती. शासन व अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने प्रतिज्ञापत्र दाखल करून संपूर्ण प्रकल्प ३० आॅक्टोबर २०१४ पर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही दिली होती. तत्कालीन न्यायमूर्तीद्वय पी. व्ही. हरदास व एम. एल. तहलियानी यांनी त्यांचे म्हणणे स्वीकारून ६ जुलै २०१२ रोजी जनहित याचिका निकाली काढली होती. रेणू यांचा मध्यस्थी अर्जही न्यायालयाने मंजूर केला होता. आश्वासन पाळण्यात अपयश आल्यामुळे कंपनीने आता मुदतवाढीसाठी हायकोर्टात धाव घेतली आहे.