शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

संकटातील व्यापाऱ्यांना व्यवसायाची परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:07 IST

नागपूर : लॉकडाऊनने व्यापाऱ्यांचा संपूर्ण व्यवसाय बंद असून व्यापारी आर्थिक संकटात आहेत. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची संख्या कमी झाली झाल्याने ...

नागपूर : लॉकडाऊनने व्यापाऱ्यांचा संपूर्ण व्यवसाय बंद असून व्यापारी आर्थिक संकटात आहेत. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची संख्या कमी झाली झाल्याने सर्व वर्गवारीतील व्यापाऱ्यांना व्यवसायाची परवानगी देण्याची मागणी नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने (एनव्हीसीसी) केली आहे.

यासंदर्भात चेंबरचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांच्या नेतृत्त्वात पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांची भेट घेऊन व्यापाऱ्यांना लॉकडाऊनमध्ये शिथिलता देऊन नियमांतर्गत व्यवसाय करण्याची परवानगी देण्याचे निवेदन दिले.

मेहाडिया म्हणाले, राज्य शासनाने एप्रिलपासून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व वर्गवारीतील दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देऊन कठोर निर्बंध लावले आहेत. आता लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढविले आहे. नागपुरातील व्यापारी मार्च २०२१ पासूनच लॉकडाऊनचा फटका सहन करीत आहेत. त्यामुळे नागपुरातील व्यापाऱ्यांची अर्थव्यवस्था अस्ताव्यस्त झाली आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही लॉकडाऊनमुळे सर्वाधिक नुकसान छोट्या आणि मध्यम व्यापाऱ्यांना झाले आहे. सरकारने या व्यापाऱ्यांसाठी आर्थिक मदत वा कोणत्याही पॅकेजची घोषणा केलेली नाही. व्यवसाय बंद असल्याने कामगार, हॉकर्स, ऑटोरिक्षा, ई-रिक्षा, चहावाले, हातठेला मजूर, फूटपाथवरील चहा-नाश्ता दुकानदारांचा व्यवसाय बंद आहे. व्यापारी आर्थिक समस्यांनी मानसिक आजाराचे रुग्ण झाले आहेत.

चेंबरचे उपाध्यक्ष संजय के. अग्रवाल म्हणाले, व्यापारी अर्थव्यवस्थेचा कणा आहे. व्यापारी उद्योगातर्फे निर्मित माल ग्राहकांपर्यंत पोहोचवितो. याशिवाय व्यापारीच कर संग्रहण करून सरकारी खजान्यात जमा करतो. त्याच्या भरवशावर सरकार चालते. जर व्यवसायच बंद राहिला तर कर कुठून भरणार, हा प्रश्न आहे.

चेंबरचे सचिव रामअवतार तोतला म्हणाले, नागपूर शहराने कोरोना महामारीवर अनेक प्रमाणात मात केली आहे. नागपुरात कोरोनाचा रुग्णांची संख्या कमी झाली आहे. अनेक प्रमाणात रुग्ण ठीक होत आहेत. त्यामुळे प्रशासनाने कडक निर्बंध शिथिल करून व्यापाऱ्यांना सूट देऊन नियमांतर्गत आर्थिक सेवा सुरू करण्याची परवानगी द्यावी. त्यामुळे व्यापाऱ्यांवरील आर्थिक संकट दूर होईल.

मनपा आयुक्त म्हणाले, राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीशी चर्चा करून जर नागरिक आणि व्यापाऱ्यांचे कोरोना महामारी रोखण्यासाठी सहकार्य प्राप्त होत असेल तर राज्यात १ जूनपासून व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय होऊ शकतो. दुकाने सुरू झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी कोविड नियमाचे पालन करावे. मास्कविना ग्राहकांना दुकानात प्रवेश देऊ नये. दुकानदारांनी ग्राहकांसाठी अतिरिक्त मास्क दुकानात उपलब्ध करावेत. बाजारात गर्दी झाल्यास आणि कोरोना महामारीचे संकट पुन्हा आल्यास दुकाने पुन्हा बंद करावी लागतील, त्याचा फटका व्यापाऱ्यांना बसणार आहे. त्यामुळे दुकानदारांनी कर्मचाऱ्यांची वेळोवेळी कोरोना चाचणी करावी.

निवेदन देताना चेंबरचे चेंबरचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया, उपाध्यक्ष संजय के. अग्रवाल, सचिव रामअवतार तोतला, कोषाध्यक्ष-सचिन पुनियानी, कार्यकारिणी सदस्य राजवंतपाल सिंग तुली उपस्थित होते.