शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
5
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
6
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
7
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
8
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
10
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
11
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
12
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
13
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
14
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
15
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
16
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
17
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
18
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
19
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
20
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?

आषाढीच्या पायी वारीला परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:06 IST

नागपूर : कोरोना संक्रमणानंतर राज्यात मागील वर्षी वारीला खंड पडला. बसने पादुका नेण्यात आल्या. यंदा संक्रमण रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात ...

नागपूर : कोरोना संक्रमणानंतर राज्यात मागील वर्षी वारीला खंड पडला. बसने पादुका नेण्यात आल्या. यंदा संक्रमण रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामुळे आषाढी वारीला संतांच्या परंपरागत रथामधूनच पालखी नेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी विश्व वारकरी सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप कोहळे यांनी सरकारकडे केली आहे.

वारीला महाराष्ट्रात सांस्कृतिक वारसा आहे. वारकरी आणि वारी ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. असे असतानही अनलॉकच्या काळात मागील वर्षी वारकऱ्यांना वारी करता आली नाही. शासनाच्या निर्बंधाला वारकऱ्यांनी प्रतिसाद दिला. यंदा पायी वारी शक्य आहे. यंदाची वारी पायीच व्हावी अशी संपूर्ण वारकरी संप्रदायाची मागणी आहे.

कोरोनाचे संकट लक्षात घेऊन शासनाच्या निर्बंधानुसारच परवानगी मिळावी, अन्यथा ‘माझी वारी, माझी जबाबदारी’ या धर्तीवर सर्व वारकरी संघटना एकत्र येऊन पायी वारी करतील, असा इशाराही पत्रातून दिला आहे. यंदाही संतांच्या पादुका बसने नेण्याला शासनाने परवानगी दिली आहे. मात्र ती कोणालाच रुचलेली नाही. अनलॉकमध्ये हॉटेल, सिनेमागृह, मॉल, दारूची दुकाने उघडली आहेत. सर्व संरक्षित स्मारकेही खुली करण्यात आली आहेत. देशात गर्दीने सभा आणि निवडणुका झाल्या. मात्र पायी वारीलाच परवानगी का नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

कुंभमेळा, जगन्नाथपुरी आदी यात्रेचे आयोजन करून संबंधित राज्यांनी सांस्कृतिक अस्मिता जोपासली. तशीच अस्मिता आषाढी वारीतही जोपासली जावी, यासाठी सरकार आणि वारकऱ्यांमध्ये समन्वय राखला जावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.