शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

आषाढीच्या पायी वारीला परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:06 IST

नागपूर : कोरोना संक्रमणानंतर राज्यात मागील वर्षी वारीला खंड पडला. बसने पादुका नेण्यात आल्या. यंदा संक्रमण रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात ...

नागपूर : कोरोना संक्रमणानंतर राज्यात मागील वर्षी वारीला खंड पडला. बसने पादुका नेण्यात आल्या. यंदा संक्रमण रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामुळे आषाढी वारीला संतांच्या परंपरागत रथामधूनच पालखी नेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी विश्व वारकरी सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप कोहळे यांनी सरकारकडे केली आहे.

वारीला महाराष्ट्रात सांस्कृतिक वारसा आहे. वारकरी आणि वारी ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. असे असतानही अनलॉकच्या काळात मागील वर्षी वारकऱ्यांना वारी करता आली नाही. शासनाच्या निर्बंधाला वारकऱ्यांनी प्रतिसाद दिला. यंदा पायी वारी शक्य आहे. यंदाची वारी पायीच व्हावी अशी संपूर्ण वारकरी संप्रदायाची मागणी आहे.

कोरोनाचे संकट लक्षात घेऊन शासनाच्या निर्बंधानुसारच परवानगी मिळावी, अन्यथा ‘माझी वारी, माझी जबाबदारी’ या धर्तीवर सर्व वारकरी संघटना एकत्र येऊन पायी वारी करतील, असा इशाराही पत्रातून दिला आहे. यंदाही संतांच्या पादुका बसने नेण्याला शासनाने परवानगी दिली आहे. मात्र ती कोणालाच रुचलेली नाही. अनलॉकमध्ये हॉटेल, सिनेमागृह, मॉल, दारूची दुकाने उघडली आहेत. सर्व संरक्षित स्मारकेही खुली करण्यात आली आहेत. देशात गर्दीने सभा आणि निवडणुका झाल्या. मात्र पायी वारीलाच परवानगी का नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

कुंभमेळा, जगन्नाथपुरी आदी यात्रेचे आयोजन करून संबंधित राज्यांनी सांस्कृतिक अस्मिता जोपासली. तशीच अस्मिता आषाढी वारीतही जोपासली जावी, यासाठी सरकार आणि वारकऱ्यांमध्ये समन्वय राखला जावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.