शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

आषाढीच्या पायी वारीला परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:06 IST

नागपूर : कोरोना संक्रमणानंतर राज्यात मागील वर्षी वारीला खंड पडला. बसने पादुका नेण्यात आल्या. यंदा संक्रमण रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात ...

नागपूर : कोरोना संक्रमणानंतर राज्यात मागील वर्षी वारीला खंड पडला. बसने पादुका नेण्यात आल्या. यंदा संक्रमण रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामुळे आषाढी वारीला संतांच्या परंपरागत रथामधूनच पालखी नेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी विश्व वारकरी सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप कोहळे यांनी सरकारकडे केली आहे.

वारीला महाराष्ट्रात सांस्कृतिक वारसा आहे. वारकरी आणि वारी ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. असे असतानही अनलॉकच्या काळात मागील वर्षी वारकऱ्यांना वारी करता आली नाही. शासनाच्या निर्बंधाला वारकऱ्यांनी प्रतिसाद दिला. यंदा पायी वारी शक्य आहे. यंदाची वारी पायीच व्हावी अशी संपूर्ण वारकरी संप्रदायाची मागणी आहे.

कोरोनाचे संकट लक्षात घेऊन शासनाच्या निर्बंधानुसारच परवानगी मिळावी, अन्यथा ‘माझी वारी, माझी जबाबदारी’ या धर्तीवर सर्व वारकरी संघटना एकत्र येऊन पायी वारी करतील, असा इशाराही पत्रातून दिला आहे. यंदाही संतांच्या पादुका बसने नेण्याला शासनाने परवानगी दिली आहे. मात्र ती कोणालाच रुचलेली नाही. अनलॉकमध्ये हॉटेल, सिनेमागृह, मॉल, दारूची दुकाने उघडली आहेत. सर्व संरक्षित स्मारकेही खुली करण्यात आली आहेत. देशात गर्दीने सभा आणि निवडणुका झाल्या. मात्र पायी वारीलाच परवानगी का नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

कुंभमेळा, जगन्नाथपुरी आदी यात्रेचे आयोजन करून संबंधित राज्यांनी सांस्कृतिक अस्मिता जोपासली. तशीच अस्मिता आषाढी वारीतही जोपासली जावी, यासाठी सरकार आणि वारकऱ्यांमध्ये समन्वय राखला जावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.